शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
2
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
3
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
4
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
5
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
6
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
7
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
8
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
9
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
10
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
11
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
12
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
13
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
14
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
15
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
16
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
17
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
18
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
19
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
20
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!

वाहतूक व्यवस्थेसाठी ४४ लाखांचा आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 9:46 PM

यवतमाळ शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जात असून त्यासाठी आरटीओ व वाहतूक पोलिसांनी ४४ लाखांचा संयुक्त आराखडा तयार केला आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांना साकडे : यवतमाळ नगरपरिषदेकडे जिल्हा वाहतूक शाखेचा साडेसहा लाखांचा प्रस्ताव

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : यवतमाळ शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जात असून त्यासाठी आरटीओ व वाहतूक पोलिसांनी ४४ लाखांचा संयुक्त आराखडा तयार केला आहे. हा आराखडा पालकमंत्री मदन येरावार यांना सादर करण्यात आला असून या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीमधून निधी मागितला जाणार आहे.यवतमाळ शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्याचा प्रयत्न सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते व त्यांच्या चमूकडून सुरु आहे. रात्री १० पर्यंत वाहतूक पोलीस पार्किंगमधील बेशिस्त वाहनांवर कारवाई करताना दिसत आहे. परंतु वाहतूक पोलिसांपुढेही अनेक अडचणी आहेत. शहरात प्रमुख वर्दळीच्या ठिकाणी व बाजारपेठेत पिवळे पट्टे मारलेले नाहीत. त्यामुळे वाहनांवर कारवाई करताना जनतेच्या रोषाचा सामना वाहतूक पोलिसांना करावा लागतो. अशीच स्थिती चौकाचौकातील सिग्नलवर पांढºया पट्यांबाबत आहेत. अनेक ठिकाणी पिवळे व पांढरे पट्टे पुसले गेलेले आहेत. शहरात बहुतांश ठिकाणी सूचना फलक, साईन बोर्ड लावले गेलेले नाही. जिथे कुठे असतील त्या बोर्डांची साईज बरीच लहान आहे. त्यामुळे ते वाहनधारकांच्या सहज दृष्टीस पडत नाही. काही ठिकाणी नो-एन्ट्री, प्रवेशास मनाई असे स्पष्ट लिहिण्याऐवजी केवळ ओळख चिन्ह काढले आहे. त्यावरून सामान्य नागरिकाला बोध होत नाही. बहुतांश दत्त चौकात हा प्रकार होतो. एक दिशा मार्गाचा फलक अगदीच लहान व चिन्हांकीत असल्याने नवख्या वाहनधारकाचा गोंधळ उडतो व त्याला वाहतूक पोलिसाच्या चालानच्या कारवाईला सामोरे जावे लागते. सूचना फलक, पट्टे याबाबत वाहतूक पोलिसांनी यवतमाळ नगरपरिषदेच्या मुख्याधिकाºयांकडे वारंवार पत्र दिले. वैयक्तिक संपर्क साधून पाठपुरावा केला. मात्र अद्यापही तातडीने प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे वाहतूक पोलिसांना कारवाई करताना विचार करावा लागतो आहे.कुणीही अधिकारी वाहतूक शाखेत आला तरी दीड-दोन वर्ष राहील, त्यामुळे शहराची वाहतूक व्यवस्था केवळ अधिकाºयांपुरती मर्यादित न ठेवता कायमस्वरूपी शिस्त लावण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहे. त्याच एक भाग म्हणून वाहतूक पोलीस शाखेने सुमारे ४४ लाखांचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे सादर केला आहे. या निधीतून संपूर्ण यवतमाळ शहरात ठिकठिकाणी सूचना फलके, साईन बोर्ड व इतर व्यवस्था केल्या जाणार आहेत. नगरपरिषदेलासुद्धा पिवळे व पांढऱ्या पट्ट्यांसाठी साडेसहा लाखांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. ४४ लाखांच्या या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार आग्रही असल्याचे सांगितले जाते.दरदिवशी २०० वाहनांवर कारवाईजिल्हा वाहतूक शाखेत पूर्वी दिवसभरात सात ते दहा वाहनांवर कारवाई केली जात होती. परंतु आता हा आकडा २०० वर पोहोचला आहे. पूर्वी वातानुकुलीत वाहनातून फिरणारे पोलीस आता हा आकडा गाठण्यासाठी रात्री १० पर्यंत पायदळ फिरताना दिसत आहे. लायसन्स आणि इन्शोरन्सबाबत वाहतूक पोलीस गंभीर आहे. लायसन्स नसल्यास एक हजार रुपये व इन्शोरन्स नसल्यास २३०० रुपये दंड ठोठावला जातो आहे. त्यातही जिल्हा वाहतूक शाखा ही समाजसेवी शाखा, सुधार शाखा असल्याचे मानून ग्रामीण भागातील गोरगरीब व रुग्णालयाच्या कामाने येणाºया वाट चुकलेल्या वाहनधारकांना सुधारणेच्या सूचना देऊन सोडून दिले जात आहे.