शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

४२ वर्षांत कापूस आठ अन् पगारात २०० पट वाढ

By admin | Updated: November 18, 2015 02:34 IST

शेतीमाल आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा गत ४२ वर्षांचा आलेख बघितला तर जमीन-आसमानाचा फरक दिसून येतो.

जमीन-आसमानचा फरक : कर्मचाऱ्यांची दररोज दिवाळी, कास्तकारांचे वर्षभर हालचज्ञानेश्वर मुंदे यवतमाळशेतीमाल आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा गत ४२ वर्षांचा आलेख बघितला तर जमीन-आसमानाचा फरक दिसून येतो. ५०० रुपये क्ंिवटलच्या कापसाने चार हजारपर्यंत मजल मारली. तर प्राध्यापकांचा पगार ६०० रुपयांवरून सव्वालाखांवर जाऊन पोहोचला आहे. ४२ वर्षात कापसाच्या दरात आठपट आणि प्राध्यापकांच्या वेतनात तब्बल २०८ पट वाढ झाली. शेतात रात्रंदिवस मेहनत करूनही काहीच हाती लागत नाही. उलट कर्मचाऱ्यांची दररोज दिवाळी असते.महागाई दर दिवशी वाढत असून प्रत्येक वस्तूंचे दर आकाशाला भिडत आहे. या तुलनेत शेती मालाचे दर मात्र जेमतेमच वाढत आहे. उलट शेती लागवडीसाठी खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. १९७३ ते २०१५ या ४२ वर्षात शेतमालाचे भाव, पक्क्या वस्तूंचे भाव आणि कर्मचाऱ्यांचे वेतन यांचा तुलनात्मक अभ्यास केला तर शेत मालाला कवडीमोल भावच मिळत असल्याचे दिसत आहे. ४२ वर्षापूर्वी कापसाचा एक क्ंिवटलचा दर आणि प्राध्यापकांच्या वेतनात केवळ १०० रुपयांचा फरक होता. कापसाला ५०० रुपये प्रति क्ंिवटल तर प्राध्यापकाला ६०० रुपये दरमहा वेतन मिळत होते. सध्या कापसाचा भाव चार हजार रुपये प्रति क्ंिवटल आणि प्राध्यापकांचा पगार सव्वा लाखांच्या आसपास आहे. ४२ वर्षात कापूस केवळ ८.१ पट तर तर प्राध्यापकांचा पगार तब्बल २०८ पट वाढला आहे. १९७३ साली ज्वारी २०० रुपये प्रति क्ंिवटल, गहू ४०० रुपये, तांदूळ ६०० रुपये प्रति क्ंिवटल होता. तर पेट्रोल ३ रुपये लिटर, डिझेल २ रुपये लिटर आणि सोने ४०० रुपये तोळा होते. मजुराला दिवसाकाठी पाच रुपये मजुरी मिळत होती. याच काळात शिपायाला दरमहा १७५ रुपये वेतन मिळत होते. तर कनिष्ठ लिपिकाचा पगार २२५ रुपये होता. महागाईचा आलेख वाढताना कर्मचाऱ्यांचे पगार वाढत गेले. साधा शिपाईही १५ हजार रुपये महिना वेतन घेतो. सोने २७ हजार रुपये तोळ्यावर गेले आहे. तर पेट्रोल ६७ रुपये लिटर आणि डिझेल ५४ रुपये लिटर झाले आहे. मजुरीचे दर २०० रुपये प्रति दिवस झाले आहे. त्या तुलनेत शेती माल मात्र आहे त्या स्थितीतच दिसत आहे. गत काही वर्षात दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. ही तफावत दूर होण्याचे कोणतीही चिन्ह दिसत नाही. उलट शासनाने कर्मचाऱ्यांना सातवा आयोग देण्याची घोषणा केली. यात पुन्हा पगारात प्रचंड वाढ होणार आहे. उलट शेतमालाचे भाव दिवसेंदिवस घसरत आहे. एकेकाळी उत्तम मानली जाणारी शेती आता कनिष्ठ झाली असून शेतकऱ्यांची मुलेही नोकरीसाठी धडपत करीत आहे. शेती विकून नोकरी मिळविण्याच्या प्रयत्नात आहे. याचे कारण म्हणजे गत काही वर्षात पगारात झालेली भरघोस वाढ होय. एकीकडे महागाई वाढत असताना कापसाला भाव मिळत नाही, तर दुसरीकडे दुष्काळाची छायाही कायम असते.