शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ३६७ कुपोषित बालके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 05:00 IST

कुपोषण भरून निघावे म्हणून दुध, अंडी आणि केळी दिली जात होती. शेंगदाण्याचे लाडू आणि पोटभर आहारासोबत डब्यातही आहार दिला जात होता. मात्र हा आहार आता बंद झाला आहे. कुपोषणग्रस्त लाभार्थ्यांच्या धान्यात कपात करण्यात आली. सुदृढ बालक आणि कुपोषित बालकामध्ये धान्य वितरणात मोठी तफावत आहे. कुपोषित बालकाला अधिक धान्य गरजेचे आहे.

ठळक मुद्देलाडू, दुध, अंडी बंद : आहाराचे प्रमाण वरिष्ठ स्तरावरून घटले

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाचा प्रकोप वाढला, तसा कुपोषित बालकांना तंदुरूस्त करण्यासाठी दिला जाणारा सकस आहार कमी करण्यात आला. ग्रामीण भागात तर लाडू, दुध, अंडी थांबविण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील ३६७ कुपोषित बालकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याचा धोका आहे.कोरोनामुळे अंगणवाड्या बंद आहेत. पूर्वी शिजवून दिला जाणार आहार बंद झाला. त्याऐवजी घरपोच धान्य पुरविण्याचे आदेश आहे. मात्र शहरी भागात हा नियम पायदळी तुडविण्यात आला आहे. कार्यक्षेत्र मोठे असल्याच्या कारणाने अंगणवाडीताई लाभार्थ्यांना अंगणवाडीत बोलवितात. तेथे सोशल डिस्टन्स पाळले जात नाही. बालकांच्या आरोग्याची काळजी घेतली जात असताना शहरी भागात अंगणवाडीताई सुरक्षेच्या उपाय योजना राबविताना अपुऱ्या पडत आहेत.कुपोषण भरून निघावे म्हणून दुध, अंडी आणि केळी दिली जात होती. शेंगदाण्याचे लाडू आणि पोटभर आहारासोबत डब्यातही आहार दिला जात होता. मात्र हा आहार आता बंद झाला आहे. कुपोषणग्रस्त लाभार्थ्यांच्या धान्यात कपात करण्यात आली. सुदृढ बालक आणि कुपोषित बालकामध्ये धान्य वितरणात मोठी तफावत आहे. कुपोषित बालकाला अधिक धान्य गरजेचे आहे. असे असले तरी त्यांना कमी धान्य देण्याचे कारण काय असावे, हा प्रश्न पालकांना पडला आहे. यामुळे पालक अंगणवाडीताईला जाब विचारतात. मात्र आहाराचे प्रमाण वरिष्ठ स्तरावरून ठरल्याचे सांगण्याशिवाय त्यांच्या हाती काहीच नाही.अशी आहे धान्य वितरणातील तफावतसुदृढ बालकगहू ३ किलो १०० ग्रॅम, मटकी १ किलो ३०० ग्रॅम, मुग १ किलो ३०० ग्रॅम, सोयाबीन तेल ५०० ग्रॅम, हळद २०० ग्रॅम, तिखट २०० ग्रॅम, मिठ ४०० ग्रॅम.कुपोषित बालककुपोषित बालकाला २२५० ग्रॅम गहू, चवळी ७५० ग्रॅम, मसूर ७५० ग्रॅम, तेल ५०० ग्रॅम, मीठ ३०० ग्रॅम, हळद १०० ग्रॅम, मिरची १०० ग्रॅम.३५ रुपयांची मदतकेंद्र शासनाने गरोदर मातांना ग्रामीण भागात थेट निधी देण्याची घोषणा केली आहे. मध्यंतरी त्यांना आहार मिळाला नाही. आता दीड महिन्यानंतर त्यांच्या खात्यात ३५ रुपये दरदिवस प्रमाणे निधी गोळा होणार आहे.

टॅग्स :Healthआरोग्य