शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
4
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
5
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
6
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
7
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
8
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
9
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
10
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
11
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
12
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
13
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
14
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
16
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
17
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
18
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
19
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
20
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
Daily Top 2Weekly Top 5

बेंबळा एक्स्प्रेस फीडरवर 35 तास वीज खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2022 05:00 IST

वीज जावून आल्यानंतर पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा असेल तरच मोटरपंप सुरू करता येतो. लाइट आल्यानंतर तत्काळ मोटरपंप सुरू करता येत नाही. पंप सुरू झाल्यानंतर प्रथम पाणी टाकीत चढवावे लागते. त्यानंतर पाणी ग्राहकांपर्यंत सोडता येते. दहा मिनिट लाइट गेली तरी टाकीची लेव्हल मेंटन करण्यासाठी साडेचार तासांचा अवधी लागतो. अशा स्थितीत बिघाड आणि भारनियमनाचा गंभीर परिणाम होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यावर्षी प्रथमच जिल्ह्याच्या जलाशयांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे. मात्र पाणी असले तरी वीज नसल्याने हे पाणी वेळेवर मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बेंबळा प्रकल्पाच्या एक्स्प्रेस फीडरमध्ये बिघाड निर्माण झाल्याने सुमारे ३५ तास वीज पुरवठा ठप्प झाल्याने  प्राधिकरणाची यंत्रणा गारद झाली आहे. या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर पुन्हा पुरवठा सुरळीत करण्यात आला.   जिल्ह्यात सातत्याने उन्हाचा पारा ४० अंशावर असल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. वीज भारनियमनाचा सर्वच घटकांवर परिणाम होताना दिसत आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पाणीपुरवठ्याच्या स्वतंत्र वीजजोडण्या आहे. यावर मोठ्या होल्टेजचे मोटरपंप बसविलेले आहे. त्याला अखंडितपणे वीज आवश्यक आहे; परंतु विजेचा तुटवडा निर्माण झाल्याने पाणीपुरवठ्याला त्याचा फटका बसतो आहे. यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी बेंबळा प्रकल्पावरून विशेष पाइपलाइन जोडण्यात आली आहे. यासाठी एक्स्प्रेस फीडरही आहे. ज्या ठिकाणी एक्स्प्रेस फीडर असतो तेथे विजेचा पुरवठा सेकंदासाठीही खंडित होणार नाही याची दक्षता घेतली जाते. सुरळीत पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने एक्स्प्रेस फीडरकडे अत्यावश्यक बाब म्हणून  पाहिले जाते. मात्र, या ठिकाणी एक-दोन तास नव्हे तर तब्बल ३५ तास वीजपुरवठा खंडित  होता. यामुळे प्राधिकरणाचे पाण्याचे नियोजन पूर्णत: कोलमडले आहे. शहराच्या सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी वीजपुरवठा सुरळीत राखणे आवश्यक आहे. दुसरीकडे दुरुस्ती कामेही तातडीने न उरकल्यास हा उन्हाळा यवतमाळकरांसाठी चिंता वाढविणारा ठरेल.

दहा मिनिट वीज गेली तर साडेचार तासांचा गॅप- वीज जावून आल्यानंतर पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा असेल तरच मोटरपंप सुरू करता येतो. लाइट आल्यानंतर तत्काळ मोटरपंप सुरू करता येत नाही. पंप सुरू झाल्यानंतर प्रथम पाणी टाकीत चढवावे लागते. त्यानंतर पाणी ग्राहकांपर्यंत सोडता येते. दहा मिनिट लाइट गेली तरी टाकीची लेव्हल मेंटन करण्यासाठी साडेचार तासांचा अवधी लागतो. अशा स्थितीत बिघाड आणि भारनियमनाचा गंभीर परिणाम होत आहे.

नियमित वीजपुरवठा असेल तर चार दिवसाआड पाणी - भारनियमन नसेल आणि इतर कुठल्याही अडचणी नसतील तर प्रत्येक प्रभागाला चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा करता येतो. तसे नियोजन प्राधिकरणाने केले आहे. मात्र वारंवार पाइपलाइन फुटणे, वीजपुरवठा खंडित होणे यासह इतर कारणांनी शहर पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळीत होत आहे. त्यातही भारनियमनाचा मोठा फटका सोसावा लागत आहे.

निळाणात ६५, तर चापडोहात ५१ टक्के पाणी- शहराला पाणीपुरवठा करणारे निळाेणा आणि चापडोह या दोन्ही प्रकल्पात यंदा चांगला जलसाठा आहे. दरवर्षी एप्रिल महिन्यात या प्रकल्पांमध्ये १५ ते २० टक्के पाणी शिल्लक राहते. यावर्षी निळोणा प्रकल्पामध्ये ६५ टक्के, तर चापडोह प्रकल्पामध्ये ५१ टक्के पाणी शिल्लक आहे. उपलब्ध जलसाठा दिवाळीपर्यंत पाणी पुरेल, असा अंदाज आहे.

भारनियमनासह वीज वितरण कंपनीच्या तांत्रिक अडचणीमुळे फीडर बंद पडले होते. याशिवाय प्राधिकरणाची पाइपलाइनही निळोण्याच्या जवळ फुटली होती. या कारणांमुळे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक बिघडले. आता वीजपुरवठा पूर्ववत सुरळीत झाला आहे. बेंबळाच्या एक्सप्रेस फीडरवर दुरुस्ती झाली आहे. यामुळे हा प्रश्न आता निकाली निघाला आहे. आपण स्वत: या विषयात वीज कंपनीच्या वरिष्ठांशी बोललो.- अमोल येडगे, जिल्हाधिकारी

यवतमाळकरांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी प्राधिकरणाची यंत्रणा झटत आहे. मात्र वीज भारनियमनाने वेळापत्रक बिघडविले आहे. वरिष्ठांच्या कानावर हा प्रकार टाकला आहे. किमान पाणीपुरवठा करणाऱ्या ठिकाणी विजेचा खंड नसावा, अशी अपेक्षा आहे. तरच पाणीपुरवठा सुरळीत राहील. - निखिल कवठळकर, उपविभागीय अभियंता, जीवन प्राधिकरण

 

टॅग्स :water shortageपाणीकपातelectricityवीज