शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
2
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
3
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
4
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
5
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
6
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
7
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
8
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
9
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
10
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
11
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
12
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
13
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
14
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
15
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
16
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
17
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
18
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
19
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
20
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 

बोगस बियाण्यांच्या ३० हजारांवर तक्रारी; पूर्ण नुकसानभरपाई कठीण, दादा भुसे यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 05:55 IST

राज्यात जवळपास ४० लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होतो. महाबीजसह काही खासगी कंपन्यांचेही बियाणे बोगस असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहे. या तक्रारींचा निपटारा केला जात आहे.

यवतमाळ : कापूस आणि सोयाबीनच्या बोगस बियाण्यांमुळे नुकसान झाल्याच्या ३० हजारांवर शेतकऱ्यांनी राज्यभरातून तक्रारी केल्या आहे. या तक्रारींचे निराकरण करण्याचे काम प्रगतीपथावर आहे, असे कृषिमंत्री दादा भुसे यांनी रविवारी यवतमाळात सांगितले.राज्यात जवळपास ४० लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होतो. महाबीजसह काही खासगी कंपन्यांचेही बियाणे बोगस असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहे. या तक्रारींचा निपटारा केला जात आहे. महाबीजकडून पर्यायी बियाणे देण्यात येत आहे. त्यांच्याकडे दहा हजार क्विंटल अतिरिक्त बियाण्यांचे नियोजन होते. त्यातूनच हे बियाणे दिले जात आहे. शेतकऱ्यांनी घरचेच बियाणे वापरावे, असे सांगण्यात आले होते.प्रत्येक गावात कृषी सहायकाच्या माध्यमातून घरगुती बियाण्यांची उत्पादन क्षमता निश्चित करण्याचे प्रयोग राबविण्यात आले. यामुळे बºयाच शेतकºयांनी घरच्याच दर्जेदार बियाण्यांचा वापर केला. त्यामुळे बोगस बियाण्यांमुळे होणाºया नुकसानीचे प्रमाण बºयाच अंशी कमी करता आले आहे. आता ज्या कंपन्यांकडून अशा बियाण्यांचा पुरवठा झाला, त्यांच्याविरोधात कारवाई केली जात आहे. ही कारवाई करण्यासाठी उपविभागीय कृषी अधिकाºयाचे अधिकार तालुका कृषी अधिकाºयांना देण्यात आले. त्यामुळे तात्काळ पंचनामे करून पुढील कारवाई केली जात आहे. जो दोषी असेल त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. त्यातून कुणीही सुटणार नाही, अशी ग्वाही कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली.

टॅग्स :agricultureशेतीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार