शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

बोगस बियाण्यांच्या ३० हजारांवर तक्रारी; पूर्ण नुकसानभरपाई कठीण, दादा भुसे यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 05:55 IST

राज्यात जवळपास ४० लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होतो. महाबीजसह काही खासगी कंपन्यांचेही बियाणे बोगस असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहे. या तक्रारींचा निपटारा केला जात आहे.

यवतमाळ : कापूस आणि सोयाबीनच्या बोगस बियाण्यांमुळे नुकसान झाल्याच्या ३० हजारांवर शेतकऱ्यांनी राज्यभरातून तक्रारी केल्या आहे. या तक्रारींचे निराकरण करण्याचे काम प्रगतीपथावर आहे, असे कृषिमंत्री दादा भुसे यांनी रविवारी यवतमाळात सांगितले.राज्यात जवळपास ४० लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होतो. महाबीजसह काही खासगी कंपन्यांचेही बियाणे बोगस असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहे. या तक्रारींचा निपटारा केला जात आहे. महाबीजकडून पर्यायी बियाणे देण्यात येत आहे. त्यांच्याकडे दहा हजार क्विंटल अतिरिक्त बियाण्यांचे नियोजन होते. त्यातूनच हे बियाणे दिले जात आहे. शेतकऱ्यांनी घरचेच बियाणे वापरावे, असे सांगण्यात आले होते.प्रत्येक गावात कृषी सहायकाच्या माध्यमातून घरगुती बियाण्यांची उत्पादन क्षमता निश्चित करण्याचे प्रयोग राबविण्यात आले. यामुळे बºयाच शेतकºयांनी घरच्याच दर्जेदार बियाण्यांचा वापर केला. त्यामुळे बोगस बियाण्यांमुळे होणाºया नुकसानीचे प्रमाण बºयाच अंशी कमी करता आले आहे. आता ज्या कंपन्यांकडून अशा बियाण्यांचा पुरवठा झाला, त्यांच्याविरोधात कारवाई केली जात आहे. ही कारवाई करण्यासाठी उपविभागीय कृषी अधिकाºयाचे अधिकार तालुका कृषी अधिकाºयांना देण्यात आले. त्यामुळे तात्काळ पंचनामे करून पुढील कारवाई केली जात आहे. जो दोषी असेल त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. त्यातून कुणीही सुटणार नाही, अशी ग्वाही कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली.

टॅग्स :agricultureशेतीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार