शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

जिल्ह्यात आढळले ३० शाळाबाह्य मुले; शोधमोहिमेतून उघड, शाळेत केले दाखल

By अविनाश साबापुरे | Updated: November 6, 2023 20:25 IST

मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा झाला तरी अजूनही अनेक मुले शाळेपासून दूर असल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे.

यवतमाळ: मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा झाला तरी अजूनही अनेक मुले शाळेपासून दूर असल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. शिक्षण विभागाने राबविलेल्या शोधमोहिमेतून तब्बल ३० मुले शाळाबाह्य असल्याचे स्पष्ट झाले. त्याहून गंभीर म्हणजे, ५० मुले पालकांच्या रोजगारासाठी गाव सोडून परजिल्ह्यात गेले आहेत. राज्य शासनाच्या निर्देशानुसार, जिल्ह्यात १७ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम राबविण्यात आली होती. त्यामध्ये शिक्षण विभागासोबतच महिला व बालविकास, समाज कल्याण अधिकारी, कामगार आयुक्त, प्रशासन अधिकारी, प्रकल्प अधिकारी आदी विभागांच्या मदतीने ही मोहीम राबविण्यात आली. तर शिक्षक, मुख्याध्यापिका, अंगणवाडी सेविका, विषय साधन व्यक्ती, दिव्यांग शिक्षण समन्वय आदी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सोळाही तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यात आले. यात तब्बल ३० मुले ही शाळाबाह्य असल्याचे आढळून आले. 

या सर्व ३० मुलांना शिक्षण विभागाने नजीकच्या शाळेत दाखल करून घेतले आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, सीईओ डाॅ. मैनाक घोष, शिक्षणाधिकारी किशोर पागोरे यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा आढावा घेण्यात आला होता. त्यात जिल्हा शाळाबाह्यमुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.  

५३ मुले यवतमाळच्या शाळेत दाखलया मोहिमेदरम्यान आणखी एक वेगळी माहिती शिक्षण विभागाच्या हाती लागली. ५३ विद्यार्थी परजिल्ह्यातून किंवा परराज्यातून आपल्या पालकांसोबत यवतमाळ जिल्ह्यात आले आहेत. सर्वेक्षणानुसार, २१ मुले एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात आली आहेत. २० मुले वाशीम, ठाणे, अमरावती, नांदेड, जळगाव, पुणे, नागपूर व इतर जिल्ह्यातून आली आहेत. तर १२ मुले परराज्यातू स्थलांतरित झाली आहेत. गुजरात, तेलंगणा, मध्य प्रदेश आदी राज्यांतून ही मुले आल्याचे सर्वेक्षणात दिसून आले. त्यांना शिक्षण विभागाने जिल्ह्यातील शाळांमध्ये प्रवेश मिळवून दिला. 

५० मुले घेऊन गेली शिक्षण हमी कार्डयावर्षी जिल्ह्यातून तब्बल ५० मुलांनी स्थलांतर केले आहे. पालकांनी रोजगारासाठी गाव सोडल्यामुळे मुलांनाही त्यांच्यासोबत जावे लागले. मात्र त्यांचे शिक्षण अर्धवट राहू नये यासाठी त्यांना शिक्षण हमी कार्ड देण्यात आले. १६ मुले एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात स्थलांतरित झाली आहेत. तर ३४ मुले इतर जिल्ह्यांमध्ये गेलेली आहेत. त्यांच्या नावासह संपूर्ण यादी शासनाला सादर करून वर्धा, चंद्रपूर, संभाजीनगर, पुणे, वाशिम, बुलडाणा, बीड, लातूर अशा जिल्ह्यांतील शाळांमध्ये शिक्षण हमी कार्डावर त्यांचे प्रवेश करून देण्यात आले आहेत. 

कुठे आढळली शाळाबाह्य मुले?आर्णी : ०२दिग्रस : १५घाटंजी : ०१यवतमाळ : ०६दारव्हा : ०३मारेगाव : ०१पुसद : ०२ 

टॅग्स :YavatmalयवतमाळSchoolशाळा