शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

बेंबळातून पाणी पुरवठ्यासाठी २९ किमीची पाईपलाईन

By admin | Updated: July 3, 2017 02:01 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा आणि चापडोह प्रकल्पाचे पाणी अपुरे पडते. आता बेंबळा प्रकल्पातील पाणी

टाकळीत जलशुद्धीकरण केंद्र : अडीच वर्षात प्रकल्पाचे काम पूर्र्र्ण होणार, यवतमाळकरांना मिळणार मुबलक पाणी लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा आणि चापडोह प्रकल्पाचे पाणी अपुरे पडते. आता बेंबळा प्रकल्पातील पाणी यवतमाळकडे वळते करण्यात येत आहे. ३०२ कोटींच्या प्रकल्पाला पूर्णत्वास येण्यास अडीच वर्षाचा अवधी लागणार आहे. ठरलेल्या कालावधीपूर्वीच प्राधिकरणाने युद्धपातळीवर कामाला प्रारंभ केला असून पाईपलाईन जोडणीसोबत जाकवेल आणि जलशुद्धिकरण केंद्राचे काम सुरू करण्यात आले आहे.यवतमाळ शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येला पाणी अपुरे पडत आहे. भविष्यात निळोणा आणि चापडोह प्रकल्पाचे पाणीही अपुरे पडणार आहे. यामुळे बेंबळा प्रकल्पातून यवतमाळकरांची तहान भागविण्यात येणार आहे. भविष्यात यवतमाळात २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी नगरपरिषदेच्या ‘अमृत’ योजनेतून हे काम हाती घेण्यात आले. अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब करून हा पेयजल प्रकल्प उभारला जात आहे. यासाठी ३०२ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.बेंबळा प्रकल्पाच्या जाकवेलचे काम प्रकल्प क्षेत्रात सुरू झाले आहे. प्रकल्प क्षेत्रालगतच्या टाकळी येथे जलशुद्धिकरण केंद्र उभारण्यात येत आहे. तेथून थेट जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयापर्यंत २९ किलोमीटर लांबीची पाईपलाईन टाकली जात आहे. साडेआठ किमी पाईपलाईनचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. रस्ता रूंदीकरणासोबतच पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी डीआयके नऊ प्रकारातील पाईप वापरण्यात येत आहे. त्याचा व्यास आठशे एमएम आहे. समोरील पाईपलाईन एक हजार मीमी डायमीटरची आहे. हे पाईप वरून लोखंडी आहेत आणि आत सिमेंटचा वापर करण्यात आला. ५० वर्षापेक्षा अधिक काळ हे पाईप टिकण्याची हमी देण्यात आली आहे.नवीन तंत्रज्ञानाचा वापरकंत्राटदार कंपनीला सलग पाच वर्षे पाईपलाईनची टेस्टिंग करून द्यावी लागणार आहे. बेंबळाचे जलशुद्धिकरण केंद्र आॅटोमॅटीक आहे. पाणी भरण्यापासून ते बंद करण्याची प्रक्रिया अद्ययावत पद्धतीची आहे. पाईपलाईन लिकेज असल्यास, तसा सायरन वाजणार आहे. यामुळे कुठे बिघाड झाल्यास, त्याची माहिती तत्काळ कळणार आहे.