शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

बेंबळातून पाणी पुरवठ्यासाठी २९ किमीची पाईपलाईन

By admin | Updated: July 3, 2017 02:01 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा आणि चापडोह प्रकल्पाचे पाणी अपुरे पडते. आता बेंबळा प्रकल्पातील पाणी

टाकळीत जलशुद्धीकरण केंद्र : अडीच वर्षात प्रकल्पाचे काम पूर्र्र्ण होणार, यवतमाळकरांना मिळणार मुबलक पाणी लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा आणि चापडोह प्रकल्पाचे पाणी अपुरे पडते. आता बेंबळा प्रकल्पातील पाणी यवतमाळकडे वळते करण्यात येत आहे. ३०२ कोटींच्या प्रकल्पाला पूर्णत्वास येण्यास अडीच वर्षाचा अवधी लागणार आहे. ठरलेल्या कालावधीपूर्वीच प्राधिकरणाने युद्धपातळीवर कामाला प्रारंभ केला असून पाईपलाईन जोडणीसोबत जाकवेल आणि जलशुद्धिकरण केंद्राचे काम सुरू करण्यात आले आहे.यवतमाळ शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येला पाणी अपुरे पडत आहे. भविष्यात निळोणा आणि चापडोह प्रकल्पाचे पाणीही अपुरे पडणार आहे. यामुळे बेंबळा प्रकल्पातून यवतमाळकरांची तहान भागविण्यात येणार आहे. भविष्यात यवतमाळात २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी नगरपरिषदेच्या ‘अमृत’ योजनेतून हे काम हाती घेण्यात आले. अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब करून हा पेयजल प्रकल्प उभारला जात आहे. यासाठी ३०२ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.बेंबळा प्रकल्पाच्या जाकवेलचे काम प्रकल्प क्षेत्रात सुरू झाले आहे. प्रकल्प क्षेत्रालगतच्या टाकळी येथे जलशुद्धिकरण केंद्र उभारण्यात येत आहे. तेथून थेट जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयापर्यंत २९ किलोमीटर लांबीची पाईपलाईन टाकली जात आहे. साडेआठ किमी पाईपलाईनचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. रस्ता रूंदीकरणासोबतच पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी डीआयके नऊ प्रकारातील पाईप वापरण्यात येत आहे. त्याचा व्यास आठशे एमएम आहे. समोरील पाईपलाईन एक हजार मीमी डायमीटरची आहे. हे पाईप वरून लोखंडी आहेत आणि आत सिमेंटचा वापर करण्यात आला. ५० वर्षापेक्षा अधिक काळ हे पाईप टिकण्याची हमी देण्यात आली आहे.नवीन तंत्रज्ञानाचा वापरकंत्राटदार कंपनीला सलग पाच वर्षे पाईपलाईनची टेस्टिंग करून द्यावी लागणार आहे. बेंबळाचे जलशुद्धिकरण केंद्र आॅटोमॅटीक आहे. पाणी भरण्यापासून ते बंद करण्याची प्रक्रिया अद्ययावत पद्धतीची आहे. पाईपलाईन लिकेज असल्यास, तसा सायरन वाजणार आहे. यामुळे कुठे बिघाड झाल्यास, त्याची माहिती तत्काळ कळणार आहे.