शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
2
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
3
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
4
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
5
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
6
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
7
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
8
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
9
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
10
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
11
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
12
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
13
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
14
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
15
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत
16
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
17
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
18
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
19
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
20
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो

२५० गावांनी केला तंटामुक्तीचा संकल्प

By admin | Updated: May 3, 2015 00:02 IST

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या २०१४-१५ या आठव्या वर्षात जिल्ह्यातील २५० गावांनी तंटामुक्त झाल्याचे ठराव ...

मूल्यमापन कार्यशाळा : शुक्रवारी गावोगावी झाल्या ग्रामसभावणी : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या २०१४-१५ या आठव्या वर्षात जिल्ह्यातील २५० गावांनी तंटामुक्त झाल्याचे ठराव जिल्हा समितीकडे सादर केल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रशासनाने दिली.सन २००६-०७ या वर्षांपासून दिवंगत गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी राज्यात तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली. राज्यातील प्रत्येक गाव शांततेतून समृद्धीकडे मार्गक्रमण करेल, असा उदात्त हेतू या मोहिमेमागे होता. गेल्या सात वर्षात या मोहिमेच्या माध्यमातून लाखो तंटे समितीच्या माध्यमातून गाव पातळीवर मिटविण्यातही आले. बहुतांश गावांनी तंटामुक्त होऊन लाखो रूपयांची बक्षिसे आपल्या पदरात पाडून गावाच्या विकासाला हातभार लावला. आता मोजकीच काही गावे शिल्लक असून त्या गावांचीही तंटामुक्त होण्यासाठी धडपड सुरू आहे. यावर्षी यवतमाळ जिल्ह्यातील २५० गावांनी या मोहिमेत सहभाग नोंदविला. शुक्रवारी १ मे रोजी गावात ग्रामसभा घेऊन आमच गाव तंटामुक्त झाल्याचा ठराव पारित केला. स्वयंमूल्यमापनाने गाव आता तंटामुक्त झाले. आता या गावांचे ५ मे ते ५ जून या काळत जिल्हा अंतर्गत मूल्यमापन समिती मूल्यमापन करणार आहे. जूनच्या उत्तरार्धात जिल्हाबाह्य मूल्यमापन समिती परीक्षण करणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सोळाही तालुका मूल्यमापन समित्यांची कार्यशाळा २९ एप्रिलला जिल्हा पोलीस मुख्यालयात घेण्यात आली. प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक डोखोरे, पांढरकवडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी भालचंद्र महाजन व लोकमतचे वणी येथील स्थानिक प्रतिनिधी विनोद ताजने यांनी यावेळी मार्गदर्शन करून मोहिमेचे स्वरूप, मूल्यमापनाच्या पद्धतीबाबत सविस्तर माहिती दिली. मागीलवर्षी यवतमाळ जिल्ह्याचा या मोहिमेत राज्यातून तिसरा क्रमांक आला होता. यावर्षीसुद्धा २५० पैकी २२५ गावे तंटामुक्त होतील, असा विश्वास डाखोरे यांनी यावेळी व्यक्त केला. त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या गोपनीय शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यांनी कसून मेहनत घ्यावी, पोलीस ठाणे क्षेत्रातील अधिकाधिक गावे तंटामुक्त करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विशेष कार्याचा प्रस्ताव संबंधित ठाणेदारांनी जिल्हा कार्यालयास पाठवावा, अशा पोलीस कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव केला जाईल, असे आश्वासन डोखोरे यांनी दिले. मूल्यमापन समितीत कार्य करणाऱ्या पत्रकाराला शासनाने सेवाकाळाचे मानधन मंजूर करावे, अशी मागणीही करण्यात आली. (स्थानिक प्रतिनिधी)