शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
2
१,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक...
3
'लॅन्ड फॉर जॉब' घोटाळ्यात लालू यादव यांना मोठा धक्का! पण 'या' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
4
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
लेकीच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी गमावला दीड वर्षांचा मुलगा; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
6
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
7
विजेचा झटका दिला, गर्भपात करायला लावला; एका 'थार'साठी नवऱ्याने मनीषासोबत काय काय केलं? झाला मोठा खुलासा
8
पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक व्याज मिळतं का? चेक करा डिटेल्स
9
६ महिन्यात सोन्यात तब्बल २६% वाढ! आता अजून वाढणार? 'या' ५ मार्गांनी करू शकता गुंतवणूक
10
हृदयद्रावक! हिमाचल प्रदेशात निसर्ग कोपला, डोंगरावरून खाली आले दगड; आई-मुलाचा मृत्यू
11
आधी ९० तास काम करण्याचा दिलेला सल्ला; आता त्यांचाच पगार २५ कोटींनी वाढला, किती मिळणार पॅकेज
12
Cast Certificate: 'त्या' लोकांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द होणार; विधान परिषदेत फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले...
13
पती निक जोनाससोबत प्रियांका चोप्राचं लिप-लॉक, समुद्रकिनाऱ्यावरच रोमँटिक झालं कपल; बघा लेटेस्ट VIDEO
14
नो फोटो प्लीज! सिद्धार्थ मल्होत्राची पापाराझींना विनंती; म्हणाला, "फक्त आशीर्वाद द्या..."
15
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
16
'ही' आयटी कंपनी देणार २५०% लाभांश, तुमच्याकडे शेअर आहेत का? रेकॉर्ड डेट लगेच बघा!
17
५ वर्षांनंतर पाकिस्तानला यूके उड्डाणाची मुभा मिळाली! पण 'बनावट पायलट' घोटाळ्याचा शिक्का अजूनही कायम?
18
"नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन...", विधानभवनात पडळकर-आव्हाडांचे कार्यकर्ते भिडल्यानंतर मराठी अभिनेत्याचा टोला
19
६ महिन्यांपूर्वी लग्न मोडलं, मुलीने दुसरीकडे स्थळ बघायला सुरुवात केली; रागाने तरुण ऑफिसमध्ये पोहोचला अन्...
20
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू

२५० गावांनी केला तंटामुक्तीचा संकल्प

By admin | Updated: May 3, 2015 00:02 IST

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या २०१४-१५ या आठव्या वर्षात जिल्ह्यातील २५० गावांनी तंटामुक्त झाल्याचे ठराव ...

मूल्यमापन कार्यशाळा : शुक्रवारी गावोगावी झाल्या ग्रामसभावणी : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या २०१४-१५ या आठव्या वर्षात जिल्ह्यातील २५० गावांनी तंटामुक्त झाल्याचे ठराव जिल्हा समितीकडे सादर केल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रशासनाने दिली.सन २००६-०७ या वर्षांपासून दिवंगत गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी राज्यात तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली. राज्यातील प्रत्येक गाव शांततेतून समृद्धीकडे मार्गक्रमण करेल, असा उदात्त हेतू या मोहिमेमागे होता. गेल्या सात वर्षात या मोहिमेच्या माध्यमातून लाखो तंटे समितीच्या माध्यमातून गाव पातळीवर मिटविण्यातही आले. बहुतांश गावांनी तंटामुक्त होऊन लाखो रूपयांची बक्षिसे आपल्या पदरात पाडून गावाच्या विकासाला हातभार लावला. आता मोजकीच काही गावे शिल्लक असून त्या गावांचीही तंटामुक्त होण्यासाठी धडपड सुरू आहे. यावर्षी यवतमाळ जिल्ह्यातील २५० गावांनी या मोहिमेत सहभाग नोंदविला. शुक्रवारी १ मे रोजी गावात ग्रामसभा घेऊन आमच गाव तंटामुक्त झाल्याचा ठराव पारित केला. स्वयंमूल्यमापनाने गाव आता तंटामुक्त झाले. आता या गावांचे ५ मे ते ५ जून या काळत जिल्हा अंतर्गत मूल्यमापन समिती मूल्यमापन करणार आहे. जूनच्या उत्तरार्धात जिल्हाबाह्य मूल्यमापन समिती परीक्षण करणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सोळाही तालुका मूल्यमापन समित्यांची कार्यशाळा २९ एप्रिलला जिल्हा पोलीस मुख्यालयात घेण्यात आली. प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक डोखोरे, पांढरकवडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी भालचंद्र महाजन व लोकमतचे वणी येथील स्थानिक प्रतिनिधी विनोद ताजने यांनी यावेळी मार्गदर्शन करून मोहिमेचे स्वरूप, मूल्यमापनाच्या पद्धतीबाबत सविस्तर माहिती दिली. मागीलवर्षी यवतमाळ जिल्ह्याचा या मोहिमेत राज्यातून तिसरा क्रमांक आला होता. यावर्षीसुद्धा २५० पैकी २२५ गावे तंटामुक्त होतील, असा विश्वास डाखोरे यांनी यावेळी व्यक्त केला. त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या गोपनीय शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यांनी कसून मेहनत घ्यावी, पोलीस ठाणे क्षेत्रातील अधिकाधिक गावे तंटामुक्त करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विशेष कार्याचा प्रस्ताव संबंधित ठाणेदारांनी जिल्हा कार्यालयास पाठवावा, अशा पोलीस कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव केला जाईल, असे आश्वासन डोखोरे यांनी दिले. मूल्यमापन समितीत कार्य करणाऱ्या पत्रकाराला शासनाने सेवाकाळाचे मानधन मंजूर करावे, अशी मागणीही करण्यात आली. (स्थानिक प्रतिनिधी)