शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

2100 चालक-वाहकांचा रोज सव्वा लाख प्रवाशांशी संपर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 05:00 IST

जिल्ह्यामध्ये लाॅकडाऊननंतरच्या काळात दरदिवसाला दीड लाख प्रवासी घेऊन जाणारी एसटी बस नव्याने संचारबंदी लागू झाल्यावर एक लाख दहा हजार प्रवासी ने-आण करण्याचे काम नित्याने करीत आहे. या प्रवाशांच्या संपर्कात येणारे वाहक आणि चालक कोरोना काळात सर्वाधिक अफेक्टेड होऊ शकतात. यामुळे कोरोनासारख्या भयंकर आजारापासून या कर्मचाऱ्यांना सुरक्षित करण्यासाठी लसीकरण करणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देदररोज जनसंपर्क येऊनही कोरोना लस देण्याचा विचार झालाच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास, असे ब्रीद वाक्य घेऊन चालणारी एसटी कोरोनानंतरच्या काळातही प्रवाशांना अविरत सेवा देत आली आहे. या सेवेकरिता झटणारे कर्मचारी मात्र, अजूनही महामारीत असुरक्षित आहेत. त्यांना लस उपलब्ध करून सुरक्षित करावे, अशी मागणी वाहक आणि चालकांकडून जाेर धरत आहे.जिल्ह्यामध्ये लाॅकडाऊननंतरच्या काळात दरदिवसाला दीड लाख प्रवासी घेऊन जाणारी एसटी बस नव्याने संचारबंदी लागू झाल्यावर एक लाख दहा हजार प्रवासी ने-आण करण्याचे काम नित्याने करीत आहे. या प्रवाशांच्या संपर्कात येणारे वाहक आणि चालक कोरोना काळात सर्वाधिक अफेक्टेड होऊ शकतात. यामुळे कोरोनासारख्या भयंकर आजारापासून या कर्मचाऱ्यांना सुरक्षित करण्यासाठी लसीकरण करणे गरजेचे आहे. असे केले तरच वाहक आणि चालक सुरक्षित होतील. त्यांच्याकडून इतरांना धोकाही होणार नाही किंवा इतरांकडून त्यांनाही कोरोनाची लागण होणार नाही. यामुळे गावखेड्यातून शहरात प्रवासी घेऊन येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुरक्षित होईल. यासाठी आरोग्य विभागाने एसटी कर्मचाऱ्यांचे महत्त्व लक्षात घेत प्राधान्याने आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी विविध संघटनांच्या माध्यमातून रेटली जात आहे. अद्यापही लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभागाकडून कुठलाही होकार आला नाही. जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांची संख्या मात्र मागविण्यात आली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे. एसटीने प्रवास करताना अनेक प्रवासी खासगी वाहनांचा विचार करताना पाहायला मिळतात. याचे मूळ कारण कोरोनाबाबत उपाययोजना नसल्याचे सांगितले जात आहे. यामुळे एसटीच्या उत्पन्नावरही त्याचा परिणाम होत आहे. याकरिता वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.

११०००० प्रवाशांचा रोज प्रवास

गावापासून शहरापर्यंत प्रवाशांना ने-आण करण्याचे काम एसटी करते. दर दिवसाला राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसमधून एक लाख दहा हजार प्रवासी प्रवास करतात. वाहक आणि चालक या प्रवाशांच्या दररोज संपर्कात असतात. यामुळे या कर्मचाऱ्यांवर कोरोनाचे सावट अधिक गडद झाले आहे. त्यांना सुरक्षित करण्यासाठी लसीकरणाची गरज आहे.

तपासणीच नाही

कोरोना याेद्धा म्हणून डाॅक्टर, पोलीस, महसूल कर्मचारी, आशा यांना प्रथम तपासणी करून लसीकरण करण्यात आले. मात्र, सर्वाधिक जनसंपर्क असलेल्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना तपासल्याच गेले नाही. त्यांना लसीकरणासाठी लसही अद्यापपर्यंत उपलब्ध झाली नाही.

विभागीय कार्यालयाकडून जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचा अहवाल मागविण्यात आला आहे. त्यांना औषधोपचार करण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. यामध्ये लसीकरणासाठी विभागाकडे मागणी नोंदविण्यात येणार आहे. यामुळे लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे.- श्रीनिवास जोशी, विभाग नियंत्रक

एसटीच्या कर्मचाऱ्यांना सुरक्षित करण्यासाठी सीएसकडे कोरोना लसीची मागणी करण्यात आली आहे. तसा प्रस्तावही आज जिल्हा प्रशासनाकडे, आरोग्य यंत्रणेकडे पाठविण्यात आला आहे. लवकरच यासंदर्भात उपाययोजना होण्याची शक्यता आहे. यामुळे कर्मचारी सुरक्षित होतील.- संदीप मडावी, कामगार अधिकारी

कर्मचाऱ्यांना सुरक्षित करण्यासाठी संघटनेने विभागीय कार्यालयाकडे लसीकरणाची मागणी केली आहे. कर्मचारी अत्यावश्यक सेवा देणारे घटक आहेत. वेगवेगळ्या प्रवाशांशी त्यांचा संपर्क येतो. यामुळे त्यांना सुरक्षित करण्यासाठी कोरोनाची लस महत्त्वाची आहे.- गणेश गावंडे, अध्यक्ष, कामगार सेना