शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

बेंबळाचे २० गेट उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 21:58 IST

संततधार पावसामुळे बेंबळा धरणाचे २० दरवाजे उघडण्यात आले असून प्रती सेकंद ४८० घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान शहरानजीकच्या नदीला पूर आल्याने काठावरील चार कुटुंबाना नगरपंचायतीने उर्दू शाळेत हलविले आहे.

ठळक मुद्देबाभूळगावात पूर : चार कुटुंबांना हलविले

लोकमत न्यूज नेटवर्कबाभूळगाव : संततधार पावसामुळे बेंबळा धरणाचे २० दरवाजे उघडण्यात आले असून प्रती सेकंद ४८० घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान शहरानजीकच्या नदीला पूर आल्याने काठावरील चार कुटुंबाना नगरपंचायतीने उर्दू शाळेत हलविले आहे.मुसळधार पावसामुळे बेंबळा धरणाचे बुधवारी रात्री १० वाजतापासून १० दरवाजे उघडण्यात आले. इतर १० दरवाचे सुद्धा २५ सेंटीमीटरने उघडण्यात आले. बेंबळात १ जून पर्यंत केवळ १० टक्केच पाणी होते. सध्या ४० टक्केच जलसाठा आहे. तरीही २० दरवाजे उघडण्यात आल्याने हे धरण पूर्णपणे भरूच द्यायचे नाही, असे दिसून येत आहे. धरणाचे पाणी सोडल्यामुळे बेंबळानदी काठावरील सावंगी (मांग) गावाला पुराचा वेढा पडला आहे. बाभूळगावातील एका पुलावरुन पुराचे पाणी वाहत आहे. यामुळे गुरुवारी दिवसभर हा मार्ग बंद होता.शहरालगतच्या नदीला गुरुवारी पूर आल्यामुळे काठावरील चार कुटुंबाना उर्दू शाळेत हलविण्यात आले. या कुटुंबाची जेवणाची व्यवस्था नगरपंचायतीने केली. यावेळी नगराध्यक्ष प्रवीण गौरकार, उपाध्यक्ष चंद्रकांत परचाके, कांग्रेसचे गटनेते श्रीकांत कापसे, शेख कादर, नईम खान, अनिकेत पोहेकर, रियाज शेख, शेख आरम, मुख्याधिकारी अश्विनी पाटील उपस्थित होत्या. गुरुवारी पाऊस असल्याने आठवडी बाजाराला येणाऱ्या ग्राहकांची त्रेधातिरपट उडाली होती. पावसामुळे शहरातील विविध भागात पाणी साचून राहिले आहे. रस्त्यावरून मार्ग काढताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

टॅग्स :Bembla Damबेंबळा धरणRainपाऊस