शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

बेंबळाचे २० गेट उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 21:58 IST

संततधार पावसामुळे बेंबळा धरणाचे २० दरवाजे उघडण्यात आले असून प्रती सेकंद ४८० घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान शहरानजीकच्या नदीला पूर आल्याने काठावरील चार कुटुंबाना नगरपंचायतीने उर्दू शाळेत हलविले आहे.

ठळक मुद्देबाभूळगावात पूर : चार कुटुंबांना हलविले

लोकमत न्यूज नेटवर्कबाभूळगाव : संततधार पावसामुळे बेंबळा धरणाचे २० दरवाजे उघडण्यात आले असून प्रती सेकंद ४८० घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान शहरानजीकच्या नदीला पूर आल्याने काठावरील चार कुटुंबाना नगरपंचायतीने उर्दू शाळेत हलविले आहे.मुसळधार पावसामुळे बेंबळा धरणाचे बुधवारी रात्री १० वाजतापासून १० दरवाजे उघडण्यात आले. इतर १० दरवाचे सुद्धा २५ सेंटीमीटरने उघडण्यात आले. बेंबळात १ जून पर्यंत केवळ १० टक्केच पाणी होते. सध्या ४० टक्केच जलसाठा आहे. तरीही २० दरवाजे उघडण्यात आल्याने हे धरण पूर्णपणे भरूच द्यायचे नाही, असे दिसून येत आहे. धरणाचे पाणी सोडल्यामुळे बेंबळानदी काठावरील सावंगी (मांग) गावाला पुराचा वेढा पडला आहे. बाभूळगावातील एका पुलावरुन पुराचे पाणी वाहत आहे. यामुळे गुरुवारी दिवसभर हा मार्ग बंद होता.शहरालगतच्या नदीला गुरुवारी पूर आल्यामुळे काठावरील चार कुटुंबाना उर्दू शाळेत हलविण्यात आले. या कुटुंबाची जेवणाची व्यवस्था नगरपंचायतीने केली. यावेळी नगराध्यक्ष प्रवीण गौरकार, उपाध्यक्ष चंद्रकांत परचाके, कांग्रेसचे गटनेते श्रीकांत कापसे, शेख कादर, नईम खान, अनिकेत पोहेकर, रियाज शेख, शेख आरम, मुख्याधिकारी अश्विनी पाटील उपस्थित होत्या. गुरुवारी पाऊस असल्याने आठवडी बाजाराला येणाऱ्या ग्राहकांची त्रेधातिरपट उडाली होती. पावसामुळे शहरातील विविध भागात पाणी साचून राहिले आहे. रस्त्यावरून मार्ग काढताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

टॅग्स :Bembla Damबेंबळा धरणRainपाऊस