शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

१७७ ग्रामपंचायतींची निवडणूक लांबणीवर

By admin | Updated: March 31, 2015 01:54 IST

जिल्ह्यातील आॅगस्ट महिन्यात मुदत संपणाऱ्या १७७ ग्रामपंचायींची निवडणूक लांबणीवर पडली असून पूर्वी

यवतमाळ : जिल्ह्यातील आॅगस्ट महिन्यात मुदत संपणाऱ्या १७७ ग्रामपंचायींची निवडणूक लांबणीवर पडली असून पूर्वी घोषित ६६३ ग्रामपंचायतींपैकी केवळ मे व जूलै महिन्यात मुदत पूर्ण होत असलेल्या ४८६ ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. यापूर्वी जाहीर करण्यात आलेला निवडणूक कार्यक्रमानुसारच ४८६ ग्रामपंचायतीची प्रक्रिया होणार आहे. यामध्ये नामांकनासोबत उमेदवाराला जात पडताळणी प्रमाणपत्राची पोच पावती जोडणे बंधनकारक केले आहे. निवडणूक आयोगाने आमदारांच्या सूचनेवरून आॅगस्टमध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीची निवडणूक पुढे घेण्याचा निर्णय घेतला. त्यावरून जिल्ह्यातील १७७ ग्रामपंचायतीची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. आता केवळ ४८६ ग्रामपंचायतीमध्ये घमासान होणार आहे. निर्णयाच्या अदलाबदलीमुळे गाव पुढाऱ्यांत संभ्रम निर्माण झाली आहे. वेळेवरच निर्णय बदलल्याने कोणत्या तालुक्यातील किती ग्रामपंचायतीच्या निवडणुका घ्यायचा या आकडेवारीची जुळवाजुळ निवडणूक विभागात सुरू होती. अनेकांनी तहसील कार्यालयात धाव होऊन ग्रामपंचायतीची मुदत केव्हा संपते आणि निवडणूक केव्हा होणार याची खातरजमा करून घेतली. अचानक निवडणूक जाहीर झाल्याने कागदपत्राची जुळवाजुळव करण्यात गाव पुढारी व्यस्त आहेत. अनेकांनी इच्छुकांच्या जात प्रमाण पत्रासठी उपविभागीय कार्यालयाकडे अर्ज केले आहेत. हे प्रमाणपत्र घेऊन आता त्यांना जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव सादर कराव लागणार आहे. नामांकनासोबत जात प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव सादर केल्याची पोच जोडावी लागणार आहे. शिवाय सहा महिन्याच्या आत जात पडताळणी प्रमाण पत्र देण्यात येईल , असे हमी पत्र द्यावे लागणार आहे. अन्यथा या सदस्यांवर अपात्रतेची कारवाई होणार आहे. या अटींची पूर्तता करतानाच गाव पुढाऱ्यांचा कस लागत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)