शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू, वाहून गेलेल्यांचा शोध सुरू; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
3
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
4
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
5
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
6
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
7
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
8
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
9
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
10
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
11
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
12
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
13
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
14
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
15
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
16
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
17
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
18
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
19
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!

एकाच महिन्यात रस्ता अपघाताचे १७ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 23:31 IST

जिल्ह्यात मार्च महिन्यात झालेल्या वेगवेगळ्या रस्ता अपघातात १७ जणांचा बळी गेला. तर ५० जणांवर अपंगत्वाची वेळ आली. यवतमाळातील सिग्नलवर झालेल्या अपघाताने संपूर्ण जिल्हा हादरुन गेला होता, ...

ठळक मुद्दे५० जणांना अपंगत्व : वेगाशी स्पर्धा आणि वाहतुकीचे नियम पायदळी

ज्ञानेश्वर मुंदे ।ऑनलाईन लोकमतयवतमाळ : जिल्ह्यात मार्च महिन्यात झालेल्या वेगवेगळ्या रस्ता अपघातात १७ जणांचा बळी गेला. तर ५० जणांवर अपंगत्वाची वेळ आली. यवतमाळातील सिग्नलवर झालेल्या अपघाताने संपूर्ण जिल्हा हादरुन गेला होता, तर दुचाकीच्या अपघातात दोन प्राध्यापकांना आपला जीव गमवावा लागला. टिप्परखाली चिरडून नायगाव येथे झालेला चिमुकलीचा मृत्यू मन हेलावून सोडणारा होता.वेगाशी स्पर्धा करीत वाहन चालविणे आणि वाहतुकीचे नियम पायदळी तुडविले की, अपघात निश्चितच होतो. जिल्हाभरात मार्च महिन्यात झालेल्या अपघातातही हीच कारणे आहेत. मार्च महिन्याची सुरुवात जवळा येथे एका ट्रकने तीन दुचाकींना धडक देऊन झाली. ५ मार्च रोजी झालेल्या अपघातात एक जण ठार तर पाच जण जखमी झाले. यवतमाळ शहरात ६ मार्चच्या रात्री दोन भरधाव कार एकमेकांवर आदळून अपघात झाला. सुदैवाने यात कुणी दगावले नाही. मात्र अपघाताची तीव्रता भीषण होती. पांढरकवडा तालुक्यातील इचोड गावाजवळ ९ मार्च रोजी एक वृद्ध अपघातात ठार झाला. तर उमरखेड तालुक्यात मार्लेगावजवळ दोन ट्रकच्या धडकेत छातीत लोखंडी रॉड शिरल्याने चालक दगावला. १४ मार्च रोजी वणी तालुक्यातील खांदलाजवळ दुचाकीस्वार दोघे जण अपघाताचे बळी ठरले. वणी तालुक्यातील करणवाडी येथे १५ मार्चला ट्रॅक्टर चालक ठार झाला तर जालना जिल्ह्यातील दुसरबीडजवळ झालेल्या अपघातात यवतमाळचे पं. शशीकांत शर्मा ठार झाले.यवतमाळच्या बसस्थानक चौकातील सिग्नलवर १७ मार्च रोजी झालेल्या अपघाताने संपूर्ण यवतमाळ हादरुन गेले होते. दुचाकीवरील सासरे आणि सुनेला ट्रकने अक्षरश: चिरडले. या अपघातात दोन वर्षाची चिमुकली माही बचावली. या अपघातानंतर यवतमाळ शहरातील वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला. पोलिसांनी या अपघातातून धडा घेत ‘यु-टर्न’चा प्रयोग सुरू केला. नेर तालुक्यातील बाळेगावजवळ अ‍ॅपे आॅटोरिक्षा उलटून सात जण गंभीर जखमी झाले. २३ मार्च रोजी यवतमाळातील मेळावा आटोपून उमरखेडकडे जाताना माजी आमदार विजय खडसे जखमी झाले. त्यांच्या वाहनावर ट्रीपल सीट दुचाकी आदळली. ते तिघे तरुणही गंभीर जखमी झाले आहेत. २४ मार्चला शिरपूरजवळ चंद्रपूर जिल्ह्यातील तरुण दुचाकी अपघातात गतप्राण झाला.२८ मार्चच्या पहाटे परभणी येथून चंद्रपूरच्या महाकाली दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या मेटॅडोअरला ट्रकने धडक दिली. त्यात एक महिला ठार तर २५ भाविक जखमी झाले. या अपघाताची शाई वाळत नाही तोच २९ मार्च रोजी कोसारा गावाजवळ भीषण अपघात झाला. टिप्परने दिलेल्या धडकेत मिनीडोअरमधील दोन जण जागीच ठार झाले. अपघात एवढा भीषण होता की, एका तरुणाचे डोके धडापासून वेगळे झाले होते तर दुसºया तरुणाच्या डोक्याचा अक्षरश: चेंदामेंदा झाला होता. याच दिवशी आॅटोरिक्षातून उतरुन रस्ता पार करताना एक चिमुरडी टिप्पर खाली आली. नऊ वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. तिच्या मृत्यूने समाजमन हेलावून गेले.जिल्ह्यातील या अपघाताच्या मालिकेने कुणाचे वडील, कुणाची आई तर कुणाचे भाऊ-बहीण दगावले. वाहन चालविताना झालेली थोडी चूक जीवावर बेतली. वाहतुकीच्या नियमांचे पालन केले तर निश्चितच अपघात टाळता येतात.दोन प्राध्यापकांना गमवावा लागला जीवमार्च महिन्यात दुचाकी अपघातात दोन प्राध्यापकांना आपला जीव गमवावा लागला. १४ मार्च रोजी पुसद तालुक्यातील बेलगव्हाण येथे दुचाकी स्लीप होऊन प्रा.डॉ.दिनेश भालेराव ठार झाले. तर वरोरा येथील आनंदनिकेतन महाविद्यालयाचे प्रा. अनिल नन्नावरे वणी-वरोरा मार्गावरील सावर्ला येथे अपघातात मृत्युमुखी पडले. त्यांना एसटी बसने धडक दिली. शिक्षण क्षेत्रात या दोघांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Accidentअपघात