शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

एकाच महिन्यात रस्ता अपघाताचे १७ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 23:31 IST

जिल्ह्यात मार्च महिन्यात झालेल्या वेगवेगळ्या रस्ता अपघातात १७ जणांचा बळी गेला. तर ५० जणांवर अपंगत्वाची वेळ आली. यवतमाळातील सिग्नलवर झालेल्या अपघाताने संपूर्ण जिल्हा हादरुन गेला होता, ...

ठळक मुद्दे५० जणांना अपंगत्व : वेगाशी स्पर्धा आणि वाहतुकीचे नियम पायदळी

ज्ञानेश्वर मुंदे ।ऑनलाईन लोकमतयवतमाळ : जिल्ह्यात मार्च महिन्यात झालेल्या वेगवेगळ्या रस्ता अपघातात १७ जणांचा बळी गेला. तर ५० जणांवर अपंगत्वाची वेळ आली. यवतमाळातील सिग्नलवर झालेल्या अपघाताने संपूर्ण जिल्हा हादरुन गेला होता, तर दुचाकीच्या अपघातात दोन प्राध्यापकांना आपला जीव गमवावा लागला. टिप्परखाली चिरडून नायगाव येथे झालेला चिमुकलीचा मृत्यू मन हेलावून सोडणारा होता.वेगाशी स्पर्धा करीत वाहन चालविणे आणि वाहतुकीचे नियम पायदळी तुडविले की, अपघात निश्चितच होतो. जिल्हाभरात मार्च महिन्यात झालेल्या अपघातातही हीच कारणे आहेत. मार्च महिन्याची सुरुवात जवळा येथे एका ट्रकने तीन दुचाकींना धडक देऊन झाली. ५ मार्च रोजी झालेल्या अपघातात एक जण ठार तर पाच जण जखमी झाले. यवतमाळ शहरात ६ मार्चच्या रात्री दोन भरधाव कार एकमेकांवर आदळून अपघात झाला. सुदैवाने यात कुणी दगावले नाही. मात्र अपघाताची तीव्रता भीषण होती. पांढरकवडा तालुक्यातील इचोड गावाजवळ ९ मार्च रोजी एक वृद्ध अपघातात ठार झाला. तर उमरखेड तालुक्यात मार्लेगावजवळ दोन ट्रकच्या धडकेत छातीत लोखंडी रॉड शिरल्याने चालक दगावला. १४ मार्च रोजी वणी तालुक्यातील खांदलाजवळ दुचाकीस्वार दोघे जण अपघाताचे बळी ठरले. वणी तालुक्यातील करणवाडी येथे १५ मार्चला ट्रॅक्टर चालक ठार झाला तर जालना जिल्ह्यातील दुसरबीडजवळ झालेल्या अपघातात यवतमाळचे पं. शशीकांत शर्मा ठार झाले.यवतमाळच्या बसस्थानक चौकातील सिग्नलवर १७ मार्च रोजी झालेल्या अपघाताने संपूर्ण यवतमाळ हादरुन गेले होते. दुचाकीवरील सासरे आणि सुनेला ट्रकने अक्षरश: चिरडले. या अपघातात दोन वर्षाची चिमुकली माही बचावली. या अपघातानंतर यवतमाळ शहरातील वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला. पोलिसांनी या अपघातातून धडा घेत ‘यु-टर्न’चा प्रयोग सुरू केला. नेर तालुक्यातील बाळेगावजवळ अ‍ॅपे आॅटोरिक्षा उलटून सात जण गंभीर जखमी झाले. २३ मार्च रोजी यवतमाळातील मेळावा आटोपून उमरखेडकडे जाताना माजी आमदार विजय खडसे जखमी झाले. त्यांच्या वाहनावर ट्रीपल सीट दुचाकी आदळली. ते तिघे तरुणही गंभीर जखमी झाले आहेत. २४ मार्चला शिरपूरजवळ चंद्रपूर जिल्ह्यातील तरुण दुचाकी अपघातात गतप्राण झाला.२८ मार्चच्या पहाटे परभणी येथून चंद्रपूरच्या महाकाली दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या मेटॅडोअरला ट्रकने धडक दिली. त्यात एक महिला ठार तर २५ भाविक जखमी झाले. या अपघाताची शाई वाळत नाही तोच २९ मार्च रोजी कोसारा गावाजवळ भीषण अपघात झाला. टिप्परने दिलेल्या धडकेत मिनीडोअरमधील दोन जण जागीच ठार झाले. अपघात एवढा भीषण होता की, एका तरुणाचे डोके धडापासून वेगळे झाले होते तर दुसºया तरुणाच्या डोक्याचा अक्षरश: चेंदामेंदा झाला होता. याच दिवशी आॅटोरिक्षातून उतरुन रस्ता पार करताना एक चिमुरडी टिप्पर खाली आली. नऊ वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. तिच्या मृत्यूने समाजमन हेलावून गेले.जिल्ह्यातील या अपघाताच्या मालिकेने कुणाचे वडील, कुणाची आई तर कुणाचे भाऊ-बहीण दगावले. वाहन चालविताना झालेली थोडी चूक जीवावर बेतली. वाहतुकीच्या नियमांचे पालन केले तर निश्चितच अपघात टाळता येतात.दोन प्राध्यापकांना गमवावा लागला जीवमार्च महिन्यात दुचाकी अपघातात दोन प्राध्यापकांना आपला जीव गमवावा लागला. १४ मार्च रोजी पुसद तालुक्यातील बेलगव्हाण येथे दुचाकी स्लीप होऊन प्रा.डॉ.दिनेश भालेराव ठार झाले. तर वरोरा येथील आनंदनिकेतन महाविद्यालयाचे प्रा. अनिल नन्नावरे वणी-वरोरा मार्गावरील सावर्ला येथे अपघातात मृत्युमुखी पडले. त्यांना एसटी बसने धडक दिली. शिक्षण क्षेत्रात या दोघांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Accidentअपघात