शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

१६४ धार्मिक स्थळे अनधिकृत

By admin | Updated: January 12, 2016 02:08 IST

यवतमाळ शहरातील १६४ अनधिकृत धार्मिक स्थळांचे निष्कासन केले जाणार असल्याची नोटीस नगरपरिषदेने जाहीर केली.

यवतमाळ शहर : निष्कासनाच्या नोटीसने भाविकांमध्ये खळबळ यवतमाळ : यवतमाळ शहरातील १६४ अनधिकृत धार्मिक स्थळांचे निष्कासन केले जाणार असल्याची नोटीस नगरपरिषदेने जाहीर केली. या नोटिसीमुळे संबंधित भाविक भक्तांमध्ये एकच खळबळ निर्माण झाली. या भक्तांनी आता आपले श्रद्धास्थान असलेल्या या धार्मिक स्थळांचे निष्कासन रोखण्यासाठी धडपड चालविली आहे. ही धार्मिक स्थळे वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात आक्षेप दाखल करण्याची तयारी क ाहे. सार्वजनिक जागेवरील अनधिकृत धार्मिक स्थळांचा मुद्दा राज्य शासनस्तरावर गाजतो आहे. या धार्मिक स्थळांना नियमित करणे, स्थलांतरित करणे व निष्कासित करण्याचा कृती कार्यक्रम शासनाने जाहीर केला. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने अशा धार्मिक स्थळांच्या याद्या तयार केल्या असून त्याच्या कार्यवाहीसाठी नगरपरिषद सरसावली आहे. एकट्या यवतमाळ शहरातील १६४ धार्मिक स्थळांची सूचना नगरपरिषदेने रविवारी प्रकाशित केली. ही सर्व धार्मिक स्थळे निष्कासित केली जाणार आहे. त्यामुळे भाविक भक्त हादरले आहेत. या भाविकांनी आपले धार्मिक स्थळ सर्वात जुने असल्याचे दाखले देणे सुरू केले आहे. त्यासाठी पुराव्यांचीही जुळवाजुळव केली जात आहे. अनेक धार्मिक स्थळांचा ५० वर्षांपूर्वीचे असल्याबाबतचा कागदोपत्री पुरावा नाही. त्यावर पर्याय म्हणून तारुण्यापासून हे धार्मिक स्थळ पाहात वृद्धत्वाकडे झुकलेल्या व्यक्तींचे शपथपत्र घेण्याची तयारीही अनेकांनी चालविली आहे. आपले धार्मिक स्थळ वाचविण्यासाठी विविध ठिकाणी सभा, बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. यातील अनेक धार्मिक स्थळे सार्वजनिक जागेत असली तरी त्यांचा रहदारीस कोणताही अडथळा होताना दिसत नाही. त्यानंतरही त्याच्या निष्कासनाची नोटीस जारी झाल्याने भाविकांमध्ये रोष पाहायला मिळतो आहे. त्यातच विशिष्ट समाजाच्याच धार्मिक स्थळांचे निष्कासन का, असा मुद्दा जनतेत चर्चिला जात असून भविष्यात त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. विशेष असे निष्कासनाच्या निशाण्यावर असलेल्या १६४ धार्मिक स्थळांमध्ये बहुतांश हनुमान मंदिरांचा समावेश आहे. (जिल्हा प्रतिनिधी) मंदिरे वाचविण्यासाठी आज बैठक नगरपरिषदेने यवतमाळ शहरातील १६४ अनधिकृत धार्मिक स्थळे निष्कासित करण्याची नोटीस जारी केली. त्या पार्श्वभूमीवर शहरातील मंदिरे वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू झाली आहे. ही मंदिरे सुरक्षित व नियमित करण्याबाबत चर्चा करण्यासाठी मंगळवार १२ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता बाजोरियानगर स्थित श्री स्वामी समर्थ मंदिरात बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी आक्षेप, सुरक्षितता व अर्जाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. असा आहे कार्यक्रम२९ सप्टेंबर २००९ पूर्वीच्या अनधिकृत धार्मिक स्थळांना नोटीस जारी.अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून ११ फेब्रुवारी २०१६ पर्यंत आक्षेप दाखल करणे.११ मार्च २०१६ ला जिल्हा समितीकडे सुनावणी.१६ मार्च २०१६ सुनावणीनंतरची अंतिम कार्यवाही.