शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

१६४ धार्मिक स्थळे अनधिकृत

By admin | Updated: January 12, 2016 02:08 IST

यवतमाळ शहरातील १६४ अनधिकृत धार्मिक स्थळांचे निष्कासन केले जाणार असल्याची नोटीस नगरपरिषदेने जाहीर केली.

यवतमाळ शहर : निष्कासनाच्या नोटीसने भाविकांमध्ये खळबळ यवतमाळ : यवतमाळ शहरातील १६४ अनधिकृत धार्मिक स्थळांचे निष्कासन केले जाणार असल्याची नोटीस नगरपरिषदेने जाहीर केली. या नोटिसीमुळे संबंधित भाविक भक्तांमध्ये एकच खळबळ निर्माण झाली. या भक्तांनी आता आपले श्रद्धास्थान असलेल्या या धार्मिक स्थळांचे निष्कासन रोखण्यासाठी धडपड चालविली आहे. ही धार्मिक स्थळे वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात आक्षेप दाखल करण्याची तयारी क ाहे. सार्वजनिक जागेवरील अनधिकृत धार्मिक स्थळांचा मुद्दा राज्य शासनस्तरावर गाजतो आहे. या धार्मिक स्थळांना नियमित करणे, स्थलांतरित करणे व निष्कासित करण्याचा कृती कार्यक्रम शासनाने जाहीर केला. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने अशा धार्मिक स्थळांच्या याद्या तयार केल्या असून त्याच्या कार्यवाहीसाठी नगरपरिषद सरसावली आहे. एकट्या यवतमाळ शहरातील १६४ धार्मिक स्थळांची सूचना नगरपरिषदेने रविवारी प्रकाशित केली. ही सर्व धार्मिक स्थळे निष्कासित केली जाणार आहे. त्यामुळे भाविक भक्त हादरले आहेत. या भाविकांनी आपले धार्मिक स्थळ सर्वात जुने असल्याचे दाखले देणे सुरू केले आहे. त्यासाठी पुराव्यांचीही जुळवाजुळव केली जात आहे. अनेक धार्मिक स्थळांचा ५० वर्षांपूर्वीचे असल्याबाबतचा कागदोपत्री पुरावा नाही. त्यावर पर्याय म्हणून तारुण्यापासून हे धार्मिक स्थळ पाहात वृद्धत्वाकडे झुकलेल्या व्यक्तींचे शपथपत्र घेण्याची तयारीही अनेकांनी चालविली आहे. आपले धार्मिक स्थळ वाचविण्यासाठी विविध ठिकाणी सभा, बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. यातील अनेक धार्मिक स्थळे सार्वजनिक जागेत असली तरी त्यांचा रहदारीस कोणताही अडथळा होताना दिसत नाही. त्यानंतरही त्याच्या निष्कासनाची नोटीस जारी झाल्याने भाविकांमध्ये रोष पाहायला मिळतो आहे. त्यातच विशिष्ट समाजाच्याच धार्मिक स्थळांचे निष्कासन का, असा मुद्दा जनतेत चर्चिला जात असून भविष्यात त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. विशेष असे निष्कासनाच्या निशाण्यावर असलेल्या १६४ धार्मिक स्थळांमध्ये बहुतांश हनुमान मंदिरांचा समावेश आहे. (जिल्हा प्रतिनिधी) मंदिरे वाचविण्यासाठी आज बैठक नगरपरिषदेने यवतमाळ शहरातील १६४ अनधिकृत धार्मिक स्थळे निष्कासित करण्याची नोटीस जारी केली. त्या पार्श्वभूमीवर शहरातील मंदिरे वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू झाली आहे. ही मंदिरे सुरक्षित व नियमित करण्याबाबत चर्चा करण्यासाठी मंगळवार १२ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता बाजोरियानगर स्थित श्री स्वामी समर्थ मंदिरात बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी आक्षेप, सुरक्षितता व अर्जाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. असा आहे कार्यक्रम२९ सप्टेंबर २००९ पूर्वीच्या अनधिकृत धार्मिक स्थळांना नोटीस जारी.अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून ११ फेब्रुवारी २०१६ पर्यंत आक्षेप दाखल करणे.११ मार्च २०१६ ला जिल्हा समितीकडे सुनावणी.१६ मार्च २०१६ सुनावणीनंतरची अंतिम कार्यवाही.