शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
3
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
4
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
5
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
6
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
7
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
8
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
9
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
10
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
11
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
12
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
13
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
14
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
15
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
16
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
17
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
18
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
19
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
20
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना

१६४ धार्मिक स्थळे अनधिकृत

By admin | Updated: January 12, 2016 02:08 IST

यवतमाळ शहरातील १६४ अनधिकृत धार्मिक स्थळांचे निष्कासन केले जाणार असल्याची नोटीस नगरपरिषदेने जाहीर केली.

यवतमाळ शहर : निष्कासनाच्या नोटीसने भाविकांमध्ये खळबळ यवतमाळ : यवतमाळ शहरातील १६४ अनधिकृत धार्मिक स्थळांचे निष्कासन केले जाणार असल्याची नोटीस नगरपरिषदेने जाहीर केली. या नोटिसीमुळे संबंधित भाविक भक्तांमध्ये एकच खळबळ निर्माण झाली. या भक्तांनी आता आपले श्रद्धास्थान असलेल्या या धार्मिक स्थळांचे निष्कासन रोखण्यासाठी धडपड चालविली आहे. ही धार्मिक स्थळे वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात आक्षेप दाखल करण्याची तयारी क ाहे. सार्वजनिक जागेवरील अनधिकृत धार्मिक स्थळांचा मुद्दा राज्य शासनस्तरावर गाजतो आहे. या धार्मिक स्थळांना नियमित करणे, स्थलांतरित करणे व निष्कासित करण्याचा कृती कार्यक्रम शासनाने जाहीर केला. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने अशा धार्मिक स्थळांच्या याद्या तयार केल्या असून त्याच्या कार्यवाहीसाठी नगरपरिषद सरसावली आहे. एकट्या यवतमाळ शहरातील १६४ धार्मिक स्थळांची सूचना नगरपरिषदेने रविवारी प्रकाशित केली. ही सर्व धार्मिक स्थळे निष्कासित केली जाणार आहे. त्यामुळे भाविक भक्त हादरले आहेत. या भाविकांनी आपले धार्मिक स्थळ सर्वात जुने असल्याचे दाखले देणे सुरू केले आहे. त्यासाठी पुराव्यांचीही जुळवाजुळव केली जात आहे. अनेक धार्मिक स्थळांचा ५० वर्षांपूर्वीचे असल्याबाबतचा कागदोपत्री पुरावा नाही. त्यावर पर्याय म्हणून तारुण्यापासून हे धार्मिक स्थळ पाहात वृद्धत्वाकडे झुकलेल्या व्यक्तींचे शपथपत्र घेण्याची तयारीही अनेकांनी चालविली आहे. आपले धार्मिक स्थळ वाचविण्यासाठी विविध ठिकाणी सभा, बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. यातील अनेक धार्मिक स्थळे सार्वजनिक जागेत असली तरी त्यांचा रहदारीस कोणताही अडथळा होताना दिसत नाही. त्यानंतरही त्याच्या निष्कासनाची नोटीस जारी झाल्याने भाविकांमध्ये रोष पाहायला मिळतो आहे. त्यातच विशिष्ट समाजाच्याच धार्मिक स्थळांचे निष्कासन का, असा मुद्दा जनतेत चर्चिला जात असून भविष्यात त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. विशेष असे निष्कासनाच्या निशाण्यावर असलेल्या १६४ धार्मिक स्थळांमध्ये बहुतांश हनुमान मंदिरांचा समावेश आहे. (जिल्हा प्रतिनिधी) मंदिरे वाचविण्यासाठी आज बैठक नगरपरिषदेने यवतमाळ शहरातील १६४ अनधिकृत धार्मिक स्थळे निष्कासित करण्याची नोटीस जारी केली. त्या पार्श्वभूमीवर शहरातील मंदिरे वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू झाली आहे. ही मंदिरे सुरक्षित व नियमित करण्याबाबत चर्चा करण्यासाठी मंगळवार १२ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता बाजोरियानगर स्थित श्री स्वामी समर्थ मंदिरात बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी आक्षेप, सुरक्षितता व अर्जाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. असा आहे कार्यक्रम२९ सप्टेंबर २००९ पूर्वीच्या अनधिकृत धार्मिक स्थळांना नोटीस जारी.अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून ११ फेब्रुवारी २०१६ पर्यंत आक्षेप दाखल करणे.११ मार्च २०१६ ला जिल्हा समितीकडे सुनावणी.१६ मार्च २०१६ सुनावणीनंतरची अंतिम कार्यवाही.