शहरं
Join us  
Trending Stories
1
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
2
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
3
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
4
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
5
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
6
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
7
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
8
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
9
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
10
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
11
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
12
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
13
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
14
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
15
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
16
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
17
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
18
अजितदादांचे मत अन् निधीबाबत विधान, CM फडणवीसांचे थेट भाष्य; म्हणाले, “त्यांचा उद्देश...”
19
शरद मोहोळ हत्येतील पिस्तूल उमरटी गावातील; पुणे पोलिसांची मध्य प्रदेशमध्ये जबरदस्त कारवाई
20
फेसबुक मैत्री नडली! फेक ट्रेडिंग ॲपवर २.९० कोटींचे इन्व्हेस्टमेंट, नोएडात व्यापाऱ्याला महिलेनं 'असं' लुटलं
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक अपघातात १६ जनावरे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 22:00 IST

कत्तलीसाठी हैदराबादकडे जनावरे घेऊन जाणारा ट्रक उलटून १६ जनावरांचा तडफडून मृत्यू तर १९ जनावरे गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी पहाटे ३ वाजता येथील पांढरकवडा बायपास चौफुलीवर घडली.

ठळक मुद्दे१९ जखमी : पांढरकवडा बायपास चौफुलीवरील पहाटेचा थरार

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : कत्तलीसाठी हैदराबादकडे जनावरे घेऊन जाणारा ट्रक उलटून १६ जनावरांचा तडफडून मृत्यू तर १९ जनावरे गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी पहाटे ३ वाजता येथील पांढरकवडा बायपास चौफुलीवर घडली. या ट्रकचे चालक वाहक वाहन सोडून पसार झाले आहेत.मध्य प्रदेश आणि नागपूर येथून जनावरे घेऊन ट्रक (क्र.एम.पी.०९ - ८४१४) हैद्राबादकडे जात होता. सोमवारी पहाटे येथील पांढरकवडा चौफुलीवर ट्रकचालकाचे नियंत्रण गेल्याने ट्रक उलटला. यात ट्रकमधील १६ जनावरांचा तडफडून मृत्यू झाला. तर १९ जनावरे गंभीर जखमी झाली. घटनास्थळावर हृदय हेलावणारे दृश्य दिसत होते. जनावरांच्या प्रेतांचा सडाच रस्त्यावर पडला होता. शहर पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर पहाटे ६ वाजतापासून अपघातग्रस्त ट्रकमधून जनावरे बाहेर काढण्याचे प्रयत्न झाले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.हटकर व डॉ.वटाणे यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळ गाठून जनावरांवर उपचार सुरू केले. नगरपरिषदेच्या मदतीने मृत जनावरे घटनास्थळावरून हलविण्यात आली.या प्रकरणी अज्ञात ट्रक चालकाविरोधात प्राणीसंरक्षण कायद्यानुसार शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कर्तव्यावर असलेले सहायक निरीक्षक विनोद झळके यांच्यासह ठाणेदार यशवंत बावीस्कर, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांनी घटनास्थळाला भेट देवून मदत कार्यास सुुरुवात केली.हप्तेखोरीच्या वादातून घडला अपघातजनावरे घेऊन जात असलेल्या ट्रकचा कळंबपासून आयटेन कार पाठलाग करीत होती. कत्तलीसाठी जाणाऱ्यां जनावरांना शहराबाहेर काढून देण्यासाठी काही टोळके राजरोसपणे हप्ते घेतात. एका ट्रिपला दहा ते वीस हजार रुपये आकारले जाते. हा ट्रक मडकोना येथून जात असताना या ट्रकमागे आयटेन कार लागली होती. यामध्ये काही तरुण चालकाला धमकावत होते. या धावपळीतच ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले तर पाठलाग करणारी आय-टेन कार गतिरोधकावर इंजीन आदळून जागेवरच बंद पडली. पोलिसांनी या कारच्या माध्यमातून तपास केल्यास रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.दारव्हा येथे ४७ जनावरांची सुटका, १२ अटकेत, २० लाखांचा मुद्देमालदारव्हा : जनावरांची निर्दयपणे वाहतूक करणारी सहा वाहने पोलिसांनी पकडून ४७ जनावरांची सुटका तालुक्यातील हातोला येथे सोमवारी सकाळी ६ वाजता करण्यात आली. १२ जणांना पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दारव्हा पोलिसांनी गोपनीय माहितीवरून हातोला येथे सोमवारी सकाळी सापळा रचला. त्यावेळी वाहनांची तपासणी केली असता सहा वाहनांमध्ये जनावरांची निदर्यपणे वाहतूक होत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी ४७ जनावरांची सुटका केली. तर आरोपी साहेबराव विठ्ठलराव इंगोले (५०), फकीर मोहंमद शेख चाँद, एयाज खान मिराज खान (३०) सर्व रा. उमर्डा बाजार ता. कारंजा, शेख इकबाल शेख नूर (२०) रा. लोही, शेख अजीज शेख बशीर (६५), नईम खान कासम खान (२६), कासम खान फकीर खान (७२), हारुन खान रशीद खान (३६), शेख अन्वर शेख गुलाब (४२), शेख शहजाद शेख गुलाब (२९), शेख इर्शाद शेख रऊफ (३४), अलिम खान कासम खान (३६) सर्व रा. लोही यांना अटक करण्यात आली. तर शेख असफाक शेख कादीर (४७) रा. लोही पसार झाला. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली एसडीपीओ डॉ. नीलेश पांडे, ठाणेदार रिता उईके, पीएसआय संदीप मुपडे, संतोष माने, प्रेमसिंग चव्हाण, कासम निम्सुरवाले, रोशन गुजर, केशव मुंढे, संजय साबळे आदींनी केली.