शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

ट्रक अपघातात १६ जनावरे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 22:00 IST

कत्तलीसाठी हैदराबादकडे जनावरे घेऊन जाणारा ट्रक उलटून १६ जनावरांचा तडफडून मृत्यू तर १९ जनावरे गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी पहाटे ३ वाजता येथील पांढरकवडा बायपास चौफुलीवर घडली.

ठळक मुद्दे१९ जखमी : पांढरकवडा बायपास चौफुलीवरील पहाटेचा थरार

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : कत्तलीसाठी हैदराबादकडे जनावरे घेऊन जाणारा ट्रक उलटून १६ जनावरांचा तडफडून मृत्यू तर १९ जनावरे गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी पहाटे ३ वाजता येथील पांढरकवडा बायपास चौफुलीवर घडली. या ट्रकचे चालक वाहक वाहन सोडून पसार झाले आहेत.मध्य प्रदेश आणि नागपूर येथून जनावरे घेऊन ट्रक (क्र.एम.पी.०९ - ८४१४) हैद्राबादकडे जात होता. सोमवारी पहाटे येथील पांढरकवडा चौफुलीवर ट्रकचालकाचे नियंत्रण गेल्याने ट्रक उलटला. यात ट्रकमधील १६ जनावरांचा तडफडून मृत्यू झाला. तर १९ जनावरे गंभीर जखमी झाली. घटनास्थळावर हृदय हेलावणारे दृश्य दिसत होते. जनावरांच्या प्रेतांचा सडाच रस्त्यावर पडला होता. शहर पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर पहाटे ६ वाजतापासून अपघातग्रस्त ट्रकमधून जनावरे बाहेर काढण्याचे प्रयत्न झाले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.हटकर व डॉ.वटाणे यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळ गाठून जनावरांवर उपचार सुरू केले. नगरपरिषदेच्या मदतीने मृत जनावरे घटनास्थळावरून हलविण्यात आली.या प्रकरणी अज्ञात ट्रक चालकाविरोधात प्राणीसंरक्षण कायद्यानुसार शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कर्तव्यावर असलेले सहायक निरीक्षक विनोद झळके यांच्यासह ठाणेदार यशवंत बावीस्कर, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांनी घटनास्थळाला भेट देवून मदत कार्यास सुुरुवात केली.हप्तेखोरीच्या वादातून घडला अपघातजनावरे घेऊन जात असलेल्या ट्रकचा कळंबपासून आयटेन कार पाठलाग करीत होती. कत्तलीसाठी जाणाऱ्यां जनावरांना शहराबाहेर काढून देण्यासाठी काही टोळके राजरोसपणे हप्ते घेतात. एका ट्रिपला दहा ते वीस हजार रुपये आकारले जाते. हा ट्रक मडकोना येथून जात असताना या ट्रकमागे आयटेन कार लागली होती. यामध्ये काही तरुण चालकाला धमकावत होते. या धावपळीतच ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले तर पाठलाग करणारी आय-टेन कार गतिरोधकावर इंजीन आदळून जागेवरच बंद पडली. पोलिसांनी या कारच्या माध्यमातून तपास केल्यास रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.दारव्हा येथे ४७ जनावरांची सुटका, १२ अटकेत, २० लाखांचा मुद्देमालदारव्हा : जनावरांची निर्दयपणे वाहतूक करणारी सहा वाहने पोलिसांनी पकडून ४७ जनावरांची सुटका तालुक्यातील हातोला येथे सोमवारी सकाळी ६ वाजता करण्यात आली. १२ जणांना पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दारव्हा पोलिसांनी गोपनीय माहितीवरून हातोला येथे सोमवारी सकाळी सापळा रचला. त्यावेळी वाहनांची तपासणी केली असता सहा वाहनांमध्ये जनावरांची निदर्यपणे वाहतूक होत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी ४७ जनावरांची सुटका केली. तर आरोपी साहेबराव विठ्ठलराव इंगोले (५०), फकीर मोहंमद शेख चाँद, एयाज खान मिराज खान (३०) सर्व रा. उमर्डा बाजार ता. कारंजा, शेख इकबाल शेख नूर (२०) रा. लोही, शेख अजीज शेख बशीर (६५), नईम खान कासम खान (२६), कासम खान फकीर खान (७२), हारुन खान रशीद खान (३६), शेख अन्वर शेख गुलाब (४२), शेख शहजाद शेख गुलाब (२९), शेख इर्शाद शेख रऊफ (३४), अलिम खान कासम खान (३६) सर्व रा. लोही यांना अटक करण्यात आली. तर शेख असफाक शेख कादीर (४७) रा. लोही पसार झाला. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली एसडीपीओ डॉ. नीलेश पांडे, ठाणेदार रिता उईके, पीएसआय संदीप मुपडे, संतोष माने, प्रेमसिंग चव्हाण, कासम निम्सुरवाले, रोशन गुजर, केशव मुंढे, संजय साबळे आदींनी केली.