शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

परप्रांतीयांना सोडण्यासाठी १५० ‘एसटी’ बसेस सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 05:00 IST

सर्व नऊही आगारांमधील १५० एसटी बसेस प्रशासनाचा आदेश येताच मार्गावर निघणार आहे. यादृष्टीने चालक कम वाहक, यांत्रिक पर्यवेक्षक आणि यांत्रिक कर्मचाऱ्यांना अपडेट राहावे लागणार आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेला लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे परप्रांतातील नागरिक जिल्ह्यात ठिकठिकाणी अडकून पडले आहेत.

ठळक मुद्देकोरोना इफेक्ट : महामंडळाला केवळ जिल्हा प्रशासनाच्या आदेशाची वाट

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध कारणांमुळे अडकून पडलेल्या परप्रांतीय लोकांना त्यांच्या राज्यात सोडून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा यवतमाळ विभाग सज्ज झाला आहे. सर्व नऊही आगारांमधील १५० एसटी बसेस प्रशासनाचा आदेश येताच मार्गावर निघणार आहे. यादृष्टीने चालक कम वाहक, यांत्रिक पर्यवेक्षक आणि यांत्रिक कर्मचाऱ्यांना अपडेट राहावे लागणार आहे.कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेला लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे परप्रांतातील नागरिक जिल्ह्यात ठिकठिकाणी अडकून पडले आहेत. यामध्ये कामगार, बाहेर जिल्ह्यातील उद्योग व्यवसाय बंद झाल्याने गावाकडे निघालेले, परराज्यातून जोखीम स्वीकारून मार्गावर असलेले नागरिक आदींचा समावेश आहे. या लोकांची प्रशासन तसेच विविध सामाजिक संस्था, संघटनांकडून खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र त्यांची गावाकडे परत जाण्याची तगमग पाहता प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे. या लोकांना एसटी बसेसद्वारे त्यांच्या राज्यातील राजधानीपर्यंत पोहोचवून दिले जाणार आहे. प्रशासनाला फक्त शासनाकडून आदेशाची प्रतीक्षा आहे.तत्पूर्वी महाराष्ट्रात अडकून पडलेल्या नागरिकांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी महामंडळाने तयारी केली आहे. जवळपास १५० बसेस आणि त्यासाठी लागणारा आवश्यक तेवढा कर्मचारी वर्ग तयार ठेवण्यात आला आहे. राजस्थान, बिहार, ओडिशा, मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक आदी राज्यातील अडकलेल्या लोकांना महामंडळाच्या बसेसद्वारे आवश्यक त्या दक्षता घेऊन सोडून देण्यात येणार आहे. जवळपास दोन हजार ७७८ नागरिक परप्रांतातील असल्याची माहिती आहे. अडकलेले नागरिक जिथे आहे तेथून घेऊन त्यांना संबंधित राज्यामध्ये पोहोचवून देण्यात येणार आहे.सव्वा कोटींचे बजेटपरप्रांतीय लोकांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठीचा खर्च महामंडळाने सुमारे एक कोटी २५ लाख रुपये सांगितला आहे. किलोमीटर, जीएसटी आदी बाबींचा खर्च यामध्ये समाविष्ट आहे. प्रत्येक बसमध्ये २२ प्रवासी घेण्याची महामंडळाची तयारी आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी यापेक्षा अधिक प्रवासी घेण्यास महामंडळाने असमर्थता दर्शविली आहे.परप्रांतीय लोकांना सोडून देण्यासाठी तयारी सुरू आहे. शासनाकडून आदेश आल्यानंतर निर्णय घेतला जाईल. तशा पूर्वसूचना एसटी महामंडळाला दिल्या आहे.- ललितकुमार वऱ्हाडे,निवासी उपजिल्हाधिकारी, यवतमाळ

परप्रांतीय लोकांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठीचा खर्च महामंडळाने सुमारे एक कोटी २५ लाख रुपये सांगितला आहे. किलोमीटर, जीएसटी आदी बाबींचा खर्च यामध्ये समाविष्ट आहे. प्रत्येक बसमध्ये २२ प्रवासी घेण्याची महामंडळाची तयारी आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी यापेक्षा अधिक प्रवासी घेण्यास महामंडळाने असमर्थता दर्शविली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या