शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
5
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
6
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
7
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
8
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
9
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
10
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
11
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
12
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
13
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
14
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
15
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
16
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
17
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
18
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
19
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
20
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर

परप्रांतीयांना सोडण्यासाठी १५० ‘एसटी’ बसेस सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 05:00 IST

सर्व नऊही आगारांमधील १५० एसटी बसेस प्रशासनाचा आदेश येताच मार्गावर निघणार आहे. यादृष्टीने चालक कम वाहक, यांत्रिक पर्यवेक्षक आणि यांत्रिक कर्मचाऱ्यांना अपडेट राहावे लागणार आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेला लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे परप्रांतातील नागरिक जिल्ह्यात ठिकठिकाणी अडकून पडले आहेत.

ठळक मुद्देकोरोना इफेक्ट : महामंडळाला केवळ जिल्हा प्रशासनाच्या आदेशाची वाट

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध कारणांमुळे अडकून पडलेल्या परप्रांतीय लोकांना त्यांच्या राज्यात सोडून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा यवतमाळ विभाग सज्ज झाला आहे. सर्व नऊही आगारांमधील १५० एसटी बसेस प्रशासनाचा आदेश येताच मार्गावर निघणार आहे. यादृष्टीने चालक कम वाहक, यांत्रिक पर्यवेक्षक आणि यांत्रिक कर्मचाऱ्यांना अपडेट राहावे लागणार आहे.कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेला लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे परप्रांतातील नागरिक जिल्ह्यात ठिकठिकाणी अडकून पडले आहेत. यामध्ये कामगार, बाहेर जिल्ह्यातील उद्योग व्यवसाय बंद झाल्याने गावाकडे निघालेले, परराज्यातून जोखीम स्वीकारून मार्गावर असलेले नागरिक आदींचा समावेश आहे. या लोकांची प्रशासन तसेच विविध सामाजिक संस्था, संघटनांकडून खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र त्यांची गावाकडे परत जाण्याची तगमग पाहता प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे. या लोकांना एसटी बसेसद्वारे त्यांच्या राज्यातील राजधानीपर्यंत पोहोचवून दिले जाणार आहे. प्रशासनाला फक्त शासनाकडून आदेशाची प्रतीक्षा आहे.तत्पूर्वी महाराष्ट्रात अडकून पडलेल्या नागरिकांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी महामंडळाने तयारी केली आहे. जवळपास १५० बसेस आणि त्यासाठी लागणारा आवश्यक तेवढा कर्मचारी वर्ग तयार ठेवण्यात आला आहे. राजस्थान, बिहार, ओडिशा, मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक आदी राज्यातील अडकलेल्या लोकांना महामंडळाच्या बसेसद्वारे आवश्यक त्या दक्षता घेऊन सोडून देण्यात येणार आहे. जवळपास दोन हजार ७७८ नागरिक परप्रांतातील असल्याची माहिती आहे. अडकलेले नागरिक जिथे आहे तेथून घेऊन त्यांना संबंधित राज्यामध्ये पोहोचवून देण्यात येणार आहे.सव्वा कोटींचे बजेटपरप्रांतीय लोकांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठीचा खर्च महामंडळाने सुमारे एक कोटी २५ लाख रुपये सांगितला आहे. किलोमीटर, जीएसटी आदी बाबींचा खर्च यामध्ये समाविष्ट आहे. प्रत्येक बसमध्ये २२ प्रवासी घेण्याची महामंडळाची तयारी आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी यापेक्षा अधिक प्रवासी घेण्यास महामंडळाने असमर्थता दर्शविली आहे.परप्रांतीय लोकांना सोडून देण्यासाठी तयारी सुरू आहे. शासनाकडून आदेश आल्यानंतर निर्णय घेतला जाईल. तशा पूर्वसूचना एसटी महामंडळाला दिल्या आहे.- ललितकुमार वऱ्हाडे,निवासी उपजिल्हाधिकारी, यवतमाळ

परप्रांतीय लोकांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठीचा खर्च महामंडळाने सुमारे एक कोटी २५ लाख रुपये सांगितला आहे. किलोमीटर, जीएसटी आदी बाबींचा खर्च यामध्ये समाविष्ट आहे. प्रत्येक बसमध्ये २२ प्रवासी घेण्याची महामंडळाची तयारी आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी यापेक्षा अधिक प्रवासी घेण्यास महामंडळाने असमर्थता दर्शविली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या