शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
3
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
4
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
5
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
6
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
7
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
8
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
9
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
10
दोन मुलांची आई, १३ वर्षांनंतर कमबॅक करणार अभिनेत्री; मराठी बिझनेसमॅनसोबत बांधलेली लग्नगाठ
11
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
12
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
13
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
14
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
15
दुचाकीला बांधून पत्नीचा मृतदेह नेताना चार पोलिस ठाणी झोपेत होती का? चार मोठी, १५ छोटी गावे ओलांडली, पण...
16
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
17
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
18
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
19
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
20
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?

पालकमंत्र्यांचे उमरखेडमध्ये सलग १५ तास समाधान शिबिर

By admin | Updated: June 6, 2015 23:59 IST

पालकमंत्री संजय राठोड यांच्या कल्पनेतून साकारलेले समाधान शिबिर जिल्ह्यातील सामान्य नागरीकांसाठी खऱ्या ....

रात्री ३ वाजता थांबले काम : ७० टक्के तक्रारींचा जागेवर निपटाराउमरखेड : पालकमंत्री संजय राठोड यांच्या कल्पनेतून साकारलेले समाधान शिबिर जिल्ह्यातील सामान्य नागरीकांसाठी खऱ्या अर्थाने दिलासा देणारे ठरत आहे. केवळ शिबिरात तक्रार दाखल झाल्यामुळेही अनेकांची कामे प्रशासकीय स्तरावर गतीने होऊ लागली आहे. उमरखेड येथे शुक्रवारी झालेल्या शिबिरात अनेक तक्रारींचा हातोहात निपटारा झाला. रात्री तब्बल तीन वाजेपर्यंत हा जनता दरबार सुरू होता.उमरखेड येथील शिबिराने वेळेचा विक्रम केला. दुपारी १२ वाजता शिबिरास सुरूवात झाली आणि १५ तास म्हणजे रात्री ३ वाजतापर्यंत शिबिर सतत सुरू होते. सायंकाळी ८.३० पर्यंत २५० तक्रारींवर सुनावणी झाली होती. त्यानंतर प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेत त्याचा निपटारा करतांनाच मध्यरात्र ओलांडली. शेवटच्या तक्रारकर्त्यासोबतही पालकमंत्र्यांनी आणि आमदार राजेंद्र नजरधने यांनी त्याच आत्मियतेने चर्चा केली. या शिबिरात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. विशेष म्हणजे शिबिरात तातडीने निर्णय होत असल्याचा प्रत्यय विभागातील जनतेला आला. शामराव भुजंगराव बारशेटवार या शेतकऱ्याने हळद प्रक्रीया यंत्र अनुदानावर घेतले होते. परंतु अनेक दिवसांपासून त्यांना अनुदानाची रक्कम मिळाली नसल्याची तक्रार होती. पालकमंत्र्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर कृषी आयुक्तांशी थेट संपर्क साधून जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांशी बोलणे करून दिले होते. या शेतकऱासाठी तातडीने अनुदानाची तरतुद करण्यात आली. अर्चना खंडारे या विद्यार्थिनीस नाहरतक प्रमाणपत्राची आवश्यकता होती. पालकमंत्र्यांनी तातडीने तिला प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले. उमरखेड तालुक्यातील बंदी भागात वन्य प्राण्यांचे जनावरांवर हल्ले होतात. परंतु एखाद्या शेतकऱ्याकडे तीन पेक्षा जास्त जनावरे असल्यास हल्ला होऊनही मदत दिली नाही. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता पालकमंत्र्यांनी रात्रीच वन विभागाचे सचिव विकास खारगे यांच्याशी संपर्क साधून याबाबतीत धोरणात्मक निर्णय घेण्यास सांगितले. मुळावा येथील महिला बचतगटाने किरकोळ केसोसिन परवाना मिळावा म्हणून अर्ज केला होता. सदर परवाना तातडीने उपलब्ध करून द्यावा, असे निवेदन शिबिरात सादर केले होते. या गटास पालकमंत्र्यांच्या हस्ते शिबिरातच परवान्याचे वितरण करण्यात आले. शिबिरात अनेकांना फेरफार, सातबारा तातडीने उपलब्ध करून देण्यात आले. याशिवाय विलास चव्हाण, रमेश गायकवाड, रामराव गायकवाड, रविंद्र जैन, संजय बिजोरे, चक्रधर देवसरकर, शिवाजी माने, सतीश वानखेडे, शांताबाई पवार, चितंगराव कदम, गजानन कदम, उत्तम जाधव, उत्तम राठोड, आदिनी तक्रारी केल्या. या शिबिरात आलेल्या तक्रारीपैकी ७० टक्के तक्रारींचा जागेवरच निपटारा करण्यात आला. सर्व उपविभागीय स्तरावर सदर शिबिर होऊ घातले आहे. वणी, यवतमाळ, दारव्हा येथील शिबिरानंतर उमरखेड येथील चौथे शिबिर होते. (शहर प्रतिनिधी)