शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ व मराठवाड्यातील १४ जिल्हे दुष्काळाच्या ‘रेडझोन’मध्ये 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 12:18 IST

अपुऱ्या पावसामुळे राज्यातील २५ जिल्ह्यांत पीक स्थिती चिंताजनक आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील १४ जिल्हे दुष्काळाच्या ‘रेडझोन’मध्ये आले आहे.

ठळक मुद्देदुबार पेरणीसाठी एक लाख क्विंटल बियाण्यांची तरतूदआत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत शाश्वत सिंचन योजनेची अंमलबजावणी

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अपुऱ्या पावसामुळे राज्यातील २५ जिल्ह्यांत पीक स्थिती चिंताजनक आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील १४ जिल्हे दुष्काळाच्या ‘रेडझोन’मध्ये आले आहे. या जिल्ह्यांत दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता पाहाता शासनाने एक लाख क्विंटल सोयाबीन बियाण्याची आताच तरतूद करून ठेवली आहे.यावर्षी पाऊस उशिरा बरसला. जुलैमध्ये पेरण्या आटोपताच पावसाचा मोठा खंड पडला. गेल्या १७ दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा थेंंबही नाही. यामुळे अंकुरलेले बियाणे जागीच करपण्यास सुरूवात झाली आहे. पिकांनी माना टाकल्या. अपुऱ्या पावसाने यवतमाळ, वाशिम, अमरावती, वर्धा, गोंदिया, भंडारा, नंदूरबार, बीड, सोलापूर, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड हे १४ जिल्हे रेडझोनमध्ये आले आहे. याव्यतिरिक्त नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, धुळे, जळगाव, औरंगाबाद, जालना, अकोला, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि सांगली या ११ जिल्ह्यातही स्थिती बिकट आहे.राज्यातील अनेक भागात दुबार पेरणीची स्थिती निर्माण होणार आहे. अशा ठिकाणी एक लाख क्विंटल बियाणे लागणार आहे. या बियाण्यांची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना एक लाख क्विंटल सोयाबीनचे बियाणे वितरित केले जाणार आहे.

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनाशेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे आणि दुष्काळी भागाला संकटातून बाहेर काढण्यासाठी कृषी विभाग मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना राबविणार आहे. या योजनेत पाच एकराच्या आतील शेतकऱ्यांना सिंचनासाठी ८० टक्के अनुदान दिले जाईल. यातून ड्रीप आणि स्प्रिंकलर घेता येईल. मोठ्या शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदानावर लाभ दिला जाईल. त्याची अंमलबजावणी याच हंगामात केली जाणार आहे.

३0 टक्के पाऊस कमीविदर्भात एकूण पावसाच्या ३० टक्के, तर मराठवाड्यात ३३ टक्के कमी पावसाची नोंद झाली. कोकणात २० टक्के जादा, तर मध्य महाराष्ट्रात १० टक्के जास्त पाऊस पडला. मराठवाड्यात अद्याप एकाही जिल्ह्यात सरासरी इतका पाऊस झाला नाही. त्यामुळे पिके करपण्यास सुरूवात झाली. अनेक ठिकाणी पिकांवर गोगलगायींनी हल्ला चढविला आहे.४० टक्के क्षेत्रातल्या पेरण्या अद्याप बाकी आहे. पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागातही गंभीर स्थिती आहे. पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोलीमध्ये भाताची रोवणी झाली. मात्र हा भागही पाण्याअभावी कोरडा पडत आहे. मध्य विदर्भातील हलक्या आणि मध्यम जमिनीतील सोयाबीन आणि कपाशीने माान टाकणे सुरू केले आहे. मूग, उडीदाचे पीकही कोमेजते आहे.हवामानाचा अंदाज खरा ठरेल काय ?हवामान खात्याने १८ ते १९ जुलैला विदर्भात पावसाचा अंदाज वर्तविला. नंतर २३ जुलै ते २ ऑगस्टपर्यंत पाऊस बरसेल, असे म्हटले. २ ऑगस्टनंतर पुन्हा उघाड पडेल. ऑगस्टमध्ये आणखी पाऊस बरसेल, असा अंदाज आहे. हा पाऊस बरसला तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. प्रत्यक्षात यावर्षी आतापर्यंत हवामान खात्याचा अंदाज अनेकदा फोल ठरला. आता पुढचा तरी अंदाज खरा निघेल काय? याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला आहे. मात्र पाऊस न आल्यास दुबार पेरणीची स्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. त्यावर मात करण्यासाठी अतिरिक्त बियाण्याची तरतूद करण्यात आली आहे.- डॉ.अनिल बोंडे, कृषीमंत्री

टॅग्स :agricultureशेती