शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

१३० दलघमी पाणी पिण्यासाठी आरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 23:34 IST

अपुºया पावसामुळे जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट घोंगावत असून याची पूर्व तयारी म्हणून जिल्हा प्रशासनाने सर्व प्रकल्पातील १३० दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित केले आहे.

ठळक मुद्देदुष्काळाची चाहूल : जिल्ह्यातील ८५० गावांना धोक्याची घंटा

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अपुºया पावसामुळे जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट घोंगावत असून याची पूर्व तयारी म्हणून जिल्हा प्रशासनाने सर्व प्रकल्पातील १३० दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित केले आहे. डिसेंबरनंतर ८५० गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात यावर्षी वार्षिक सरासरीच्या केवळ ६५ टक्के पाऊस झाला. त्यातही सर्वात कमी पाऊस कळंब, यवतमाळ व राळेगाव तालुक्यात नोंदविण्यात आला. अपुºया पावसामुळे जिल्ह्यातील कोणत्याही नदीला पूर गेला नाही. आॅक्टोबर महिन्याच्या अखेरीस नदीपात्र वाळवंट झाले आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील प्रकल्पाची पातळीही वाढली नाही.जिल्ह्यात एक मोठा आणि सहा मध्यम प्रकल्प आहे. सध्या पूस प्रकल्पात २३.६५ टक्के, अरुणावती प्रकल्पात २३.९९ टक्के, गोखी प्रकल्पात १४.९६ टक्के, वाघाडीत १८.३६ टक्के, अडाणमध्ये २७.६५ टक्के, बोरगावमध्ये ११.९५ टक्के आणि बेंबळा प्रकल्पात २९ टक्के जलसाठा आहे. त्यामुळे जिल्ह्यावर पाणीटंचाईचे गंभीर संकट घोंगावत आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पातील १३० दशलक्ष घनमीटर पाणी प्रशासनाने आरक्षित केले आहे. आरक्षणासाठी एका सूत्राचा वापर केला असून त्यात ३३ टक्केपेक्षा कमी पाणीसाठा असलेल्या प्रकल्पाचे संपूर्ण पाणी आरक्षित राहणार आहे. ३३ टक्केपेक्षा अधिक पाणी असेल अशा ठिकाणी गतवर्षीपेक्षा यंदा दुप्पट पाणी आरक्षित करण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार या प्रकल्पातील पाणी नदीपात्रात सोडले जाणार आहे. टँकर अथवा लिफ्ट एरिगेशनच्या माध्यमातूनही पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.नोव्हेंबरमध्ये जिल्ह्यातील १७० गावांत, डिसेंबरमध्ये २३० आणि जानेवारीनंतर ३६० गावांत पाणीटंचाई निर्माण होण्याचा धोका वर्तविला जात आहे. मार्च ते जूनपर्यंत संपूर्ण जिल्ह्यातच पाणीटंचाई निर्माण होण्याचा अंदाज भूजलअभ्यासकांनी वर्तविला आहे.भूजल पातळी एक मीटर घटलीअपुºया पावसामुळे जिल्ह्याची भूजल पातळी तब्बल एक मीटरने खालावली आहे. साधारणत: जिल्ह्याची भूजल पातळी सरासरी ०.२० इंच इतकी खाली गेली आहे.यवतमाळ शहरासाठी पाणी चिंतेचा विषयजिल्हा मुख्यालय यवतमाळची लोकसंख्या आणि त्या तुलनेत शहराला पाणीपुरवठा करणाºया प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा आहे. त्यामुळे यवतमाळ शहरासाठी पाणी हा विषय चिंतेचा होणार आहे. निळोणा प्रकल्पात आठ टक्के तर चापडोहमध्ये १६ टक्के जलसाठा आहे. डिसेंबरपर्यंत पाणी पुरेल असे जीवन प्राधिकरण सांगत आहे. यवतमाळ शहरासाठी बेंबळा प्रकल्पाचे दहा दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. अमृत योजनेच्या माध्यमातून शहरात पाणी आणण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. परंतु यवतमाळकरांना आगामी काळात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार हे निश्चित. यासाठी प्रशासन कोणत्या उपाययोजना करणार, याकडे लक्ष लागले आहे.रबीसाठी नऊ हजार हेक्टरलाच मिळणार पाणीयावर्षी जल प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. याचा थेट परिणाम रबी हंगामाच्या सिंचनावर होणार आहे. दरवर्षी जलप्रकल्पातून साधारणत: ४० हजार हेक्टर ओलित होते. परंतु यावर्षी सायखेडा आणि अधर पूस या दोन प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी सोडले जाईल. त्यावर केवळ नऊ हजार हेक्टर ओलित करण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे. त्यामुळे ३१ हजार हेक्टरवर रबीच्या पेरणीला प्रकल्पाचे पाणी मिळणार नाही.