शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

१३० दलघमी पाणी पिण्यासाठी आरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 23:34 IST

अपुºया पावसामुळे जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट घोंगावत असून याची पूर्व तयारी म्हणून जिल्हा प्रशासनाने सर्व प्रकल्पातील १३० दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित केले आहे.

ठळक मुद्देदुष्काळाची चाहूल : जिल्ह्यातील ८५० गावांना धोक्याची घंटा

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अपुºया पावसामुळे जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट घोंगावत असून याची पूर्व तयारी म्हणून जिल्हा प्रशासनाने सर्व प्रकल्पातील १३० दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित केले आहे. डिसेंबरनंतर ८५० गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात यावर्षी वार्षिक सरासरीच्या केवळ ६५ टक्के पाऊस झाला. त्यातही सर्वात कमी पाऊस कळंब, यवतमाळ व राळेगाव तालुक्यात नोंदविण्यात आला. अपुºया पावसामुळे जिल्ह्यातील कोणत्याही नदीला पूर गेला नाही. आॅक्टोबर महिन्याच्या अखेरीस नदीपात्र वाळवंट झाले आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील प्रकल्पाची पातळीही वाढली नाही.जिल्ह्यात एक मोठा आणि सहा मध्यम प्रकल्प आहे. सध्या पूस प्रकल्पात २३.६५ टक्के, अरुणावती प्रकल्पात २३.९९ टक्के, गोखी प्रकल्पात १४.९६ टक्के, वाघाडीत १८.३६ टक्के, अडाणमध्ये २७.६५ टक्के, बोरगावमध्ये ११.९५ टक्के आणि बेंबळा प्रकल्पात २९ टक्के जलसाठा आहे. त्यामुळे जिल्ह्यावर पाणीटंचाईचे गंभीर संकट घोंगावत आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पातील १३० दशलक्ष घनमीटर पाणी प्रशासनाने आरक्षित केले आहे. आरक्षणासाठी एका सूत्राचा वापर केला असून त्यात ३३ टक्केपेक्षा कमी पाणीसाठा असलेल्या प्रकल्पाचे संपूर्ण पाणी आरक्षित राहणार आहे. ३३ टक्केपेक्षा अधिक पाणी असेल अशा ठिकाणी गतवर्षीपेक्षा यंदा दुप्पट पाणी आरक्षित करण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार या प्रकल्पातील पाणी नदीपात्रात सोडले जाणार आहे. टँकर अथवा लिफ्ट एरिगेशनच्या माध्यमातूनही पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.नोव्हेंबरमध्ये जिल्ह्यातील १७० गावांत, डिसेंबरमध्ये २३० आणि जानेवारीनंतर ३६० गावांत पाणीटंचाई निर्माण होण्याचा धोका वर्तविला जात आहे. मार्च ते जूनपर्यंत संपूर्ण जिल्ह्यातच पाणीटंचाई निर्माण होण्याचा अंदाज भूजलअभ्यासकांनी वर्तविला आहे.भूजल पातळी एक मीटर घटलीअपुºया पावसामुळे जिल्ह्याची भूजल पातळी तब्बल एक मीटरने खालावली आहे. साधारणत: जिल्ह्याची भूजल पातळी सरासरी ०.२० इंच इतकी खाली गेली आहे.यवतमाळ शहरासाठी पाणी चिंतेचा विषयजिल्हा मुख्यालय यवतमाळची लोकसंख्या आणि त्या तुलनेत शहराला पाणीपुरवठा करणाºया प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा आहे. त्यामुळे यवतमाळ शहरासाठी पाणी हा विषय चिंतेचा होणार आहे. निळोणा प्रकल्पात आठ टक्के तर चापडोहमध्ये १६ टक्के जलसाठा आहे. डिसेंबरपर्यंत पाणी पुरेल असे जीवन प्राधिकरण सांगत आहे. यवतमाळ शहरासाठी बेंबळा प्रकल्पाचे दहा दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. अमृत योजनेच्या माध्यमातून शहरात पाणी आणण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. परंतु यवतमाळकरांना आगामी काळात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार हे निश्चित. यासाठी प्रशासन कोणत्या उपाययोजना करणार, याकडे लक्ष लागले आहे.रबीसाठी नऊ हजार हेक्टरलाच मिळणार पाणीयावर्षी जल प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. याचा थेट परिणाम रबी हंगामाच्या सिंचनावर होणार आहे. दरवर्षी जलप्रकल्पातून साधारणत: ४० हजार हेक्टर ओलित होते. परंतु यावर्षी सायखेडा आणि अधर पूस या दोन प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी सोडले जाईल. त्यावर केवळ नऊ हजार हेक्टर ओलित करण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे. त्यामुळे ३१ हजार हेक्टरवर रबीच्या पेरणीला प्रकल्पाचे पाणी मिळणार नाही.