शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
5
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
6
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
7
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
8
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
9
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
10
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
11
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
12
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
13
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
14
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
15
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
16
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
17
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
18
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
19
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
20
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य

१३० दलघमी पाणी पिण्यासाठी आरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 23:34 IST

अपुºया पावसामुळे जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट घोंगावत असून याची पूर्व तयारी म्हणून जिल्हा प्रशासनाने सर्व प्रकल्पातील १३० दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित केले आहे.

ठळक मुद्देदुष्काळाची चाहूल : जिल्ह्यातील ८५० गावांना धोक्याची घंटा

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अपुºया पावसामुळे जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट घोंगावत असून याची पूर्व तयारी म्हणून जिल्हा प्रशासनाने सर्व प्रकल्पातील १३० दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित केले आहे. डिसेंबरनंतर ८५० गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात यावर्षी वार्षिक सरासरीच्या केवळ ६५ टक्के पाऊस झाला. त्यातही सर्वात कमी पाऊस कळंब, यवतमाळ व राळेगाव तालुक्यात नोंदविण्यात आला. अपुºया पावसामुळे जिल्ह्यातील कोणत्याही नदीला पूर गेला नाही. आॅक्टोबर महिन्याच्या अखेरीस नदीपात्र वाळवंट झाले आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील प्रकल्पाची पातळीही वाढली नाही.जिल्ह्यात एक मोठा आणि सहा मध्यम प्रकल्प आहे. सध्या पूस प्रकल्पात २३.६५ टक्के, अरुणावती प्रकल्पात २३.९९ टक्के, गोखी प्रकल्पात १४.९६ टक्के, वाघाडीत १८.३६ टक्के, अडाणमध्ये २७.६५ टक्के, बोरगावमध्ये ११.९५ टक्के आणि बेंबळा प्रकल्पात २९ टक्के जलसाठा आहे. त्यामुळे जिल्ह्यावर पाणीटंचाईचे गंभीर संकट घोंगावत आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पातील १३० दशलक्ष घनमीटर पाणी प्रशासनाने आरक्षित केले आहे. आरक्षणासाठी एका सूत्राचा वापर केला असून त्यात ३३ टक्केपेक्षा कमी पाणीसाठा असलेल्या प्रकल्पाचे संपूर्ण पाणी आरक्षित राहणार आहे. ३३ टक्केपेक्षा अधिक पाणी असेल अशा ठिकाणी गतवर्षीपेक्षा यंदा दुप्पट पाणी आरक्षित करण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार या प्रकल्पातील पाणी नदीपात्रात सोडले जाणार आहे. टँकर अथवा लिफ्ट एरिगेशनच्या माध्यमातूनही पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.नोव्हेंबरमध्ये जिल्ह्यातील १७० गावांत, डिसेंबरमध्ये २३० आणि जानेवारीनंतर ३६० गावांत पाणीटंचाई निर्माण होण्याचा धोका वर्तविला जात आहे. मार्च ते जूनपर्यंत संपूर्ण जिल्ह्यातच पाणीटंचाई निर्माण होण्याचा अंदाज भूजलअभ्यासकांनी वर्तविला आहे.भूजल पातळी एक मीटर घटलीअपुºया पावसामुळे जिल्ह्याची भूजल पातळी तब्बल एक मीटरने खालावली आहे. साधारणत: जिल्ह्याची भूजल पातळी सरासरी ०.२० इंच इतकी खाली गेली आहे.यवतमाळ शहरासाठी पाणी चिंतेचा विषयजिल्हा मुख्यालय यवतमाळची लोकसंख्या आणि त्या तुलनेत शहराला पाणीपुरवठा करणाºया प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा आहे. त्यामुळे यवतमाळ शहरासाठी पाणी हा विषय चिंतेचा होणार आहे. निळोणा प्रकल्पात आठ टक्के तर चापडोहमध्ये १६ टक्के जलसाठा आहे. डिसेंबरपर्यंत पाणी पुरेल असे जीवन प्राधिकरण सांगत आहे. यवतमाळ शहरासाठी बेंबळा प्रकल्पाचे दहा दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. अमृत योजनेच्या माध्यमातून शहरात पाणी आणण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. परंतु यवतमाळकरांना आगामी काळात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार हे निश्चित. यासाठी प्रशासन कोणत्या उपाययोजना करणार, याकडे लक्ष लागले आहे.रबीसाठी नऊ हजार हेक्टरलाच मिळणार पाणीयावर्षी जल प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. याचा थेट परिणाम रबी हंगामाच्या सिंचनावर होणार आहे. दरवर्षी जलप्रकल्पातून साधारणत: ४० हजार हेक्टर ओलित होते. परंतु यावर्षी सायखेडा आणि अधर पूस या दोन प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी सोडले जाईल. त्यावर केवळ नऊ हजार हेक्टर ओलित करण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे. त्यामुळे ३१ हजार हेक्टरवर रबीच्या पेरणीला प्रकल्पाचे पाणी मिळणार नाही.