शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

भांडेगावात कावीळचे १२00 रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 22:19 IST

तालुक्यातील भांडेगाव येथे दूषित पाण्यामुळेच नागरिकांना कावीळची लागण झाल्याचा दावा गावकऱ्यांनी केला. आत्तापर्यंत सुमारे १२०० जणांना कावीळची लागण झाली असून अद्याप रोगावर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य विभागाला यश आले नाही.

ठळक मुद्देगावकरी भयभीत : अद्याप नियंत्रण नाही

मुकेश इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : तालुक्यातील भांडेगाव येथे दूषित पाण्यामुळेच नागरिकांना कावीळची लागण झाल्याचा दावा गावकऱ्यांनी केला. आत्तापर्यंत सुमारे १२०० जणांना कावीळची लागण झाली असून अद्याप रोगावर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य विभागाला यश आले नाही.आरोग्य विभागाने पाण्याचे नमुने घेऊन तपासणीकरिता प्रयोगशाळेत पाठविले. त्याचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे. गेल्या तीन महिन्यांपासून भांडेगाववासी कावीळशी झुंज देत आहे. सध्या रुग्ण संख्या बाराशेवर पोहोचली आहे. आरोग्य विभाग रुग्णांवर उपचार व रोगाच्या मुळाशी जाण्याचे प्रयत्न करीत आहे. मात्र अद्याप पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यात अपयश आले. तीन हजार ७२३ लोकसंख्येच्या या गावात डिसेंबरपासून कावीळ साथ सुरू झाली.जानेवारीत रुग्णसंख्या पाचशेवर पोहोचली. सध्या बाराशे गावकऱ्यांना कावीळने ग्रासले आहे. ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांनी स्थानिक आरोग्य यंत्रणेला माहिती दिल्यानंतर एक डॉक्टर व परिचारिका गावात पाठवून उपचार सुरु केले. परंतु दिवसेंदिवस रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे उपाययोजना कुचकामी ठरली. जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिल्यानंतर खऱ्या अर्थाने यंत्रणा कामाला लागली.आरोग्य सहसंचालक प्रदीप आहुते व पुणे येथील पाणी गुणवत्ता विभागाचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी वाघमारे यांनी भेट देऊन आरोग्य अधिकारी व गावकऱ्यांशी चर्चा केली. नंतर पुणे येथील तज्ञ डॉक्टरांचे पथक आले. त्यांनी पाण्याचे नमुने घेतले. रुग्णांच्या भेटी घेऊन त्यांच्या शौच व रक्ताचेही नमुने घेतले. पुणे येथील विषाणू संस्थेच्या डॉ.अनुराधा त्रिपाठी, डॉ.रानोडे व उपजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कोषटवार यांनीही पाणी, शौच व रक्ताचे नमुने घेतले. दूषित पाण्याचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. परंतु लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकाºयांच्या भेटी व आरोग्य विभागाच्या उपचारानंतरसुद्धा या रोगावर नियंत्रण मिळविता आले नाही.पाणीपुरवठ्याकडे यंत्रणेचे दुर्लक्षपिण्याच्या पाण्यातून ‘हिपेटायटिस ई’ हा व्हायरस शरीरात गेल्यास हा आजार बळावतो. भांडेगाव येथील काही रुग्णांच्या चाचणीत हा व्हायरस आढळल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या साथीला पाणीच कारणीभूत असल्याचे स्पष्ट होते. तरीही पाणीपुरवठ्याकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी दूषित पाण्यामुळेच नागरिकांना कावीळची लागण होत असल्याचे स्पष्ट आहे, असा दावा गावकऱ्यांनी केला आहे.

टॅग्स :Healthआरोग्य