शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
5
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
6
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
7
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
8
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
9
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
10
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
11
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
12
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
13
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
14
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
15
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
16
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
17
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
18
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
19
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
20
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू

प्रसंगावधान राखून यवतमाळातील व्यापाऱ्याने वाचवले १२ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 14:26 IST

सोमवारी रात्री १२ लाखांची रोकड घेऊन यवतमाळ शहराच्या पाटीपुरा भागातील व्यापारी घरी जात असताना या तीन युवकांनी त्याचा पाठलाग केला. लुटमार होण्याची चिन्हे दिसताच या व्यापाऱ्याने आपल्याकडील बॅग एका घरात सुरक्षितरीत्या फेकली. त्यामुळे ही रक्कम वाचली.

ठळक मुद्देयवतमाळातील युवक आर्णीत सक्रियदहा दिवसांपासून सुरू होता पाठलाग, लुटमारीची घटना टळली

हरिओम बघेल

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहराच्या पाटीपुरा भागातील तीन युवक लुटमारीच्या उद्देशाने आर्णीत सक्रिय झाले. सुमारे दहा दिवसांपासून त्यांनी आणीर्तील एका किराणा व पान मटेरियलच्या व्यापाऱ्यावर पाळत ठेवली. याची कल्पना त्या व्यापाऱ्याला आल्याने हा व्यापारी सावध होता. सोमवारी रात्री १२ लाखांची रोकड घेऊन व्यापारी घरी जात असताना या तीन युवकांनी त्याचा पाठलाग केला. लुटमार होण्याची चिन्हे दिसताच या व्यापाऱ्याने आपल्याकडील बॅग एका घरात सुरक्षितरीत्या फेकली. त्यामुळे ही रक्कम वाचली. त्यानंतर या तीन युवकांना पकडण्यात आले.अक्रम घोरी असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. ते आणीर्तील अमराईपुरा येथील रहिवासी आहेत. डोंगा कॉलनी भागात त्यांचे किराणा व पान मटेरियलचे दुकान आहे. दोन-तीन युवक मोटर सायकलने त्यांच्या मागावर असल्याची जाणीव त्यांना ७ फेब्रुवारीला झाली. संभाव्य धोका लक्षात आल्याने घोरी यांनी बाहेर जाताना सुरक्षेच्या दृष्टीने आपल्यासोबत नेहमी दोन जण ठेवण्याचे ठरविले. सोमवारी दुकान बंद करून ते मोटर सायकलने आपल्या दोन सहकाऱ्यांसह घराकडे जात होते. तेव्हा एका मोटरसायकलवरील तीन युवक त्यांचा पाठलाग करीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या मोटरसायकलवरील नंबर प्लेटवर पांढरा रंग मारलेला होता. तीनही युवकांचा चेहरा कापडाने झाकला होता. संभाव्य धोका ओळखून त्यांनी आपल्याजवळील १२ लाखांची रोकड असलेली बॅग अमराईपुरा येथे घराच्या एरियात पोहोचताच ओळखीच्या एका घरात फेकली. त्यानंतर पाठलाग करणाऱ्या या युवकांना पकडले. ७ फेब्रुवारीलासुद्धा पाठलाग करणारे हेच तीन युवक असल्याची खात्री त्यांना पटली. यावेळी झालेल्या गदीर्तील एकाने या तिघांपैकी एकाला ओळखले. तो यवतमाळच्या पाटीपुरा भागातील रहिवासी आहे. चौकशीदरम्यान तीनही युवक पाटीपुरातील असल्याचे त्यांनी सांगितले. रात्री ११ वाजता या युवकांना आर्णी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. मात्र ठाणेदार यशवंत बावीस्कर रजेवर असल्याने उपस्थित पोलिसांनी संशयित व तक्रारकर्त्यांना सोडून देऊन मंगळवारी येण्यास सांगितले. घटना घडली नाही, पैसे नेले नाही, मग गुन्हा कसा नोंदवायचा असा पोलिसांचा सूर होता. पोलिसांनी ठाण्यात आलेल्यांना समजूत घालून रवाना केले. अप्रत्यक्षरीत्या गुन्हा नोंदविणे टाळले जात होते. अशाच पद्धतीने आर्णीत गंभीर गुन्हे दडपले जात आहे. आणीर्तील व्यापाऱ्यांनी अक्रम घोरी यांना पोलिसात फिर्याद नोंदविण्याचा सल्ला दिला आहे. सर्व व्यापारी त्यासाठी सोबत असल्याची ग्वाहीही घोरी यांना दिली.आणीर्तील ही घटना सर्वच व्यापाऱ्यांनी सकाळी दुकानात येताना व रात्री घरी जाताना सावधता बाळगण्याचा संदेश देणारी ठरली आहे.

टॅग्स :RobberyचोरीCrime Newsगुन्हेगारी