शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
2
"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
3
पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने नवी यादी केली प्रसिद्ध
4
IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार
5
धक्कादायक...! हल्लेखोर पिता-पूत्र भारताच्या पासपोर्टवर मनिलाला आलेले; फिलिपिन्सच्या दाव्याने खळबळ 
6
‘मनरेगा’चं नाव बदलण्याविरोधात प्रियंका गांधी आक्रमक, लोकसभेत सरकारला सुनावले खडेबोल
7
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
8
ज्या ठिकाणी गायब होतात विमाने अन् जहाज...'त्या' बर्म्युडा ट्रॅंगलवर वैज्ञानिकांचा नवा खुलासा
9
जनरल याह्या खान, नियाझी 'मदिरा, महिलां'त अडकलेले...; बांगलादेश मुक्तीसंग्रामाचा रिपोर्ट पाकिस्तानने दडपलेला...
10
संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट; म्हणाले, “काँग्रेस आमच्यासोबत नाही, भाजपाला मदत...”
11
Video - मनालीला गेलेल्या पर्यटकासोबत 'स्नो स्कॅम'; युजर म्हणतात, "यापेक्षा जास्त बर्फ फ्रीजमध्ये"
12
फोल्डेबल आयफोनमध्ये काय काय मिळणार? अ‍ॅप्पलनं निश्चित केले फीचर्स, किंमत जाणून थक्क व्हाल!
13
Video - "मी GPS लावला होता..."; हॉटेलमध्ये बायकोला रंगेहाथ पकडल्यावर ढसाढसा रडला नवरा
14
जागावाटपावरून महायुतीत तणाव! मुंबईत शिंदेसेनेला हव्यात १०० हून अधिक जागा, भाजपाचा प्लॅन बी तयार
15
वसंत मोरे मनसे कार्यालयात जाणार; ठाकरे बंधू युतीमुळे पुण्यात पदाधिकाऱ्यांमधील रुसवे फुगवे दूर
16
IPL ऑक्शनच्या दिवशीच परफेक्ट ऑडिशन! व्यंकटेश अय्यरचा SMAT स्पर्धेतील टी-२० सामन्यात मोठा धमाका
17
पश्चिम बंगालमध्ये लाखो मतदारांची नावं वगळली, SIRच्या मसुदा यादीतून धक्कादायक आकडेवारी समोर 
18
National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मोठा दिलासा
19
ICICI Prudential IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आज अखेरची संधी; GMP ₹३०० च्या पार, धमाकेदार लिस्टिंगचे संकेत
20
पीएम नरेंद्र मोदी जॉर्डनच्या दौऱ्यावर; भारतासाठी का महत्वाचा आहे हा देश? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यासाठी ११०० वृक्ष तुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 21:03 IST

हायब्रिड अन्युईटी मॉडेलच्या माध्यमातून जिल्ह्यातील ३०० किलोमीटर रस्त्यांचे रुंदीकरण होणार आहे. यात यवतमाळ-वाशिम मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा येणारे ११०० वृक्ष तुटणार आहेत. यामुळे पर्यावरणाला फार मोठा धोका पोहचणार आहे.

ठळक मुद्देयवतमाळ-दारव्हा-वाशिम मार्ग : झाडावर मार्किंग, विकासासाठी निसर्गाची हानी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : हायब्रिड अन्युईटी मॉडेलच्या माध्यमातून जिल्ह्यातील ३०० किलोमीटर रस्त्यांचे रुंदीकरण होणार आहे. यात यवतमाळ-वाशिम मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा येणारे ११०० वृक्ष तुटणार आहेत. यामुळे पर्यावरणाला फार मोठा धोका पोहचणार आहे. सर्वाधिक निसर्गरम्य रस्ता अशी या रस्त्याची ओळख आता वृक्षकटाईने पुसली जाणार आहे.यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याला जोडणाऱ्या रस्त्याचे रूंदीकरण करण्यासाठी मोजमाप सुरू झाले आहे. यवतमाळ, बोरी, दारव्हा, कुपटा मार्गे मंगरूळपीर असा हा ९४ किमीचा रस्ता आहे. या रस्त्यात यवतमाळ ते बोरी अरबपर्यंत ११०० डेरेदार वृक्ष आहेत. यामध्ये वड, कडूनिंबाच्या झाडांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, ही झाडे ब्रिटिशकालीन आहेत.एखाद्या निसर्गरम्य ठिकाणावरून प्रवास करावा असाच हा वैभवशाली रस्ता आहे. या रस्त्याचे मॉडेल संपूर्ण देशभरात अवलंबण्याची गरज आहे. तरी हे डेरेदार वृक्ष रस्ता रूंदीकरणात जमीनदोस्त होतील. त्याकरिता झाडांवर मार्किंग केली जात आहे. जामवाडीजवळील हेटीपर्यंत या वृक्षांची नोंद झाली. समोरची हद्द वनविभागाची आहे. त्यात दोन्ही बाजूंनी सागाचे वृक्ष आहे. त्यावर नोंद बाकी आहे. मात्र त्या झाडांनाही मार्किंग करून तोडले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.गावकरी म्हणतात झाडे वाचवा, पण विकासही हवाचरस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे तोडू नये, अशी मागणी गावांमधून होत आहे. मात्र त्यांची ही मागणी सरकारी यंत्रणा विकासाच्या नावावर नजरेआड करत आहे. वृक्षाची कटाई झाली तरी नव्याने वृक्ष लावले जातील, असे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात आजपर्यंत बांधण्यात आलेल्या राज्य मार्गावरील तोडलेल्या वृक्षांची नंतर काय अवस्था झाली हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे वृक्षतोडीला पर्याय शोधण्याची मागणी वृक्षप्रेमींकडून होत आहे. विकास आणि निसर्ग दोन्ही हवे आहेत, असेच ते म्हणत आहेत.वृक्ष पुनर्रोपण ही अवघड बाबयवतमाळातील मोठे वृक्ष तुटू नये म्हणून वृक्ष पुनर्रोपण करण्याचा प्रयोग हाती घेतला. मात्र मोजकीच झाडे ‘शिफ्ट’ झाली. इतर झाडे तुटलीच. आज प्रत्येक झाड महत्त्वाचे आहे. असे असताना वृक्ष तुटले तर पुन्हा असे वृक्ष उभे राहतील काय, हे सांगणे अवघड आहे.रस्त्याच्या दुतर्फा असणारी झाडे वाचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने अभियंत्यांना कळविले आहे. झाडे वाचविण्यासाठी ती पुनर्स्थापित केली जाईल. नाईलाजाने तुटली तर नव्याने झाडे लावले जातील.- धनंजय चामलवारअधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

टॅग्स :highwayमहामार्गYavatmalयवतमाळ