शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

रस्त्यासाठी ११०० वृक्ष तुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 21:03 IST

हायब्रिड अन्युईटी मॉडेलच्या माध्यमातून जिल्ह्यातील ३०० किलोमीटर रस्त्यांचे रुंदीकरण होणार आहे. यात यवतमाळ-वाशिम मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा येणारे ११०० वृक्ष तुटणार आहेत. यामुळे पर्यावरणाला फार मोठा धोका पोहचणार आहे.

ठळक मुद्देयवतमाळ-दारव्हा-वाशिम मार्ग : झाडावर मार्किंग, विकासासाठी निसर्गाची हानी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : हायब्रिड अन्युईटी मॉडेलच्या माध्यमातून जिल्ह्यातील ३०० किलोमीटर रस्त्यांचे रुंदीकरण होणार आहे. यात यवतमाळ-वाशिम मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा येणारे ११०० वृक्ष तुटणार आहेत. यामुळे पर्यावरणाला फार मोठा धोका पोहचणार आहे. सर्वाधिक निसर्गरम्य रस्ता अशी या रस्त्याची ओळख आता वृक्षकटाईने पुसली जाणार आहे.यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याला जोडणाऱ्या रस्त्याचे रूंदीकरण करण्यासाठी मोजमाप सुरू झाले आहे. यवतमाळ, बोरी, दारव्हा, कुपटा मार्गे मंगरूळपीर असा हा ९४ किमीचा रस्ता आहे. या रस्त्यात यवतमाळ ते बोरी अरबपर्यंत ११०० डेरेदार वृक्ष आहेत. यामध्ये वड, कडूनिंबाच्या झाडांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, ही झाडे ब्रिटिशकालीन आहेत.एखाद्या निसर्गरम्य ठिकाणावरून प्रवास करावा असाच हा वैभवशाली रस्ता आहे. या रस्त्याचे मॉडेल संपूर्ण देशभरात अवलंबण्याची गरज आहे. तरी हे डेरेदार वृक्ष रस्ता रूंदीकरणात जमीनदोस्त होतील. त्याकरिता झाडांवर मार्किंग केली जात आहे. जामवाडीजवळील हेटीपर्यंत या वृक्षांची नोंद झाली. समोरची हद्द वनविभागाची आहे. त्यात दोन्ही बाजूंनी सागाचे वृक्ष आहे. त्यावर नोंद बाकी आहे. मात्र त्या झाडांनाही मार्किंग करून तोडले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.गावकरी म्हणतात झाडे वाचवा, पण विकासही हवाचरस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे तोडू नये, अशी मागणी गावांमधून होत आहे. मात्र त्यांची ही मागणी सरकारी यंत्रणा विकासाच्या नावावर नजरेआड करत आहे. वृक्षाची कटाई झाली तरी नव्याने वृक्ष लावले जातील, असे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात आजपर्यंत बांधण्यात आलेल्या राज्य मार्गावरील तोडलेल्या वृक्षांची नंतर काय अवस्था झाली हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे वृक्षतोडीला पर्याय शोधण्याची मागणी वृक्षप्रेमींकडून होत आहे. विकास आणि निसर्ग दोन्ही हवे आहेत, असेच ते म्हणत आहेत.वृक्ष पुनर्रोपण ही अवघड बाबयवतमाळातील मोठे वृक्ष तुटू नये म्हणून वृक्ष पुनर्रोपण करण्याचा प्रयोग हाती घेतला. मात्र मोजकीच झाडे ‘शिफ्ट’ झाली. इतर झाडे तुटलीच. आज प्रत्येक झाड महत्त्वाचे आहे. असे असताना वृक्ष तुटले तर पुन्हा असे वृक्ष उभे राहतील काय, हे सांगणे अवघड आहे.रस्त्याच्या दुतर्फा असणारी झाडे वाचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने अभियंत्यांना कळविले आहे. झाडे वाचविण्यासाठी ती पुनर्स्थापित केली जाईल. नाईलाजाने तुटली तर नव्याने झाडे लावले जातील.- धनंजय चामलवारअधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

टॅग्स :highwayमहामार्गYavatmalयवतमाळ