शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

रस्त्यासाठी ११०० वृक्ष तुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 21:03 IST

हायब्रिड अन्युईटी मॉडेलच्या माध्यमातून जिल्ह्यातील ३०० किलोमीटर रस्त्यांचे रुंदीकरण होणार आहे. यात यवतमाळ-वाशिम मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा येणारे ११०० वृक्ष तुटणार आहेत. यामुळे पर्यावरणाला फार मोठा धोका पोहचणार आहे.

ठळक मुद्देयवतमाळ-दारव्हा-वाशिम मार्ग : झाडावर मार्किंग, विकासासाठी निसर्गाची हानी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : हायब्रिड अन्युईटी मॉडेलच्या माध्यमातून जिल्ह्यातील ३०० किलोमीटर रस्त्यांचे रुंदीकरण होणार आहे. यात यवतमाळ-वाशिम मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा येणारे ११०० वृक्ष तुटणार आहेत. यामुळे पर्यावरणाला फार मोठा धोका पोहचणार आहे. सर्वाधिक निसर्गरम्य रस्ता अशी या रस्त्याची ओळख आता वृक्षकटाईने पुसली जाणार आहे.यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याला जोडणाऱ्या रस्त्याचे रूंदीकरण करण्यासाठी मोजमाप सुरू झाले आहे. यवतमाळ, बोरी, दारव्हा, कुपटा मार्गे मंगरूळपीर असा हा ९४ किमीचा रस्ता आहे. या रस्त्यात यवतमाळ ते बोरी अरबपर्यंत ११०० डेरेदार वृक्ष आहेत. यामध्ये वड, कडूनिंबाच्या झाडांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, ही झाडे ब्रिटिशकालीन आहेत.एखाद्या निसर्गरम्य ठिकाणावरून प्रवास करावा असाच हा वैभवशाली रस्ता आहे. या रस्त्याचे मॉडेल संपूर्ण देशभरात अवलंबण्याची गरज आहे. तरी हे डेरेदार वृक्ष रस्ता रूंदीकरणात जमीनदोस्त होतील. त्याकरिता झाडांवर मार्किंग केली जात आहे. जामवाडीजवळील हेटीपर्यंत या वृक्षांची नोंद झाली. समोरची हद्द वनविभागाची आहे. त्यात दोन्ही बाजूंनी सागाचे वृक्ष आहे. त्यावर नोंद बाकी आहे. मात्र त्या झाडांनाही मार्किंग करून तोडले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.गावकरी म्हणतात झाडे वाचवा, पण विकासही हवाचरस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे तोडू नये, अशी मागणी गावांमधून होत आहे. मात्र त्यांची ही मागणी सरकारी यंत्रणा विकासाच्या नावावर नजरेआड करत आहे. वृक्षाची कटाई झाली तरी नव्याने वृक्ष लावले जातील, असे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात आजपर्यंत बांधण्यात आलेल्या राज्य मार्गावरील तोडलेल्या वृक्षांची नंतर काय अवस्था झाली हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे वृक्षतोडीला पर्याय शोधण्याची मागणी वृक्षप्रेमींकडून होत आहे. विकास आणि निसर्ग दोन्ही हवे आहेत, असेच ते म्हणत आहेत.वृक्ष पुनर्रोपण ही अवघड बाबयवतमाळातील मोठे वृक्ष तुटू नये म्हणून वृक्ष पुनर्रोपण करण्याचा प्रयोग हाती घेतला. मात्र मोजकीच झाडे ‘शिफ्ट’ झाली. इतर झाडे तुटलीच. आज प्रत्येक झाड महत्त्वाचे आहे. असे असताना वृक्ष तुटले तर पुन्हा असे वृक्ष उभे राहतील काय, हे सांगणे अवघड आहे.रस्त्याच्या दुतर्फा असणारी झाडे वाचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने अभियंत्यांना कळविले आहे. झाडे वाचविण्यासाठी ती पुनर्स्थापित केली जाईल. नाईलाजाने तुटली तर नव्याने झाडे लावले जातील.- धनंजय चामलवारअधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

टॅग्स :highwayमहामार्गYavatmalयवतमाळ