शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

मार्च एंडच्या तोंडावर जिल्हा परिषद 'लॉक', लेट येणारे कर्मचारी बाहेर ताटकळले

By नंदकिशोर नारे | Updated: March 27, 2024 15:00 IST

सीईओंनी केली कानउघडणी

वाशिम .. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी २७ मार्च राेजी  कार्यालयात उशिरा येणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना धक्का दिला. जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीचे तिनही प्रवेशद्वारे सकाळी ९:५० वाजता बंद करुन त्यांना कुलुप लावण्याचे आदेश दिले आणि उशिरा येणाऱ्यांना बाहेरच ताटकळत थांबण्याची वेळ आली. नंतर सुमारे ११:१५ वा. गेटबाहेर येऊन सीईओ वाघमारे यांनी उशिरा येणाऱ्या ५० कर्मचाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. जिल्हा परिषदेत मार्च एंडच्या कामाची लगबग सुरु असुन सकाळी- सकाळी जिल्हा परिषदेचे तीनही चॅनल गेट कुलुप बंद दिसल्याने काही क्षण कर्मचाऱ्यांसह बाहेरुन येणारे नागरिकही बुचकाळ्यात पडले होते.

कार्यालयात येण्यास उशिर होत असल्यास जिल्हा परिषदेच्या व्हॉटस्अप ग्रुपवर संदेश संदेश टाकण्याचे निर्देश यापूर्वीच सीईओ वाघमारे यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांना दिले होते. तरीही आज सुमार ५० कर्मचारी कार्यालयीन वेळेपेक्षा उशिरा आल्याने त्यांनी कर्मचाऱ्यांसमोर आपला संताप व्यक्त केला.

“उशिरा कार्यालयात येऊन कर्तव्यात कसुर करता म्हणुन वाशिम जिल्हा हा अकांक्षित राहिला… तुमचे घर आकांक्षित आहे का..” असा संतप्त सवाल करीत त्यांनी लेटलतिफ कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.  तीन वेळा कार्यालयात विलंबाने येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

टॅग्स :washimवाशिम