शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

मन, बुद्धीला न पटणाऱ्या बाबींबद्दल युवकांनी ठोस भूमिका घ्यावी! - विठ्ठल वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 14:20 IST

युवकांनी जे पटत नाही, त्याबद्दल ठोस भूमिका घ्यायला हवी आणि प्रतिक्रिया देखील नोंदवत राहावी, असे प्रतिपादन लोक कवी डॉ. विठ्ठल वाघ यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: आपल्या सभोवताल जे घडते, ते मनाला व बुद्धीलाही पटत नाही. असे असताना आपण त्याच्याबद्दल कुठलीही ठोस भूमिका घेत नाही, प्रतिक्रिया नोंदवत नाही, अशी सद्याची परिस्थिती आहे; मात्र असे व्हायला नको. युवकांनी जे पटत नाही, त्याबद्दल ठोस भूमिका घ्यायला हवी आणि प्रतिक्रिया देखील नोंदवत राहावी, असे प्रतिपादन लोक कवी डॉ. विठ्ठल वाघ यांनी केले.वाशिम येथील सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय व सृष्टी बहुद्देशीय संस्था, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २ फेब्रूवारीला चौथे राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलन एसएमसी शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रांगणात पार पडले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. डॉ. योगीनी सातारकर-पांडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या युवा मराठी साहित्य संमेलनास प्रा. डॉ. संतोष हुशे, नाट्यकर्मी सुरेश नागले, ज्येष्ठ लेखक नामदेव कांबळे, तेजेंद्रसिंह चौहान, प्राचार्य संजय चौधरी, डॉ. विजय काळे, तरुणाई फाउंडेशनचे संस्थापक मनजितसिंह शिख, काव्याग्रहचे विष्णू जोशी, पूर्व संमेलनाध्यक्ष नवनाथ गोरे, नाशिकचे किरण सोनार, सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. पप्पू मोरवाल, वºहाडी साहित्यिक अरविंद शिंगाडे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.लोक कवी विठ्ठल वाघ म्हणाले, गरिबी आहे, दारिद्रय आहे, मी खेड्यातून आलो आहे, असे वारंवार म्हणून रडत बसायचे नाही. कितीही मोठा पहाड चढणे कठीण असते म्हणून हार मानू नका; तर सतत जिंकण्यासाठी संघर्ष करा, असा सल्ला यावेळी विठ्ठल वाघ यांनी उपस्थित युवा साहित्यीकांना दिला. उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘सृष्टी’चे अध्यक्ष संतोष इंगळे यांनी केले. विशालराजे बोरे, प्रा. गजानन वाघ यांनी सूत्रसंचालन केले.दुसºया सत्रात ‘कायद्याची सक्ती महिलांवरील अत्याचार थांबवू शकते का?’ या विषयावर परिसंवाद झाला. तिसºया सत्रात नितीन वरणकार यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन पार पडले. गोपाल खाडे, वैभव भिवरकर, अ‍ॅड. विशाखा बोरकर, अनिकेत देशमुख, ग. ना. कांबळे, गजानन फुसे, प्रा. सुनिता अवचार, स्वप्नील कोकाटे, गणेश बोंडे, रामदास देशमुख आदिंनी रंगारंग कविता सादर करून संमेलनात रंगत आणली. सूत्रसंचालन चाफेश्वर गांगवे, डॉ. विजय काळे यांनी केले. त्यानंतर संमेलनाध्यक्ष डॉ. योगिनी पांडे यांच्या अध्यक्षतेखाली समारोपीय कार्यक्रम पार पडला. प्रसिद्ध लेखक बाबाराव मुसळे, ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद अपराजित, कथाकार सुरेश पाचकवडे, अ‍ॅड. अनंत खेळकर, नरेंद्र लांजेवार, किशोर बळी, प्रा. डॉ. मोहन खडसे, माणिक शेळके, डॉ. नितेश खोंडे, डॉ. हरीश बाहेती, आदिंची प्रमुख उपस्थिती होती. शब्दसृष्टी साहित्य रत्न पुरस्कार, युथ आयकॉन पुरस्कारांचे वितरणही संमेलनात करण्यात आले.

 

टॅग्स :washimवाशिमliteratureसाहित्य