शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

मन, बुद्धीला न पटणाऱ्या बाबींबद्दल युवकांनी ठोस भूमिका घ्यावी! - विठ्ठल वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 14:20 IST

युवकांनी जे पटत नाही, त्याबद्दल ठोस भूमिका घ्यायला हवी आणि प्रतिक्रिया देखील नोंदवत राहावी, असे प्रतिपादन लोक कवी डॉ. विठ्ठल वाघ यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: आपल्या सभोवताल जे घडते, ते मनाला व बुद्धीलाही पटत नाही. असे असताना आपण त्याच्याबद्दल कुठलीही ठोस भूमिका घेत नाही, प्रतिक्रिया नोंदवत नाही, अशी सद्याची परिस्थिती आहे; मात्र असे व्हायला नको. युवकांनी जे पटत नाही, त्याबद्दल ठोस भूमिका घ्यायला हवी आणि प्रतिक्रिया देखील नोंदवत राहावी, असे प्रतिपादन लोक कवी डॉ. विठ्ठल वाघ यांनी केले.वाशिम येथील सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय व सृष्टी बहुद्देशीय संस्था, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २ फेब्रूवारीला चौथे राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलन एसएमसी शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रांगणात पार पडले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. डॉ. योगीनी सातारकर-पांडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या युवा मराठी साहित्य संमेलनास प्रा. डॉ. संतोष हुशे, नाट्यकर्मी सुरेश नागले, ज्येष्ठ लेखक नामदेव कांबळे, तेजेंद्रसिंह चौहान, प्राचार्य संजय चौधरी, डॉ. विजय काळे, तरुणाई फाउंडेशनचे संस्थापक मनजितसिंह शिख, काव्याग्रहचे विष्णू जोशी, पूर्व संमेलनाध्यक्ष नवनाथ गोरे, नाशिकचे किरण सोनार, सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. पप्पू मोरवाल, वºहाडी साहित्यिक अरविंद शिंगाडे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.लोक कवी विठ्ठल वाघ म्हणाले, गरिबी आहे, दारिद्रय आहे, मी खेड्यातून आलो आहे, असे वारंवार म्हणून रडत बसायचे नाही. कितीही मोठा पहाड चढणे कठीण असते म्हणून हार मानू नका; तर सतत जिंकण्यासाठी संघर्ष करा, असा सल्ला यावेळी विठ्ठल वाघ यांनी उपस्थित युवा साहित्यीकांना दिला. उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘सृष्टी’चे अध्यक्ष संतोष इंगळे यांनी केले. विशालराजे बोरे, प्रा. गजानन वाघ यांनी सूत्रसंचालन केले.दुसºया सत्रात ‘कायद्याची सक्ती महिलांवरील अत्याचार थांबवू शकते का?’ या विषयावर परिसंवाद झाला. तिसºया सत्रात नितीन वरणकार यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन पार पडले. गोपाल खाडे, वैभव भिवरकर, अ‍ॅड. विशाखा बोरकर, अनिकेत देशमुख, ग. ना. कांबळे, गजानन फुसे, प्रा. सुनिता अवचार, स्वप्नील कोकाटे, गणेश बोंडे, रामदास देशमुख आदिंनी रंगारंग कविता सादर करून संमेलनात रंगत आणली. सूत्रसंचालन चाफेश्वर गांगवे, डॉ. विजय काळे यांनी केले. त्यानंतर संमेलनाध्यक्ष डॉ. योगिनी पांडे यांच्या अध्यक्षतेखाली समारोपीय कार्यक्रम पार पडला. प्रसिद्ध लेखक बाबाराव मुसळे, ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद अपराजित, कथाकार सुरेश पाचकवडे, अ‍ॅड. अनंत खेळकर, नरेंद्र लांजेवार, किशोर बळी, प्रा. डॉ. मोहन खडसे, माणिक शेळके, डॉ. नितेश खोंडे, डॉ. हरीश बाहेती, आदिंची प्रमुख उपस्थिती होती. शब्दसृष्टी साहित्य रत्न पुरस्कार, युथ आयकॉन पुरस्कारांचे वितरणही संमेलनात करण्यात आले.

 

टॅग्स :washimवाशिमliteratureसाहित्य