लोकमत न्यूज नेटवर्कहराळ (वाशिम): सोयाबीनची काढणी करीत असताना मळणीयंत्रात फसल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची घटना रिसोड तालुक्यातील हराळ येथे ५ ऑक्टोबर रोजी घडली. या घटनेची पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. राजू उत्तम शेंडगे (३०), असे मृतकाचे नाव आहे. खरीप हंगामातील सोयाबीनच्या काढणीला वेग आला असून, रिसोड तालुक्यात अनेक शेतकरी मळणीयंत्राद्वारे सोयाबीनची काढणी करीत आहेत. शुक्रवार ५ ऑक्टोबर रोजी तालुक्यातील हराळ शिवारात सोयाबीनची मळणी यंत्राने काढणी करण्यात येत असताना राजू उत्तम शेंडगे हा ३० वर्षीय युवक मळणीयंत्रात पडला. त्यामध्ये आत ओढला गेल्याने मळणीयंत्रात फसून त्याचा मृत्यू झाला. या घटनेची तक्रार रिसोड पोलिसांत करण्यात आली असून, पोलीस या प्रकरणी तपास करीत आहेत.
मळणीयंत्रात फसून युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 17:49 IST
हराळ (वाशिम): सोयाबीनची काढणी करीत असताना मळणीयंत्रात फसल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची घटना रिसोड तालुक्यातील हराळ येथे ५ सप्टेंबर रोजी घडली.
मळणीयंत्रात फसून युवकाचा मृत्यू
ठळक मुद्दे राजू उत्तम शेंडगे (३०), असे मृतकाचे नाव आहे. आत ओढला गेल्याने मळणीयंत्रात फसून त्याचा मृत्यू झाला.