शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

युवकांना साहित्याची गोडी लागणे गरजेचे-  प्रा.डॉ. योगिनी सातारकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 15:09 IST

मी रामानंद तीर्थ विद्यापिठाच्या प्रा.डॉ. योगिनी सातारकर (पांडे) याच्याशी साधलेला हा संवाद...

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : युवा साहित्यीकांच्या प्रतिभेला हक्काचे व्यासपिठ मिळवून देण्यासाठी  तद्वतच विविध क्षेत्रातील युवा प्रतिभावंतांचा यथोचित सन्मान व्हावा, या उद्देशाने वाशिमच्या सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाने २ फेब्रूवारीला चौथे राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलन आयोजित केले आहे. या संमेलनाचे अध्यक्षस्थान नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापिठाच्या प्रा.डॉ. योगिनी सातारकर (पांडे) भुषविणार आहेत. त्यांची आजवरची कारकिर्द व युवकांचा कल साहित्य क्षेत्राकडे वाढविण्यासंबंधी काय करता येईल, यासंदर्भात त्यांच्याशी साधलेला हा संवाद...

आपला आतापर्यंतचा लेखन प्रवास कसा झाला?साधारण नववीत असतानाच कविता लिहण्याचा छंद मला जडला. वडील नांदेड विद्यापीठात नोकरीला असल्याने मी बारावीनंतरच्या शिक्षणासाठी नांदेडला आले. शिक्षण सुरू असतानाच कविता  लिहिणेही सुरूच होते. याशिवाय लेख, स्फुट लेखनही करता आले. २०१५ मध्ये माझा ‘जाणिवांचे हिरवे कोंभ’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. त्याला विशाखा पुरस्कारासह एकूण १४ साहित्य पुरस्कार मिळाले.

युवक-युवतींना साहित्याकडे कसे वळविता येईल?वाचनाची गोडी जाणीवपूर्वक जोपासणे महत्वाचे आहे. सोशल मीडियासह विविध प्रसार माध्यमांनी व्यापलेल्या या काळात युवक-युवतींमध्ये  साहित्याची आवड निर्माण व्हावी, यासाठी सर्वंकष प्रयत्न होणे गरजेचे आहे. फिरती वाचनालये, विविध स्वरूपातील स्पर्धांमधून ते करता येणे शक्य आहे. नव्याने लिहू पाहणाºया युवकांना संधी व व्यासपीठ उपलब्ध करून दिले पाहिजे. सद्या फेसबुकसारख्या माध्यमामुळे ते मिळाले आहे; पण त्यासोबतच यामाध्यमातून रचलेले साहित्य किती गंभीरपणानी लिहिलेले आहे आणि त्यातून नवोदितांना किती प्रोत्साहन मिळते, यावरही विचार होणे आवश्यक आहे.

युवा साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणून तुम्हाला काय वाटते?वाशिममधील युवा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मला मिळाले, याचा आनंद आहे. यानिमित्ताने पहिल्यांदाच एका महिलेला अध्यक्षपद मिळाले, याचेही समाधान आहे. माझ्या पिढीतील लिहित्या हातांची प्रतिनिधी म्हणून मी येथे आहे, याची आपणास जाणीव आहे. दरवर्षी विदर्भातील एका गावात संमेलन ठेवण्याची कल्पना स्तुत्य आहे. यामुळे वैचारिक परिवर्तन होणे शक्य आहे.

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखत