शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
7
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
8
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
9
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
10
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
11
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
12
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
13
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
14
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
15
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
16
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
17
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
19
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
20
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा

युवकांना साहित्याची गोडी लागणे गरजेचे-  प्रा.डॉ. योगिनी सातारकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 15:09 IST

मी रामानंद तीर्थ विद्यापिठाच्या प्रा.डॉ. योगिनी सातारकर (पांडे) याच्याशी साधलेला हा संवाद...

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : युवा साहित्यीकांच्या प्रतिभेला हक्काचे व्यासपिठ मिळवून देण्यासाठी  तद्वतच विविध क्षेत्रातील युवा प्रतिभावंतांचा यथोचित सन्मान व्हावा, या उद्देशाने वाशिमच्या सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाने २ फेब्रूवारीला चौथे राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलन आयोजित केले आहे. या संमेलनाचे अध्यक्षस्थान नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापिठाच्या प्रा.डॉ. योगिनी सातारकर (पांडे) भुषविणार आहेत. त्यांची आजवरची कारकिर्द व युवकांचा कल साहित्य क्षेत्राकडे वाढविण्यासंबंधी काय करता येईल, यासंदर्भात त्यांच्याशी साधलेला हा संवाद...

आपला आतापर्यंतचा लेखन प्रवास कसा झाला?साधारण नववीत असतानाच कविता लिहण्याचा छंद मला जडला. वडील नांदेड विद्यापीठात नोकरीला असल्याने मी बारावीनंतरच्या शिक्षणासाठी नांदेडला आले. शिक्षण सुरू असतानाच कविता  लिहिणेही सुरूच होते. याशिवाय लेख, स्फुट लेखनही करता आले. २०१५ मध्ये माझा ‘जाणिवांचे हिरवे कोंभ’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. त्याला विशाखा पुरस्कारासह एकूण १४ साहित्य पुरस्कार मिळाले.

युवक-युवतींना साहित्याकडे कसे वळविता येईल?वाचनाची गोडी जाणीवपूर्वक जोपासणे महत्वाचे आहे. सोशल मीडियासह विविध प्रसार माध्यमांनी व्यापलेल्या या काळात युवक-युवतींमध्ये  साहित्याची आवड निर्माण व्हावी, यासाठी सर्वंकष प्रयत्न होणे गरजेचे आहे. फिरती वाचनालये, विविध स्वरूपातील स्पर्धांमधून ते करता येणे शक्य आहे. नव्याने लिहू पाहणाºया युवकांना संधी व व्यासपीठ उपलब्ध करून दिले पाहिजे. सद्या फेसबुकसारख्या माध्यमामुळे ते मिळाले आहे; पण त्यासोबतच यामाध्यमातून रचलेले साहित्य किती गंभीरपणानी लिहिलेले आहे आणि त्यातून नवोदितांना किती प्रोत्साहन मिळते, यावरही विचार होणे आवश्यक आहे.

युवा साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणून तुम्हाला काय वाटते?वाशिममधील युवा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मला मिळाले, याचा आनंद आहे. यानिमित्ताने पहिल्यांदाच एका महिलेला अध्यक्षपद मिळाले, याचेही समाधान आहे. माझ्या पिढीतील लिहित्या हातांची प्रतिनिधी म्हणून मी येथे आहे, याची आपणास जाणीव आहे. दरवर्षी विदर्भातील एका गावात संमेलन ठेवण्याची कल्पना स्तुत्य आहे. यामुळे वैचारिक परिवर्तन होणे शक्य आहे.

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखत