शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

यंदा केवळ सहा टॅंकरच्या आधारे निवळली पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 12:12 IST

Water Scarcity in Washim : तीन तालुक्यांतील सहा गावांचा अपवाद वगळता इतर कुठेही टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची गरज भासली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गतवर्षी जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत १२० टक्के पर्जन्यमान झाले. त्यामुळे चालू वर्षी उन्हाळ्यात जिल्ह्याला तीव्र स्वरूपात पाणीटंचाईची झळ सहन करावी लागली नाही. तीन तालुक्यांतील सहा गावांचा अपवाद वगळता इतर कुठेही टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची गरज भासली नाही. विशेष म्हणजे ही गावेही आता पाणीटंचाईच्या विळख्यातून बाहेर पडत असल्याचे आशादायक चित्र निर्माण झाले आहे.जिल्ह्यात उद्भवलेल्या पाणीटंचाईबाबत गेल्या पाच वर्षांचा विचार झाल्यास २०१७ ते १०१९ या तीन वर्षांत जिल्ह्याला भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले. २०२० आणि २०२१ ही दोन वर्षे मात्र मुबलक पाणी उपलब्धतेची ठरली. गतवर्षी केवळ दोन गावांमध्ये टॅंकर लावावे लागले, तर चालू वर्षी कारंजा तालुक्यातील गिर्डा, धोत्रा देशमुख, रिसोड तालुक्यातील करंजी गरड, मालेगाव तालुक्यातील वरदरी बु., खैरखेडा आणि पिंपळवाडी या सहा गावांना टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागला. प्रशासनाने ६९ गावांमध्ये ६८ विहिरींचे अधिग्रहण केले होते. यासह २८ ठिकाणी विशेष नळदुरुस्ती आणि चार ठिकाणी तात्पुरती पूरक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. याद्वारे पाणीटंचाईवर मात करणे शक्य झाले आहे. उपाययोजनांवर साधारणत: १.८२ कोटींचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

एकबुर्जी प्रकल्प भरण्याची प्रतिक्षा वाशिम शहराला नजिकच्या एकबुर्जी मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. गतवर्षी झालेल्या चांगल्या पर्जन्यमानामुळे चालुवर्षीच्या उन्हाळ्यात शहराला पाणीटंचाई जाणवली नाही. असे असले तरी एकबुर्जी प्रकल्पाची पाणीपातळी घटलेली आहे. १० ते १२ जून दरम्यान झालेल्या पावसाने ती काहीअंशी वाढली आहे. हा प्रकल्प तुडूंब भरण्याची प्रतिक्षा सर्वांनाच लागून आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwashimवाशिम