शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

यंदा केवळ सहा टॅंकरच्या आधारे निवळली पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 12:12 IST

Water Scarcity in Washim : तीन तालुक्यांतील सहा गावांचा अपवाद वगळता इतर कुठेही टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची गरज भासली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गतवर्षी जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत १२० टक्के पर्जन्यमान झाले. त्यामुळे चालू वर्षी उन्हाळ्यात जिल्ह्याला तीव्र स्वरूपात पाणीटंचाईची झळ सहन करावी लागली नाही. तीन तालुक्यांतील सहा गावांचा अपवाद वगळता इतर कुठेही टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची गरज भासली नाही. विशेष म्हणजे ही गावेही आता पाणीटंचाईच्या विळख्यातून बाहेर पडत असल्याचे आशादायक चित्र निर्माण झाले आहे.जिल्ह्यात उद्भवलेल्या पाणीटंचाईबाबत गेल्या पाच वर्षांचा विचार झाल्यास २०१७ ते १०१९ या तीन वर्षांत जिल्ह्याला भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले. २०२० आणि २०२१ ही दोन वर्षे मात्र मुबलक पाणी उपलब्धतेची ठरली. गतवर्षी केवळ दोन गावांमध्ये टॅंकर लावावे लागले, तर चालू वर्षी कारंजा तालुक्यातील गिर्डा, धोत्रा देशमुख, रिसोड तालुक्यातील करंजी गरड, मालेगाव तालुक्यातील वरदरी बु., खैरखेडा आणि पिंपळवाडी या सहा गावांना टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागला. प्रशासनाने ६९ गावांमध्ये ६८ विहिरींचे अधिग्रहण केले होते. यासह २८ ठिकाणी विशेष नळदुरुस्ती आणि चार ठिकाणी तात्पुरती पूरक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. याद्वारे पाणीटंचाईवर मात करणे शक्य झाले आहे. उपाययोजनांवर साधारणत: १.८२ कोटींचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

एकबुर्जी प्रकल्प भरण्याची प्रतिक्षा वाशिम शहराला नजिकच्या एकबुर्जी मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. गतवर्षी झालेल्या चांगल्या पर्जन्यमानामुळे चालुवर्षीच्या उन्हाळ्यात शहराला पाणीटंचाई जाणवली नाही. असे असले तरी एकबुर्जी प्रकल्पाची पाणीपातळी घटलेली आहे. १० ते १२ जून दरम्यान झालेल्या पावसाने ती काहीअंशी वाढली आहे. हा प्रकल्प तुडूंब भरण्याची प्रतिक्षा सर्वांनाच लागून आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwashimवाशिम