शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

यंदा केवळ सहा टॅंकरच्या आधारे निवळली पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 12:12 IST

Water Scarcity in Washim : तीन तालुक्यांतील सहा गावांचा अपवाद वगळता इतर कुठेही टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची गरज भासली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गतवर्षी जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत १२० टक्के पर्जन्यमान झाले. त्यामुळे चालू वर्षी उन्हाळ्यात जिल्ह्याला तीव्र स्वरूपात पाणीटंचाईची झळ सहन करावी लागली नाही. तीन तालुक्यांतील सहा गावांचा अपवाद वगळता इतर कुठेही टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची गरज भासली नाही. विशेष म्हणजे ही गावेही आता पाणीटंचाईच्या विळख्यातून बाहेर पडत असल्याचे आशादायक चित्र निर्माण झाले आहे.जिल्ह्यात उद्भवलेल्या पाणीटंचाईबाबत गेल्या पाच वर्षांचा विचार झाल्यास २०१७ ते १०१९ या तीन वर्षांत जिल्ह्याला भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले. २०२० आणि २०२१ ही दोन वर्षे मात्र मुबलक पाणी उपलब्धतेची ठरली. गतवर्षी केवळ दोन गावांमध्ये टॅंकर लावावे लागले, तर चालू वर्षी कारंजा तालुक्यातील गिर्डा, धोत्रा देशमुख, रिसोड तालुक्यातील करंजी गरड, मालेगाव तालुक्यातील वरदरी बु., खैरखेडा आणि पिंपळवाडी या सहा गावांना टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागला. प्रशासनाने ६९ गावांमध्ये ६८ विहिरींचे अधिग्रहण केले होते. यासह २८ ठिकाणी विशेष नळदुरुस्ती आणि चार ठिकाणी तात्पुरती पूरक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. याद्वारे पाणीटंचाईवर मात करणे शक्य झाले आहे. उपाययोजनांवर साधारणत: १.८२ कोटींचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

एकबुर्जी प्रकल्प भरण्याची प्रतिक्षा वाशिम शहराला नजिकच्या एकबुर्जी मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. गतवर्षी झालेल्या चांगल्या पर्जन्यमानामुळे चालुवर्षीच्या उन्हाळ्यात शहराला पाणीटंचाई जाणवली नाही. असे असले तरी एकबुर्जी प्रकल्पाची पाणीपातळी घटलेली आहे. १० ते १२ जून दरम्यान झालेल्या पावसाने ती काहीअंशी वाढली आहे. हा प्रकल्प तुडूंब भरण्याची प्रतिक्षा सर्वांनाच लागून आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwashimवाशिम