शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
2
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
3
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
4
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
5
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
6
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
7
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
8
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
9
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
10
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
11
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
12
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
13
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
14
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
15
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
16
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
17
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
18
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!
19
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
20
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!

उद्योग सुरू न करणार्‍यांकडून भूखंड घेतले जाणार परत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 2:33 AM

अनेक वर्षांपासून अनेक भूखंडधारकांनी विनावापर केवळ जागा अडवून ठेवल्याने नवीन उद्योग उभे होण्यास अडचण जात असल्याने उद्योग सुरू न करणार्‍यांकडून भूखंड परत घेण्याची कार्यवाही लवकरच केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देवाशिम एमआयडीसी४५0 एकर जमीन विनावापर पडून

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्हय़ातील चार तालुक्यांमध्ये असलेल्या ‘एमआयडीसी’पैकी वाशिम शहरानजीकच्या एमआयडीसीत टप्प्याटप्प्याने सर्वच प्रकारच्या मूलभूत सुविधा उपलब्ध होत आहेत. असे असले तरी ५३७ एकर क्षेत्रापैकी आजमितीस केवळ २५ एकर क्षेत्रावरच सात उद्योग उभे झाले. तथापि, गत अनेक वर्षांपासून अनेक भूखंडधारकांनी विनावापर केवळ जागा अडवून ठेवल्याने नवीन उद्योग उभे होण्यास अडचण जात असल्याने उद्योग सुरू न करणार्‍यांकडून भूखंड परत घेण्याची कार्यवाही लवकरच केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या वाशिममध्ये हिंगोली रोडवर ५३७ एकर क्षेत्रात ‘एमआयडीसी’ वसलेली आहे. गेल्या काही वर्षांत ‘एमआयडीसी’ परिसरात कोट्यवधी रुपयांचा निधी खचरून चकाचक रस्त्यांची निर्मिती करण्यात आली. आवश्यक त्या सर्वठिकाणी विद्यूत पथदिवेदेखील लावण्यात आले. उद्योगधंद्यांच्या पाण्याची अडचण भागविण्याकरिता नजीकच्या बोराळा धरणावरून पाइपलाइन टाकण्यात आली; मात्र प्राथमिक स्तरावर उद्योगधंद्यांना आवश्यक सर्व सुविधा पुरविण्यात आल्यामुळे अपेक्षित प्रयत्न झाल्यास मोठय़ा कंपन्या वाशिमच्या एमआयडीसीमध्ये उद्योग सुरू करू शकतात; मात्र त्यासाठी प्रशासन आणि विद्यमान लोकप्रतिनिधींच्या सकारात्मक प्रयत्नांची नितांत आवश्यकता भासत आहे.वाशिममध्ये वाटप करण्यात आलेल्या ९७ भूखंडांपैकी आजमितीस सुमारे ९0 भूखंडांवर ज्यांनी मालकी हक्क ठेवला आहे, त्यांनी विनाविलंब बांधकाम करून प्रस्तावित उद्योग सुरू करणे आवश्यक आहे. ५ वर्षांपेक्षा अधिक कालावधीपर्यंत बांधकाम करून उद्योग सुरू न झाल्यास भूखंड परत करण्याचा नियम आहे. त्यानुसार, लवकरच भूखंड परत घेण्याची ठोस कार्यवाही प्रशासनाकडून केली जाणार आहे.

वाशिमच्या ‘एमआयडीसी’त उद्योगांसाठी पोषक स्थिती!अमृतसर, इंदूर, खंडवा, अकोला, नांदेड, हैद्राबाद यासह अनेक बड्या शहरांना जोडणारा रेल्वेमार्ग वाशिममधून गेला असून, आंध्रप्रदेशची सीमादेखील जिल्हय़ापासून काहीच अंतरावरच आहे. मोठय़ा उद्योगधंद्यांसाठी ही बाब निश्‍चितपणे पोषक ठरणारी आहे.

८३0 कोटींचा प्रकल्प वळता झाला नागपुरात!सन २0१५ मध्ये ‘कोका कोला’ या कंपनीच्या काही प्रतिनिधींनी ‘एमआयडीसी’मध्ये जागेची पाहणी केली होती; मात्र त्यांना प्रशासनाकडून तद्वतच राजकीय क्षेत्रातून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने ८३0 कोटी रुपयांचा हा प्रकल्प वाशिमऐवजी नागपुरात वळता झाला.

वाशिमच्या ‘एमआयडीसी’मध्ये उद्योगास लागणार्‍या सर्व सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. त्यामुळे ज्यांना भूखंड मिळाला, त्यांनी विनाविलंब बांधकाम करून उद्योग सुरू करणे क्रमप्राप्त आहे. असे न झाल्यास दिलेला भूखंड परत घेण्याची कार्यवाही केली जाईल.- सी.एस. डोईजडक्षेत्र व्यवस्थापक, एमआयडीसी- 

टॅग्स :MIDCएमआयडीसी