शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही..."; संसदेत गृहमंत्री अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
Video - भीषण! अमेरिकेमध्ये F-35 फायटर जेट क्रॅश; पायलटने 'असा' वाचवला जीव
3
ज्वेलरी शॉपमध्ये अचानक पुराचे पाणी घुसले, २० किलो सोन्याचे दागिने, हिरे वाहून गेले; लोक चिखल रापत बसले...
4
एकेकाळी ५ रुपयांसाठी मजुरी करायच्या, आज अमेरिकन कंपनीच्या CEO बनून १०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना देताहेत पगार
5
"हात जोडले, ५ मिनिटं मागितली, पण..."; बुलडोझर कारवाईनंतर भावाचा मृत्यू, भाजपा नेत्याची व्यथा
6
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
7
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
8
लेकीच्या जन्मानंतर इशिता दत्ताची तब्येत बिघडली, दोन वर्षांचा मुलगाही आजारी; दिली हेल्थ अपडेट
9
नववधूने 'ती' मागणी पूर्ण केली नाही; संतापलेल्या पतीने केलं असं काही की ऐकून येईल राग!
10
आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन
11
"आधी पैसे दे मग बायको घे", EMI न भरल्याने थेट महिलेला उचलून घेऊन गेले बँकवाले, नवरा म्हणतो...
12
Stock Market Today: ट्रम्प टॅरिफ बॉम्बनंतर शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ५३० अंकांनी आपटला; ऑटो-रियल्टीमध्ये विक्री
13
Viral Video : सलाम तुझ्या जिद्दीला! हात नसतानाही तो करतोय बांधकाम; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक
14
भारतावर २५ टक्के टॅरिफ, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय; 'ट्रम्प'नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार?
15
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
16
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
17
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
18
'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड
19
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
20
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश

ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातील कामे संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 17:28 IST

संबंधित सर्वच गावांमध्ये या अभियानांतर्गत कामांची गती मंदावली असून अपेक्षित विकास साध्य झाला नसल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात जिल्ह्यातील सात गावांचा समावेश आहे; मात्र संबंधित सर्वच गावांमध्ये या अभियानांतर्गत कामांची गती मंदावली असून अपेक्षित विकास साध्य झाला नसल्याचे दिसून येत आहे.दर्जेदार शिक्षण, आरोग्याच्या सुविधा, स्वच्छता, कृषी उत्पादनात वाढ करणे, स्वच्छ पाणी, गावात इंटरनेट जोडणी देणे, गावातील सर्वांसाठी पक्की घरे, पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन, गावातील युवकांना कौशल्यपूर्ण बनवून रोजगाराच्या संधी मिळवून देणे आदी उद्देश समोर ठेवून ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाची आखणी करण्यात आलेली आहे. दरम्यान, कारंजा तालुक्यातील वाई, शेवती, वढवी, मांडवा, किनखेडा, लोहारा आणि किसननगर या सात गावांमधील कुटुंबांची संख्या, दरडोई उत्पन्न, शिक्षणाचे प्रमाण, दिव्यांगांची संख्या, गावातील सोई-सुविधा, कृषी, सिंचन क्षेत्रांमधील सुविधा, शाळा, आरोग्य सुविधा आदिंचे सर्वेक्षण करून त्याआधारे ग्रामस्थांच्या मदतीने गाव विकास आराखडा तयार करण्यात आला. त्यानुसार, संबंधित गावांमध्ये शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करून गावातील प्रत्येक शेतकरी या गट अथवा कंपनीसोबत जोडला जाईल, यासाठी प्रयत्न होणे अपेक्षित होते. या गावांमधील ज्या शेतकºयांनी ‘पोकरा’अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज सादर केले आहेत, त्या अर्जांवर तातडीने निर्णय व्हायला हवा होता. सातही गावांमधील पात्र शेतकºयांना पिक कर्जाचा लाभ देण्यासाठी व त्यांचा पिक विमा हप्ता भरून घेण्यासाठी मेळाव्यांचे आयोजन होणे गरजेचे होते. प्रत्यक्षात मात्र या सर्व कामांकडे संबंधित यंत्रणेने दुर्लक्ष केले आहे. परिणामी, ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात सहभागी गावांचा विकास होण्याऐवजी मागासलेपण अद्यापही दुर झाले नसल्याचे बोलले जात आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष पुरविण्याची मागणी होत आहे.  ग्राम सामाजिक परिवर्तनचा मूळ उद्देशग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून शेतमालाचे उत्पन्न दुप्पटीने वाढविणे, पिकांच्या प्रति हेक्टरी उत्पादनात सुधारणा करणे, मागास कुटुंबांना दारिद्रयरेषेवर आणणे, युवकांना कौशल्यविषयक प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करणे, सर्व गावांमध्ये डिजिटल संपर्क यंत्रणा स्थापित करणे, सर्व कुटुंबांना पक्की घरे उपलब्ध करून देणे, गावांमध्ये शुध्द आणि सुरक्षित पाणी पुरवठा करणे, बालमृत्यू दरात घट करणे, सर्व गावांमध्ये आरोग्यविषयक व स्वच्छता दर्जा सुधारणे, आदी उद्देश बाळगण्यात आले आहेत. वाडी रामराव, कवरदरी, पिंपळशेंडा या गावांमधील विकासकामांना प्रशासनाची मंजूरीग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात मालेगाव तालुक्यातील वाडी रामराव, कवरदरी आणि पिंपळशेडा या गावांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, या तीनही गावांमध्ये महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान निधीतून प्रस्तावित करावयाच्या विकासकामांना प्रशासनाकडून मंजूरी देण्यात आली. त्यानुसार, कामे सुरू करून निर्धारित मुदतीपर्यंत पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायत