शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
6
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
7
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
8
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
9
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
10
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
11
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
12
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
13
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
14
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
15
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
16
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
17
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
18
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
19
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
20
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य

ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातील कामे संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 17:28 IST

संबंधित सर्वच गावांमध्ये या अभियानांतर्गत कामांची गती मंदावली असून अपेक्षित विकास साध्य झाला नसल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात जिल्ह्यातील सात गावांचा समावेश आहे; मात्र संबंधित सर्वच गावांमध्ये या अभियानांतर्गत कामांची गती मंदावली असून अपेक्षित विकास साध्य झाला नसल्याचे दिसून येत आहे.दर्जेदार शिक्षण, आरोग्याच्या सुविधा, स्वच्छता, कृषी उत्पादनात वाढ करणे, स्वच्छ पाणी, गावात इंटरनेट जोडणी देणे, गावातील सर्वांसाठी पक्की घरे, पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन, गावातील युवकांना कौशल्यपूर्ण बनवून रोजगाराच्या संधी मिळवून देणे आदी उद्देश समोर ठेवून ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाची आखणी करण्यात आलेली आहे. दरम्यान, कारंजा तालुक्यातील वाई, शेवती, वढवी, मांडवा, किनखेडा, लोहारा आणि किसननगर या सात गावांमधील कुटुंबांची संख्या, दरडोई उत्पन्न, शिक्षणाचे प्रमाण, दिव्यांगांची संख्या, गावातील सोई-सुविधा, कृषी, सिंचन क्षेत्रांमधील सुविधा, शाळा, आरोग्य सुविधा आदिंचे सर्वेक्षण करून त्याआधारे ग्रामस्थांच्या मदतीने गाव विकास आराखडा तयार करण्यात आला. त्यानुसार, संबंधित गावांमध्ये शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करून गावातील प्रत्येक शेतकरी या गट अथवा कंपनीसोबत जोडला जाईल, यासाठी प्रयत्न होणे अपेक्षित होते. या गावांमधील ज्या शेतकºयांनी ‘पोकरा’अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज सादर केले आहेत, त्या अर्जांवर तातडीने निर्णय व्हायला हवा होता. सातही गावांमधील पात्र शेतकºयांना पिक कर्जाचा लाभ देण्यासाठी व त्यांचा पिक विमा हप्ता भरून घेण्यासाठी मेळाव्यांचे आयोजन होणे गरजेचे होते. प्रत्यक्षात मात्र या सर्व कामांकडे संबंधित यंत्रणेने दुर्लक्ष केले आहे. परिणामी, ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात सहभागी गावांचा विकास होण्याऐवजी मागासलेपण अद्यापही दुर झाले नसल्याचे बोलले जात आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष पुरविण्याची मागणी होत आहे.  ग्राम सामाजिक परिवर्तनचा मूळ उद्देशग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून शेतमालाचे उत्पन्न दुप्पटीने वाढविणे, पिकांच्या प्रति हेक्टरी उत्पादनात सुधारणा करणे, मागास कुटुंबांना दारिद्रयरेषेवर आणणे, युवकांना कौशल्यविषयक प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करणे, सर्व गावांमध्ये डिजिटल संपर्क यंत्रणा स्थापित करणे, सर्व कुटुंबांना पक्की घरे उपलब्ध करून देणे, गावांमध्ये शुध्द आणि सुरक्षित पाणी पुरवठा करणे, बालमृत्यू दरात घट करणे, सर्व गावांमध्ये आरोग्यविषयक व स्वच्छता दर्जा सुधारणे, आदी उद्देश बाळगण्यात आले आहेत. वाडी रामराव, कवरदरी, पिंपळशेंडा या गावांमधील विकासकामांना प्रशासनाची मंजूरीग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात मालेगाव तालुक्यातील वाडी रामराव, कवरदरी आणि पिंपळशेडा या गावांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, या तीनही गावांमध्ये महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान निधीतून प्रस्तावित करावयाच्या विकासकामांना प्रशासनाकडून मंजूरी देण्यात आली. त्यानुसार, कामे सुरू करून निर्धारित मुदतीपर्यंत पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायत