शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

गावाच्या विकासासाठी एकजुटीने प्रयत्न करा ! -  शण्मुगराजन एस.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 17:22 IST

Washim News कामे पूर्ण करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी शनिवारी केले.

वाशिम : गावाचा विकास साधायचा असेल तर गावकरी व प्रशासन यांनी एकत्रित येवून प्रयत्न करणे आवश्यक असते. त्यामुळे गावाच्या समृद्धीसाठी कोण-कोणत्या बाबी करणे आवश्यक आहे, याचे काळजीपूर्वक नियोजन करून सदर कामे पूर्ण करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी शनिवारी केले. सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेच्या अनुषंगाने बोरव्हा बु. येथे आयोजित विविध यंत्रणांच्या जिल्हा व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांच्या सभेत ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, सहाय्यक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, मंगरूळपीरचे उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे, पानी फाउंडेशनचे डॉ. अविनाश पोळ, पानी फाउंडेशनचे सुभाष नानवटे यांची उपस्थिती होती.जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले, सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेकडे फक्त स्पर्धा म्हणून न पाहता, गावाच्या विकासासाठी काम करण्याची एक संधी म्हणून पाहावे. या स्पर्धेत किती क्रमांकाचे बक्षीस मिळते, यापेक्षा आपले गाव आणि गावातील नागरिकांचा विकास कसा करता येईल, हे ध्येय समोर ठेवून प्रामाणिक प्रयत्न करा. ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांतून गावामध्ये नक्कीच समृद्धी येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच स्पर्धेच्या अनुषंगाने सर्व प्रशासकीय यंत्रणांनी गावनिहाय नियोजन करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.मुख्य कार्यकारी अधिकारी मोहिते म्हणाले, आतापर्यंत आपण मृद आणि जलसंधारणाच्या कामांमधून पाणी साठविण्यासाठी अनेक कामे केली आहेत. पण आता या पाण्याचा योग्य वापर करून आपले उत्पन्न अशाप्रकारे वाढेल, याचे नियोजन प्रत्येकाने करावे. तसेच रोप लागवड, पूरक व्यवसाय उभारणीसाठी सुद्धा प्रयत्न करावे, असे आवाहन केले.हिंगे म्हणाले, समृद्ध गाव स्पर्धेत रोजगार हमी योजनेतून करावयाची अभिसरणाच्या कामांचे नियोजन संबंधित यंत्रणांनी करावे. त्याबाबतचे प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावे, अशा सूचना केल्या. यावेळी तोटावर, डॉ. पोळ यांच्यासह मान्यवरांनी विचार व्यक्त केले.

टॅग्स :washimवाशिम