शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पाण्यासाठी महिलांची मंगरुळपीर नगरपालिकेवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 16:40 IST

मंगरुळपीर : मंगरुळपीर शहरात भीषण पाणी टंचाईने दिवसेंदिवस शहरातील नागरिक त्रस्त झाले असून, ४ मे रोजी शहरातील शेकडो महिलांनी थेट नगरपरिषद गाठून पिण्याच्या पाण्याची मागणी करीत आपला रोष व्यक्त केला.

ठळक मुद्देशहरात मागील एक महिन्यापासून पाणी टंचाई नागरिकांना भेडसावित आहे. अशातच जिल्हा प्रशासनाची ही उदासिनता शहरातील नागरिकांचा गळा कोरडा करीत आहे. शेकडो महिलांनी थेट नगरपरिषद गाठून पिण्याच्या पाण्याची मागणी करीत आपला रोष व्यक्त केला.

मंगरुळपीर : मंगरुळपीर शहरात भीषण पाणी टंचाईने दिवसेंदिवस शहरातील नागरिक त्रस्त झाले असून शहरातील पाणी टंचाई  संदर्भात जिल्हा प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधींचीही तेवढीच उदासिनता असल्याने शहरवासियांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे. याच्या निषेधार्थ ४ मे रोजी शहरातील शेकडो महिलांनी थेट नगरपरिषद गाठून पिण्याच्या पाण्याची मागणी करीत आपला रोष व्यक्त केला.

मंगरुळपीर शहराला पाणी पुरवठा करणारा मोतसावंगा प्रकल्प पूर्णत: कोरडा पडला . यामुळे मंगरुळपीर शहरातील नगरपरिषदेचा पाणी पुरवठा अनेक दिवसांपासून बंद आहे. अशामध्येच हातपंप व विहिरी सुध्दा कोरडया पडल्यामुळे शहरातील नागरिक पाण्यासाठी चोहीकडे भटकंती करीत आहेत. मंगरुळपीर शहराला शासन स्तरावरुन नागरीक पाण्यासाठी चोहीकडे भटकंती करीत आहे. मंगरुळपीर शहराला शासन स्तरावरुन साडे चार कोटी रुपयांची सोनाळा प्रकल्पावरुन तात्पुरत्या स्वरुपाची पाणी पुरवठा योजना मंजुर झाली होती. आणि ती १५ मे पर्यंत कार्यान्वित करायची होती. परंतु काही अडचणीमुळे वाशिम जिल्हाधिकाºयांनी या योजनेला स्थगिती दिल्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे टँकर करीता प्रस्ताव पाठविला होता, परंतु अजुनपर्यंत वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंगरुळपीर शहरातील टँकरसाठी मंजुरी आदेश दिला नसल्याचे कळते. यावरुनच वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय मंगरुळपीर शहरातील पिण्याच्या पाण्यासंदर्भात किती गंभीर आहे हे दिसून येते. मंगरुळपीर शहराला सोनाळा प्रकल्पातून तात्पुरत्या स्वरुपात पाणी पुरवठा व्हावा याकरिता शासनाकडून साडेचार कोटी रुपयांची योजना मंजुर झाली,मात्र या योजनेला तत्कालीन जिल्हाधिकाºयांनी स्थगिती दिली व ती पुन्हा २७ एप्रिलला उठविली. असे पत्र मंगरुळपीर नगर परिषदेला २ मे रोजी प्राप्त झाले. ज्या योजनेला पूर्ण करण्याकरिता किमान दीड महिन्याचा कालावधी लागतो आता ती योजना अवघ्या १३ दिवसात कशी पूर्ण होई असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरात मागील एक महिन्यापासून पाणी टंचाई नागरिकांना भेडसावित आहे. अशातच जिल्हा प्रशासनाची ही उदासिनता शहरातील नागरिकांचा गळा कोरडा करीत आहे. स्थानिक आमदारांनी याबाबत एक आढावा बैठक घेवून व ३ लाख रुपयांचा निधी देवून आपल्या कानावर हात ठेवले व परत येवून बघितले सुध्दा नाही. असेच चालले तर शहरातील जनतेने काय करावे असा सवाल ही सध्या नागरिक करीत आहेत.

 

आम्ही शहरात पाणी पुरवठा करण्याकरिता प्रशासनाकडे पाणी टँकरसाठी प्रस्ताव पाठविला आहे. तो मंजुर होताचक्षणी शहरात टँकरने ताबडतोब पाणी पुरवठा केला जाईल. तसेच सोनाळा प्रकल्पावरुन तात्पुरती पाणी पुरवठा योजनेला आम्ही शासनाकडे मुदत वाढीची मागणी केली आहे.- डॉ. मेघना वासनकर, मुख्याधिकारी, नगरपरिषद मंगरुळपीर

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीरWaterपाणी