शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी महिलांची मंगरुळपीर नगरपालिकेवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 16:40 IST

मंगरुळपीर : मंगरुळपीर शहरात भीषण पाणी टंचाईने दिवसेंदिवस शहरातील नागरिक त्रस्त झाले असून, ४ मे रोजी शहरातील शेकडो महिलांनी थेट नगरपरिषद गाठून पिण्याच्या पाण्याची मागणी करीत आपला रोष व्यक्त केला.

ठळक मुद्देशहरात मागील एक महिन्यापासून पाणी टंचाई नागरिकांना भेडसावित आहे. अशातच जिल्हा प्रशासनाची ही उदासिनता शहरातील नागरिकांचा गळा कोरडा करीत आहे. शेकडो महिलांनी थेट नगरपरिषद गाठून पिण्याच्या पाण्याची मागणी करीत आपला रोष व्यक्त केला.

मंगरुळपीर : मंगरुळपीर शहरात भीषण पाणी टंचाईने दिवसेंदिवस शहरातील नागरिक त्रस्त झाले असून शहरातील पाणी टंचाई  संदर्भात जिल्हा प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधींचीही तेवढीच उदासिनता असल्याने शहरवासियांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे. याच्या निषेधार्थ ४ मे रोजी शहरातील शेकडो महिलांनी थेट नगरपरिषद गाठून पिण्याच्या पाण्याची मागणी करीत आपला रोष व्यक्त केला.

मंगरुळपीर शहराला पाणी पुरवठा करणारा मोतसावंगा प्रकल्प पूर्णत: कोरडा पडला . यामुळे मंगरुळपीर शहरातील नगरपरिषदेचा पाणी पुरवठा अनेक दिवसांपासून बंद आहे. अशामध्येच हातपंप व विहिरी सुध्दा कोरडया पडल्यामुळे शहरातील नागरिक पाण्यासाठी चोहीकडे भटकंती करीत आहेत. मंगरुळपीर शहराला शासन स्तरावरुन नागरीक पाण्यासाठी चोहीकडे भटकंती करीत आहे. मंगरुळपीर शहराला शासन स्तरावरुन साडे चार कोटी रुपयांची सोनाळा प्रकल्पावरुन तात्पुरत्या स्वरुपाची पाणी पुरवठा योजना मंजुर झाली होती. आणि ती १५ मे पर्यंत कार्यान्वित करायची होती. परंतु काही अडचणीमुळे वाशिम जिल्हाधिकाºयांनी या योजनेला स्थगिती दिल्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे टँकर करीता प्रस्ताव पाठविला होता, परंतु अजुनपर्यंत वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंगरुळपीर शहरातील टँकरसाठी मंजुरी आदेश दिला नसल्याचे कळते. यावरुनच वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय मंगरुळपीर शहरातील पिण्याच्या पाण्यासंदर्भात किती गंभीर आहे हे दिसून येते. मंगरुळपीर शहराला सोनाळा प्रकल्पातून तात्पुरत्या स्वरुपात पाणी पुरवठा व्हावा याकरिता शासनाकडून साडेचार कोटी रुपयांची योजना मंजुर झाली,मात्र या योजनेला तत्कालीन जिल्हाधिकाºयांनी स्थगिती दिली व ती पुन्हा २७ एप्रिलला उठविली. असे पत्र मंगरुळपीर नगर परिषदेला २ मे रोजी प्राप्त झाले. ज्या योजनेला पूर्ण करण्याकरिता किमान दीड महिन्याचा कालावधी लागतो आता ती योजना अवघ्या १३ दिवसात कशी पूर्ण होई असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरात मागील एक महिन्यापासून पाणी टंचाई नागरिकांना भेडसावित आहे. अशातच जिल्हा प्रशासनाची ही उदासिनता शहरातील नागरिकांचा गळा कोरडा करीत आहे. स्थानिक आमदारांनी याबाबत एक आढावा बैठक घेवून व ३ लाख रुपयांचा निधी देवून आपल्या कानावर हात ठेवले व परत येवून बघितले सुध्दा नाही. असेच चालले तर शहरातील जनतेने काय करावे असा सवाल ही सध्या नागरिक करीत आहेत.

 

आम्ही शहरात पाणी पुरवठा करण्याकरिता प्रशासनाकडे पाणी टँकरसाठी प्रस्ताव पाठविला आहे. तो मंजुर होताचक्षणी शहरात टँकरने ताबडतोब पाणी पुरवठा केला जाईल. तसेच सोनाळा प्रकल्पावरुन तात्पुरती पाणी पुरवठा योजनेला आम्ही शासनाकडे मुदत वाढीची मागणी केली आहे.- डॉ. मेघना वासनकर, मुख्याधिकारी, नगरपरिषद मंगरुळपीर

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीरWaterपाणी