शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

वीज जोडणी अभावी वाशिम जिल्ह्यातील बॅरेजेसची उपयोगिता शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 15:34 IST

वाशिम : जिल्ह्यातून वाहणाऱ्या  पैनगंगा नदीवर ११ ठिकाणी उभारण्यात आलेल्या बॅरेजसमधून पाणी उपसा करण्यासाठी कृषिपंपांना वीज जोडणीसाठी सुमारे ९५ कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे. मात्र, यासंदर्भातील प्रस्तावास अद्याप मंजुरात मिळालेली नाही.

ठळक मुद्देजिल्ह्यातून वाहणाऱ्या  पैनगंगा नदीवर ११ ठिकाणी ७०० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्चून बॅरेजेसची कामे पूर्ण केली.पाणी उपसा करण्यासाठी कृषिपंपांना वीज जोडणीसाठी सुमारे ९५ कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे. त्यास मंजुरातही मिळाली; परंतू निधी न मिळाल्याने पुढची कुठलीच प्रक्रिया होऊ शकली नाही. 

वाशिम : जिल्ह्यातून वाहणाऱ्या  पैनगंगा नदीवर ११ ठिकाणी उभारण्यात आलेल्या बॅरेजसमधून पाणी उपसा करण्यासाठी कृषिपंपांना वीज जोडणीसाठी सुमारे ९५ कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे. मात्र, यासंदर्भातील प्रस्तावास अद्याप मंजुरात मिळालेली नाही. त्यामुळे बॅरेजेसमध्ये पाणी असूनही त्याचा उपयोग घेणे अशक्य ठरत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.जिल्ह्यातील सिंचनाचा वाढलेला अनुशेष दुर करण्यासाठी विदर्भ सिंचन विकास महामंडळाने पैनगंगा नदीवरील वरुड, जुमडा, कोकलगांव, अडगांव, गणेशपूर, राजगांव, उकळीपेन, सोनगव्हाण, टनका, ढिल्ली आणि जयपूर अशा ११ ठिकाणी ७०० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्चून बॅरेजेसची कामे पूर्ण केली. यामुळे पैनगंगेतून कधीकाळी वाहून जाणारे पाणी अडविणे शक्य झाले असून वाशिम आणि नजिकच्या हिंगोली जिल्ह्यातील हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. मात्र, त्यासाठी विजेसंदर्भातील कामे देखील प्राधान्याने पूर्ण करणे क्रमप्राप्त असून यासंदर्भात महावितरणने ९५ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केलेला आहे. त्यास मंजुरातही मिळाली; परंतू निधी न मिळाल्याने पुढची कुठलीच प्रक्रिया होऊ शकली नाही. 

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरण