शहरं
Join us  
Trending Stories
1
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
2
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
3
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
4
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
5
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
6
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
7
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
8
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
9
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
10
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
11
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
12
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
13
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
14
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
15
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
16
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
17
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
18
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
19
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
20
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

हिंस्त्र वन्यप्राण्यांचा लोकवस्तीलगत संचार वाढतोय! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2019 13:59 IST

गेल्या काही महिन्यांपासून हिंस्त्र वन्यप्राण्यांचा लोकवस्तीलगत संचार वाढला आहे. अनेक ठिकाणी माणसांवर या हिंस्त्रप्राण्यांनी हल्लेही केले आहेत. त्यातून मानव-वन्यप्राणी संघर्ष निर्माण होत असल्याचे दिसत आहे. 

ठळक मुद्देगेल्या काही महिन्यांपासून हिंस्त्र वन्यप्राण्यांचा लोकवस्तीलगत संचार वाढला आहे. अनेक ठिकाणी माणसांवर या हिंस्त्रप्राण्यांनी हल्लेही केले आहेत. जिल्ह्यातील सहाही तालुक्यात प्रादेशिक वनविभागांतर्गत ३२० चौरस किलोमीटर क्षेत्रात प्रादेशिक वन विखुरले आहे.

वाशिम-  गेल्या काही महिन्यांपासून हिंस्त्र वन्यप्राण्यांचा लोकवस्तीलगत संचार वाढला आहे. अनेक ठिकाणी माणसांवर या हिंस्त्रप्राण्यांनी हल्लेही केले आहेत. त्यातून मानव-वन्यप्राणी संघर्ष निर्माण होत असल्याचे दिसत आहे. 

जिल्ह्यातील सहाही तालुक्यात प्रादेशिक वनविभागांतर्गत ३२० चौरस किलोमीटर क्षेत्रात प्रादेशिक वन विखुरले आहे. यात १८.३२१ चौरस किलोमीटर क्षेत्रावरा सोहळ काळविट अभयारण्याचे क्षेत्र संरक्षित आहे. वनविभागाच्यावतीने गत बुद्धपौर्णिमेच्या दिवशी पशूगणना कार्यक्रम राबविण्यात आला. या पशूगणनेनुसार वाशिमच्या प्रादेशिक वनपरिक्षेत्रातील वन्यप्राण्यांची संख्या अद्याप जाहीर झाली नाही. तथापि, जिल्ह्यातील वनपरिक्षेत्रात हरीण, नीलगाय, ससा, या प्राण्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यातच बिबट, अस्वल या प्राण्यांचेही अस्तित्व आढळून आले आहे. जिल्ह्यात अनेक जातींचे हजारो पक्षी आणि सरपटणाºया जिवांची संख्याही लक्षणीय आहे; परंतु या प्राणी पक्ष्यांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी वनविभागाकडून म्हणावे तसे प्रयत्न होताना दिसत नाही. जिल्ह्यातील जंगलाचे प्रमाण दिवसेंदिवस घटत असतानाच जलसाठ्यांची सोयही केली जात नसल्याने वन्यप्राणी चारापाण्याच्या शोधात अधिवासाबाहेर येत आहेत. जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांत मंगरुळपीर, कारंजा, मालेगाव या तीन तालुक्यांत मिळून १५ पेक्षा अधिक वेळा बिबट्याचे दर्शन शेतकरी, शेतमजुरांना घडले असून, यात ५ ते ६ घटनांत बिबट्याने माणसांवर हल्ले केल्याच्या घटनाही घडल्यात. त्याशिवाय या वन्यप्राण्यांनी पाळीवपशूंची शिकार केल्याच्या घटनाही घडल्या, या घटना मानव-वन्यजीव संघर्षाला जन्म देणाºया ठरल्या आहेत. असे असतानाही वनविभागाकडून आवश्यक उपाय योजना होत नसल्याचे दिसत आहे.पाळीव पशू, मानवांवरील हल्ले चिंताजनक

जिल्ह्यात डिसेंबरच्या अखेर आणि जानेवारीच्या सुरुवातीला मंगरुळपीर तालुक्यात दाभा, वाढा आदिंसह अगदी मंगरुळपीर शहरलगत बिबट्याचे दर्शन लोकांना घडले. यात दोन घटनांत बिबट्याने माणसांवर हल्ला केल्याचे प्रकारही घडले. मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा परिसरात, तर वन्यप्राण्यांचे पाळीव पशू आणि मानवावर हल्ले करण्याच्या घटना वाढतच आहेत. बुधवार १० जानेवारी रोजी पुन्हा किन्हीराजा परिसरात बिबट्याने गाय ठार केल्याची घटना घडली, तर नोव्हेंबर महिन्यात कारंजा तालुक्यातही अशा घटना घडल्या. यातूनच मानव-वन्यजीव संघर्ष वाढीस लागत आहे.

टॅग्स :washimवाशिमTigerवाघ