शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

हिंस्त्र वन्यप्राण्यांचा लोकवस्तीलगत संचार वाढतोय! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2019 13:59 IST

गेल्या काही महिन्यांपासून हिंस्त्र वन्यप्राण्यांचा लोकवस्तीलगत संचार वाढला आहे. अनेक ठिकाणी माणसांवर या हिंस्त्रप्राण्यांनी हल्लेही केले आहेत. त्यातून मानव-वन्यप्राणी संघर्ष निर्माण होत असल्याचे दिसत आहे. 

ठळक मुद्देगेल्या काही महिन्यांपासून हिंस्त्र वन्यप्राण्यांचा लोकवस्तीलगत संचार वाढला आहे. अनेक ठिकाणी माणसांवर या हिंस्त्रप्राण्यांनी हल्लेही केले आहेत. जिल्ह्यातील सहाही तालुक्यात प्रादेशिक वनविभागांतर्गत ३२० चौरस किलोमीटर क्षेत्रात प्रादेशिक वन विखुरले आहे.

वाशिम-  गेल्या काही महिन्यांपासून हिंस्त्र वन्यप्राण्यांचा लोकवस्तीलगत संचार वाढला आहे. अनेक ठिकाणी माणसांवर या हिंस्त्रप्राण्यांनी हल्लेही केले आहेत. त्यातून मानव-वन्यप्राणी संघर्ष निर्माण होत असल्याचे दिसत आहे. 

जिल्ह्यातील सहाही तालुक्यात प्रादेशिक वनविभागांतर्गत ३२० चौरस किलोमीटर क्षेत्रात प्रादेशिक वन विखुरले आहे. यात १८.३२१ चौरस किलोमीटर क्षेत्रावरा सोहळ काळविट अभयारण्याचे क्षेत्र संरक्षित आहे. वनविभागाच्यावतीने गत बुद्धपौर्णिमेच्या दिवशी पशूगणना कार्यक्रम राबविण्यात आला. या पशूगणनेनुसार वाशिमच्या प्रादेशिक वनपरिक्षेत्रातील वन्यप्राण्यांची संख्या अद्याप जाहीर झाली नाही. तथापि, जिल्ह्यातील वनपरिक्षेत्रात हरीण, नीलगाय, ससा, या प्राण्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यातच बिबट, अस्वल या प्राण्यांचेही अस्तित्व आढळून आले आहे. जिल्ह्यात अनेक जातींचे हजारो पक्षी आणि सरपटणाºया जिवांची संख्याही लक्षणीय आहे; परंतु या प्राणी पक्ष्यांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी वनविभागाकडून म्हणावे तसे प्रयत्न होताना दिसत नाही. जिल्ह्यातील जंगलाचे प्रमाण दिवसेंदिवस घटत असतानाच जलसाठ्यांची सोयही केली जात नसल्याने वन्यप्राणी चारापाण्याच्या शोधात अधिवासाबाहेर येत आहेत. जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांत मंगरुळपीर, कारंजा, मालेगाव या तीन तालुक्यांत मिळून १५ पेक्षा अधिक वेळा बिबट्याचे दर्शन शेतकरी, शेतमजुरांना घडले असून, यात ५ ते ६ घटनांत बिबट्याने माणसांवर हल्ले केल्याच्या घटनाही घडल्यात. त्याशिवाय या वन्यप्राण्यांनी पाळीवपशूंची शिकार केल्याच्या घटनाही घडल्या, या घटना मानव-वन्यजीव संघर्षाला जन्म देणाºया ठरल्या आहेत. असे असतानाही वनविभागाकडून आवश्यक उपाय योजना होत नसल्याचे दिसत आहे.पाळीव पशू, मानवांवरील हल्ले चिंताजनक

जिल्ह्यात डिसेंबरच्या अखेर आणि जानेवारीच्या सुरुवातीला मंगरुळपीर तालुक्यात दाभा, वाढा आदिंसह अगदी मंगरुळपीर शहरलगत बिबट्याचे दर्शन लोकांना घडले. यात दोन घटनांत बिबट्याने माणसांवर हल्ला केल्याचे प्रकारही घडले. मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा परिसरात, तर वन्यप्राण्यांचे पाळीव पशू आणि मानवावर हल्ले करण्याच्या घटना वाढतच आहेत. बुधवार १० जानेवारी रोजी पुन्हा किन्हीराजा परिसरात बिबट्याने गाय ठार केल्याची घटना घडली, तर नोव्हेंबर महिन्यात कारंजा तालुक्यातही अशा घटना घडल्या. यातूनच मानव-वन्यजीव संघर्ष वाढीस लागत आहे.

टॅग्स :washimवाशिमTigerवाघ