शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

कोवळ्या पिकांवर वन्यप्राण्यांचा ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 15:42 IST

वाशिम: जिल्ह्यात रब्बी हंगामाची पेरणी ४० टक्क्यांहून अधिक उरकली असून, उगवलेल्या हरभरा आणि गहू पिकांवर माकडे, हरीण हे वन्यप्राणी ताव मारत असल्याने शेतकºयांचे अतोनात नुकसान होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात रब्बी हंगामाची पेरणी ४० टक्क्यांहून अधिक उरकली असून, उगवलेल्या हरभरा आणि गहू पिकांवर माकडे, हरीण हे वन्यप्राणी ताव मारत असल्याने शेतकºयांचे अतोनात नुकसान होत आहे. या पीक नुकसानासाठी वनविभागाने आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.जिल्ह्यात ९२ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी नियोजित करण्यात आली असून, सद्यस्थितीत ३५ हजार हेक्टर क्षेत्रावर पिकांची पेरणीही झाली आहे. गहू आणि हरभरा पिक वितभर वाढले असताना या कोवळ्या पिकांवर माकडे आणि हरणांचे कळप ताव मारू न शेतकºयांचे नुकसान करीत आहेत. भारनियमनाने त्रस्त असलेला शेतकीर रात्ररात्र जागून पाणी देत पिकांना वाढविण्यासाठी प्रयत्न करीत असताना वन्यप्राणी सकाळ आणि सायंकाळच्या सुमारास कळपाने या पिकांवर ताव मारताना दिसत आहे. त्यामुळे शेतकरी वैतागले असून, उभ्या पिकांचे नुकसान होत असतानाही त्यांना ती वाचविणेही कठीण झाले आहे. या पीक नुकसानाची पाहणी करू शेतकºयांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. अडीच एकरातील गहू, हरभरा फस्तवाशिम तालुक्यात दगड उमरा परिसरात रब्बीची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली असून, ही पिके आता बहरत असताना वन्यप्राण्यांनी पिकांत धुमाकूळ घातला आहे. शिवारातील एका शेतकºयाने अडिच एकरात पेरलेला हरभरा आणि गहु पिक माकडे आणि हरणांच्या कळपाने पूर्ण फस्त केले आहे. या नुकसानाची वनविभागाने पाहणी करून नूकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकºयाने केली आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी