शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

दहा रुपयांमध्ये चप्पल मिळते का हो?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:30 IST

शासनस्तरावरून कोतवालांना पूर्वी गणवेश भत्ता, बेल्ट, बिल्ला, धुलाई भत्ता दिला जायचा; पण आता वर्षाकाठी केवळ १० रुपये चप्पल भत्ता ...

शासनस्तरावरून कोतवालांना पूर्वी गणवेश भत्ता, बेल्ट, बिल्ला, धुलाई भत्ता दिला जायचा; पण आता वर्षाकाठी केवळ १० रुपये चप्पल भत्ता मिळतो. इतर सर्व भत्ते बंद झाले आहेत. महिन्याला कोतवालांच्या हातात पाच हजार रुपये मानधन ठेवले जाते. त्यात भागत नाही. त्यामुळे शासनाने कुठलाच भत्ता नाही दिला तरी चालेल; पण माणूस म्हणून जगण्यासाठी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी कोतवालांमधून होत आहे.

..............

२०११ पासून पदोन्नती नाही

राज्यात १ डिसेंबर १९५९ पासून पगारी कोतवाल ही पद्धत अंमलात आली. तत्पूर्वी राज्य शासनाने ७ मे १९५९ रोजी सेवा प्रवेश नियम जाहीर केले. मात्र त्यात कोतवालांना सामावून घेतले नाही. पगारी कोतवाल अशी पद्धत सुरू झाली तरी कोतवालांची ६२ वर्षे तुटपुंज्या मानधनावरच बोळवण केली जात आहे. २०११ पासून कोतवालांना पदोन्नतीही मिळालेली नाही.

.............

कामांची यादी भली मोठी

कोतवाल हा गावातील तलाठ्यांची सांगितलेली सर्व कामे करतो. यासह गाव परिसरातून वाहतूक केल्या जाणाऱ्या गाैणखनिजावरही कोतवालांना देखरेख ठेवावी लागते.

गावातील शासकीय दप्तराची ने-आण करणे, गावात दवंडी देऊन सरकारी सूचना देणे, आवश्यक तेव्हा गावकऱ्यांना चावडी व सज्जा येथे बोलावणे, गावातील चावडी व सज्जा कार्यालयाची स्वच्छता ठेवणे, जन्म-मृत्यू आणि विवाहाच्या नोंदी घेऊन ग्रामसेवकाला देणे आदी स्वरूपातील कामे कोतवालांना करावी लागतात.

................

अपुऱ्या मानधनात कसे भागणार?

सर्वच जीवनावश्यक वस्तूंची महागाई दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. असे असताना कोतवालांच्या मानधनात कित्येक वर्षांपासून वाढ झालेली नाही. तुटपुंज्या मानधनावर घरखर्च भागत नाही. मुलांच्या शिक्षणासाठी पैशांची तजविज करताना नाकीनऊ येतात. अपुऱ्या मानधनात कसे भागणार?

- आत्माराम शिंदे

............

गावगाड्यातील सर्वच प्रशासकीय कामे कोतवालांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहेत. त्या तुलनेत त्यांना दिले जाणारे मानधन अगदीच तुटपुंज्या स्वरूपातील आहे. चप्पल भत्त्यापोटी केवळ १० रुपये पदरात टाकून शासनाने या घटकाची थट्टा चालविली आहे. हा प्रकार कुठेतरी थांबून कोतवालांच्या समस्यांकडे शासनाने लक्ष पुरवावे, अशी अपेक्षा आहे.

- प्रदीप इढोळे

......................

कोतवालांसंबंधी शासन स्तरावरून वेळोवेळी जे निर्णय घेतले जातात, त्याची प्रशासकीय पातळीवरून चोख अंमलबजावणी केली जाते. १० रुपये चप्पल भत्ता, हा देखील शासनाकडूनच घेण्यात आलेला निर्णय आहे. कोतवालांना मिळणारे मानधन निश्चितपणे कमी असून त्यात वाढ होणे आवश्यक आहे.

- शैलेश हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम