शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
2
Short Term Investment: केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
3
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
4
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
5
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
6
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
7
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
8
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
9
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
10
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
11
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
12
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
13
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
14
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
15
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
16
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
17
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
18
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
19
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
20
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात सततधार पावसामुळे ओल्या दुष्काळाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 12:40 IST

शेतात पाणी साचून पिके पुन्हा पिवळी पडू लागली असल्याने जिल्ह्यावर ओल्या दुष्काळाचे सावट ओढवल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात आॅगस्ट महिन्याच्या उत्तरार्धापासून सतत पावसाची रिपरिप सुरू आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात उसंत घेतल्यानंतर पुन्हा सतत पाऊस पडत आहे. त्यात गेल्या पाच दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात ठाणच मांडले आहे. त्यामुळे शेतात पाणी साचून पिके पुन्हा पिवळी पडू लागली असल्याने जिल्ह्यावर ओल्या दुष्काळाचे सावट ओढवल्याचे चित्र आहे.वाशिम जिल्ह्यात आॅगस्ट महिन्यात १० तारखेनंतर जिल्ह्यात १५ ते २० दिवस पावसाने ठाण मांडले. त्यामुळे काढणीवर आलेल्या उडिद, मुग पिकासह सोयाबीनच्या पिकाला मोठा फटका बसला. अनेक शेतात पाणी साचून उडिद, मुगाच्या शेंगा कुजल्या, सोयाबीन पिवळे पडल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसा झाले. या पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे निर्देशही २५ आॅगस्ट रोजीच शासनाने दिले असून, अद्यापही पंचनामे पूर्ण होऊ शकले नाहीत.आॅगस्टमधील सततच्या पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीस पावसाने तीन चार दिवस पावसाने उसंत घेतली. त्यामुळे शेतकऱ्यांनी उडिद, मुगाच्या काढणीला वेग दिला; परंतु पुन्हा पावसाने जिल्ह्यात ठाण मांडले.गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्याने शेतात पाणी साचत आहे. यामुळे आता सोयाबीनसह तूर, कपाशी आणि ज्वारीचे पीकही संकटात सापडले असून, जिल्ह्यात ओला दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे.

पावसाने वार्षिक सरासरी ओलांडलीवाशिम जिल्ह्यात वार्षिक सरासरी ७७५.७० मि. मी. पाऊस अपेक्षीत असतो. गतवर्षी १ जून ते ९ सप्टेंबरपर्यंतच्या कालावधित ५४३.६० मि.मी. अर्थात वार्षिक सरासरीच्या ७७.८० टक्केच पाऊस पडला होता. यंदा मात्र पावसाने आॅगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंतच वार्षिक सरासरी ओलांडली आहे. प्रत्यक्षात जिल्ह्यात जून ते ९ सप्टेंबरपर्यंत एकूण ८०८.३० मि.मी. पाऊस पडला. हे प्रमाण सरासरीच्या ११५ टक्के आहे. अद्यापही जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. त्यात ९ सप्टेंबर ते १० सप्टेंबरच्या सकाळी ७ वाजेपर्यंत २४ तासांच्या कालावधित २३.१० मि.मी. पावसाची नोंद झाली. अद्यापही पावसाळा संपण्यास किमान २० दिवसांचा कालावधी उरला आहे. या काळातही पावसाची रिपरिप कायम राहिल्यास यंदाचा खरीप हंगामच शेतकºयांच्या हातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

टॅग्स :washimवाशिमRainपाऊस