शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

वाशिम जिल्ह्यात सततधार पावसामुळे ओल्या दुष्काळाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 12:40 IST

शेतात पाणी साचून पिके पुन्हा पिवळी पडू लागली असल्याने जिल्ह्यावर ओल्या दुष्काळाचे सावट ओढवल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात आॅगस्ट महिन्याच्या उत्तरार्धापासून सतत पावसाची रिपरिप सुरू आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात उसंत घेतल्यानंतर पुन्हा सतत पाऊस पडत आहे. त्यात गेल्या पाच दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात ठाणच मांडले आहे. त्यामुळे शेतात पाणी साचून पिके पुन्हा पिवळी पडू लागली असल्याने जिल्ह्यावर ओल्या दुष्काळाचे सावट ओढवल्याचे चित्र आहे.वाशिम जिल्ह्यात आॅगस्ट महिन्यात १० तारखेनंतर जिल्ह्यात १५ ते २० दिवस पावसाने ठाण मांडले. त्यामुळे काढणीवर आलेल्या उडिद, मुग पिकासह सोयाबीनच्या पिकाला मोठा फटका बसला. अनेक शेतात पाणी साचून उडिद, मुगाच्या शेंगा कुजल्या, सोयाबीन पिवळे पडल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसा झाले. या पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे निर्देशही २५ आॅगस्ट रोजीच शासनाने दिले असून, अद्यापही पंचनामे पूर्ण होऊ शकले नाहीत.आॅगस्टमधील सततच्या पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीस पावसाने तीन चार दिवस पावसाने उसंत घेतली. त्यामुळे शेतकऱ्यांनी उडिद, मुगाच्या काढणीला वेग दिला; परंतु पुन्हा पावसाने जिल्ह्यात ठाण मांडले.गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्याने शेतात पाणी साचत आहे. यामुळे आता सोयाबीनसह तूर, कपाशी आणि ज्वारीचे पीकही संकटात सापडले असून, जिल्ह्यात ओला दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे.

पावसाने वार्षिक सरासरी ओलांडलीवाशिम जिल्ह्यात वार्षिक सरासरी ७७५.७० मि. मी. पाऊस अपेक्षीत असतो. गतवर्षी १ जून ते ९ सप्टेंबरपर्यंतच्या कालावधित ५४३.६० मि.मी. अर्थात वार्षिक सरासरीच्या ७७.८० टक्केच पाऊस पडला होता. यंदा मात्र पावसाने आॅगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंतच वार्षिक सरासरी ओलांडली आहे. प्रत्यक्षात जिल्ह्यात जून ते ९ सप्टेंबरपर्यंत एकूण ८०८.३० मि.मी. पाऊस पडला. हे प्रमाण सरासरीच्या ११५ टक्के आहे. अद्यापही जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. त्यात ९ सप्टेंबर ते १० सप्टेंबरच्या सकाळी ७ वाजेपर्यंत २४ तासांच्या कालावधित २३.१० मि.मी. पावसाची नोंद झाली. अद्यापही पावसाळा संपण्यास किमान २० दिवसांचा कालावधी उरला आहे. या काळातही पावसाची रिपरिप कायम राहिल्यास यंदाचा खरीप हंगामच शेतकºयांच्या हातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

टॅग्स :washimवाशिमRainपाऊस