शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

विपरीत हवामानाचा तूर पिकाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 14:45 IST

फुले गळण्यासह किडींचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

-लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: गत पाच दिवसांपासून पश्चिम वºहाडात दिवसा उन्हाचा कडाका, तर रात्री थंडी वाढत आहे. या विपरीत वातावरणामुळे तुरीचे पीक संकटात सापडले आहे. या वातावरणात फुले गळण्यासह किडींचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना विविध नैसर्गिक संकटांनी बेजार केले आहे. मान्सून विलंबाने दाखल झाल्याने पेरणीला उशीर झाला, तर पावसाने खंड दिल्याने पिके संकटात सापडून अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. आॅगस्ट आणि सप्टेंबरच्या पावसाने पिकांना तारले. उडीद, मूग काढणीवर असताना आलेल्या पावसामुळे या पिकांचे नुकसान झाले. त्यानंतर शेतकरी उसंत घेत नाही तोच, सोयाबीनची काढणी अंतिम टप्प्यात असताना अवकाळी पावसाने तांडव घालत शेतातील उभ्या सोयाबीनसह काढून ठेवलेल्या सोयाबीनचा सत्यानाश केला. या संकटातून शेतकरी सावरण्याचा प्रयत्न करीत असून, त्यांच्या आशा आता खरिपातील दीर्घकालीन पीक असलेल्या तुरीवर लागल्या आहेत. हे पीक शेंगा, फुलांवर असताना वातावरणातील बदल या पिकासाठी घातक ठरत आहे. दिवसा उन्हाचा कडाका आणि रात्री पडणारी थंडी या पिकासाठी घातक ठरत आहे. प्रामुख्याने पश्चिम वºहाडातील हे वातावरण या पिकासाठी अधिकच धोकादायक ठरत आहे. या भागात सोयाबीननंतर सर्वाधिक क्षेत्र हे तुरीच्या पिकाचेच आहे. त्यामुळे या पिकावर शेतकºयांचे लक्ष लागले आहे. या वातावरणामुळे तुरीवर शेंगा पोखरणारी हिरवी अळी, पाने, फुले गुंडाळणारी अळी, बड विव्हिल, पिसारी पतंग, फुलकिडे, मावा आदी किडींचा प्रादुर्भाव होत आहे. या किडीवर नियंत्रणासाठी कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात कीटकनाशकाची आणि बुरशीनाशकाची फवारणी करणे, हाच पर्याय असल्याचे कृषी शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. सध्याच्या वातावरणामुळे तुरीवर शेंगमाशी, शेंगा पोखरणारी अळी, पिसारी पतंग, बड विव्हिल आदी किडींचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कीटकनाशक आणि बुरशीनाशकांची फवारणी कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार करावी.-भरत गीते,कृषी शास्त्रज्ञपं.दे.कृ.वि., अकोला.

 

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती