शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
2
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
3
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
4
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
5
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
6
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
7
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
8
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
9
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
10
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
11
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
12
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
13
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
14
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
15
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
16
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
17
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
18
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
19
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
20
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!

हवामान खात्याचा अंदाज पुन्हा चुकला; गाढवाचा धोका, कोल्हा तारणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:28 IST

मान्सूनचे आगमन होऊन बरेच दिवस झाले; परंतु जिल्ह्यात १० जूनचा अपवाद वगळता पुढे सार्वत्रिक स्वरूपातील पाऊस झाला नाही. रोहिणी ...

मान्सूनचे आगमन होऊन बरेच दिवस झाले; परंतु जिल्ह्यात १० जूनचा अपवाद वगळता पुढे सार्वत्रिक स्वरूपातील पाऊस झाला नाही. रोहिणी पाठोपाठ मृग नक्षत्रही कोरडेच गेले. त्यातच पाऊस आठ ते दहा दिवस लांबल्याचे चित्र आहे. दिवसा कडक ऊन्ह, तर रात्री आकाशात टपोरे चांदणे दिसत आहे. दिवसभरात काहीवेळ पावसाचे वातावरण तयार होते; मात्र पावसाचा थांगपत्ता नाही.

मृग नक्षत्रात जिल्ह्यात पावसाची संततधार अपेक्षित होती; पण पडणारा पाऊसही सार्वत्रिक नाही. त्यामुळे ज्या भागात पाऊस झाला, तेथील शेतकरी सुखावतो तर बाकीच्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. जिल्ह्यात ५० टक्के क्षेत्रावर यंदा खरिपाचा पेरा झाला आहे. पावसाने पाठ फिरविल्याने पेरणी केलेले शेतकरी चिंताग्रस्त असून उर्वरित शेतकरी अनुकूल परिस्थितीच्या प्रतीक्षेत आहेत.

.................

पावसाची स्थिती (मि.मी.)

१०३

अपेक्षित पाऊस

................

१६४.८

आतापर्यंत झालेला पाऊस

...................

मंगरूळपीर तालुका

९६ मि.मी.

सर्वात कमी पाऊस

...............

वाशिम तालुका

१४३ मि.मी.

सर्वात जास्त पाऊस

..............

कोठे किती पेरणी (हेक्टरमध्ये)

४,०६,२३४

अपेक्षित पेरणी क्षेत्र

...........

२,१९,१८७

आतापर्यंत झालेली पेरणी

..............

तालुकानिहाय पेरणी व झालेला पाऊस

वाशिम -

रिसोड -

मालेगाव -

मंगरूळपीर -

मानोरा -

कारंजा -

...........................

पेरणी (हेक्टरमध्ये)

वाशिम - ३७३८५

रिसोड - ४९२१६

मालेगाव - २८९३३

मंगरूळपीर - ४०४७३

मानोरा - २४५४६

कारंजा - ३८६३२

...........................

पीकनिहाय क्षेत्र

कापूस - १९२४५, १२२८२

तूर - ५४५०९, ३२६७९

मूग - ८२७२, १८२९

उडीद - १०१७९, ३८८

सोयाबीन - ३००४१७, १६८८२६

................

...तर खते-बियाणे कशी मिळणार?

यंदा चांगला पाऊस होणार, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता; मात्र झाले विपरितच. पाऊस नसल्याने पिके सुकत असून दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.

- ज्ञानेश्वर इढोळे, शेतकरी

..................

आर्थिक अडचणीत असतानाही पेरणीसाठी बियाणे, रासायनिक औषध, खताची जुळवाजुळव केली. आता पावसाने दडी मारली. दुबार पेरणी करावी लागल्यास खत, बियाणे कशी मिळणार?

- गंगाधर पांढरे, शेतकरी

....................

यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीला बियाण्यांचे दर वाढलेले होते. ते नंतर कमी झाले. त्यामुळे दिलासा मिळाला; मात्र पेरणी उलटल्यास पुन्हा होणारा खर्च आवाक्याबाहेर जाणार आहे.

- दिलीप मुठाळ, शेतकरी