शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange; सोमवारपासून पाणीही पिणार नाही, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, मागण्यांवर ठाम!
2
आजचे राशीभविष्य, ०१ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, वादग्रस्त विषय आज टाळावेत
3
Maratha Reservation: आरक्षणामध्ये अडसर न्यायालयीन निकालांचा, समितीच्या सल्लामसलतीत बाब समोर
4
Maratha Reservation: मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळणे अशक्य? चंद्रकांत पाटील म्हणाले...
5
Maratha Reservation: सर्वपक्षीय बैठक, अधिवेशन बोलावून २४ तासांत निर्णय घ्या- सुप्रिया सुळे
6
Maratha Reservation: मराठा आरक्षण लढ्याला पाठिंबा देण्यासाठी सायकलवरून मुंबई गाठली!
7
कुणबी नोंदीचे पुरावे शिंदे समितीला देणार, मराठा आरक्षण अभ्यासकांसोबत जरांगेंची दीड तास चर्चा
8
विशेष लेख: शिंक्याचे तुटले आणि (कोरियन) बोक्याचे फावले!
9
Maratha Morcha : मराठा आरक्षणाबाबत हालचालिंना वेग, मुख्यमंत्र्यांनी रात्रीच बोलावली बैठक; राधाकृष्ण विखे पाटील यांचीही उपस्थिती
10
रायगडमध्ये रिक्षाचा भीषण अपघात, ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखासह तिघांचा जागीच मृत्यू
11
Maratha Morcha : फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही आंदोलकांना मदत करता? एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात दिले उत्तर, म्हणाले...
12
Maratha Morcha : “गोंधळ घालणाऱ्यांना सरकारने पाठवले होते का?, सरकार दंगल ...”, सुप्रिया सुळेंना घेराव घालणाऱ्यांबाबत मनोज जरांगेंचं मोठं विधान
13
मोठी दुर्घटना! धौलीगंगा वीज प्रकल्पाच्या बोगद्यात भूस्खलनामुळे १९ कामगार अडकले
14
धावत्या ट्रॅव्हल्समध्ये जळून एकाचा मृत्यू; प्रवाशाने स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतल्याचा संशय
15
राज ठाकरेंच्या टीकेवर एकनाथ शिंदे यांचं प्रत्युत्तर; "आधी माहिती घेऊन बोलायला हवं होते..."
16
ऑस्ट्रेलियात भारतीयांविरोधात हजारो स्थानिक लोक रस्त्यावर उतरले; नेमके काय घडले?
17
टाकळगावचे लढवय्या विजयकुमार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार; आई, पत्नी अन् मुलांनी फोडला हंबरडा
18
Maratha Morcha: मनोज जरांगेंच्या मागण्यांवर मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत काय झाला निर्णय?
19
चीन-भारत संबंधांना तिसऱ्या देशाच्या नजरेची गरज नाही, मोदी आणि जिनपिंग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले
20
अभिनेत्री प्रिया मराठे काळाच्या पडद्याआड, अंत्यदर्शनावेळी मराठी कलाकारांना अश्रू अनावर

हवामान खात्याचा अंदाज पुन्हा चुकला; गाढवाचा धोका, कोल्हा तारणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:28 IST

मान्सूनचे आगमन होऊन बरेच दिवस झाले; परंतु जिल्ह्यात १० जूनचा अपवाद वगळता पुढे सार्वत्रिक स्वरूपातील पाऊस झाला नाही. रोहिणी ...

मान्सूनचे आगमन होऊन बरेच दिवस झाले; परंतु जिल्ह्यात १० जूनचा अपवाद वगळता पुढे सार्वत्रिक स्वरूपातील पाऊस झाला नाही. रोहिणी पाठोपाठ मृग नक्षत्रही कोरडेच गेले. त्यातच पाऊस आठ ते दहा दिवस लांबल्याचे चित्र आहे. दिवसा कडक ऊन्ह, तर रात्री आकाशात टपोरे चांदणे दिसत आहे. दिवसभरात काहीवेळ पावसाचे वातावरण तयार होते; मात्र पावसाचा थांगपत्ता नाही.

मृग नक्षत्रात जिल्ह्यात पावसाची संततधार अपेक्षित होती; पण पडणारा पाऊसही सार्वत्रिक नाही. त्यामुळे ज्या भागात पाऊस झाला, तेथील शेतकरी सुखावतो तर बाकीच्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. जिल्ह्यात ५० टक्के क्षेत्रावर यंदा खरिपाचा पेरा झाला आहे. पावसाने पाठ फिरविल्याने पेरणी केलेले शेतकरी चिंताग्रस्त असून उर्वरित शेतकरी अनुकूल परिस्थितीच्या प्रतीक्षेत आहेत.

.................

पावसाची स्थिती (मि.मी.)

१०३

अपेक्षित पाऊस

................

१६४.८

आतापर्यंत झालेला पाऊस

...................

मंगरूळपीर तालुका

९६ मि.मी.

सर्वात कमी पाऊस

...............

वाशिम तालुका

१४३ मि.मी.

सर्वात जास्त पाऊस

..............

कोठे किती पेरणी (हेक्टरमध्ये)

४,०६,२३४

अपेक्षित पेरणी क्षेत्र

...........

२,१९,१८७

आतापर्यंत झालेली पेरणी

..............

तालुकानिहाय पेरणी व झालेला पाऊस

वाशिम -

रिसोड -

मालेगाव -

मंगरूळपीर -

मानोरा -

कारंजा -

...........................

पेरणी (हेक्टरमध्ये)

वाशिम - ३७३८५

रिसोड - ४९२१६

मालेगाव - २८९३३

मंगरूळपीर - ४०४७३

मानोरा - २४५४६

कारंजा - ३८६३२

...........................

पीकनिहाय क्षेत्र

कापूस - १९२४५, १२२८२

तूर - ५४५०९, ३२६७९

मूग - ८२७२, १८२९

उडीद - १०१७९, ३८८

सोयाबीन - ३००४१७, १६८८२६

................

...तर खते-बियाणे कशी मिळणार?

यंदा चांगला पाऊस होणार, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता; मात्र झाले विपरितच. पाऊस नसल्याने पिके सुकत असून दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.

- ज्ञानेश्वर इढोळे, शेतकरी

..................

आर्थिक अडचणीत असतानाही पेरणीसाठी बियाणे, रासायनिक औषध, खताची जुळवाजुळव केली. आता पावसाने दडी मारली. दुबार पेरणी करावी लागल्यास खत, बियाणे कशी मिळणार?

- गंगाधर पांढरे, शेतकरी

....................

यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीला बियाण्यांचे दर वाढलेले होते. ते नंतर कमी झाले. त्यामुळे दिलासा मिळाला; मात्र पेरणी उलटल्यास पुन्हा होणारा खर्च आवाक्याबाहेर जाणार आहे.

- दिलीप मुठाळ, शेतकरी