शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

पाण्याचा अपव्यय; मजीप्राचे दुर्लक्ष 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 17:08 IST

जीवन प्राधीकरणची जलवाहिनी फुटल्याने हजारो लीटर पाण्याचा अपव्यय होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यातील ग्रामीण भागांत पाणीटंचाईचे संकट उग्र रूप धारण करीत असताना मानोरा तालुक्यातील तोरणाळा येथील मुख्य रस्त्यावर गेल्या ३ दिवसांपासून जीवन प्राधीकरणची जलवाहिनी फुटल्याने हजारो लीटर पाण्याचा अपव्यय होत आहे. रस्त्यावर पाण्याचा पाट वाहत असतानाही जीवन प्राधीकरणच्या अधिकाºयांचे मात्र दुर्लक्ष आहे.वाशिम जिल्ह्यातील ४०० पेक्षा अधिक गावांत सद्यस्थितीत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. घडाभर पाण्यासाठी रखरखत्या उन्हात ग्रामस्थांची पायपीट सुरू असल्याचे चित्र ग्रामीण भागांत सर्वत्र पाहायला मिळत आहे. या पाणीटंचाईवर उपाय म्हणून प्रशासनाने विहिरींचे अधीग्रहण केले, तर ५० पेक्षा अधिक गावांत टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. दुसरीकडे अडाण प्रकल्पामुळे मुबलक पाणी पुरवठा होत असलेल्या गावांत मात्र पाण्याचा अपव्यय होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मानोरा तालुक्यातील तोरणाळा येथे जिवन प्राधीकरणच्या पाणी पुरवठा योजनेची जलवाहिनी फुटल्याने हा प्रकार घडत असून, गेल्या तीन दिवसांपासून गावातील मुख्य रस्त्यावर पाण्याचा पाट वाहत असल्याने हजारो लीटर पाणी वाया जात आहे. तथापि, जलवाहिनीची दुरुस्ती करून पाण्याचा अपव्यय थांबविण्याचा प्रयत्न जिवन प्राधीकरणच्या अभियंत्यांकडून अद्यापही करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे सतत पाणी वाहत असल्याने रस्त्यावरही चिखल तयार झाला असून, ग्रामस्थांना या मार्गावरून येजा करण्यातही अडचणी येत आहेत.

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई