शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचा अपव्यय; मजीप्राचे दुर्लक्ष 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 17:08 IST

जीवन प्राधीकरणची जलवाहिनी फुटल्याने हजारो लीटर पाण्याचा अपव्यय होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यातील ग्रामीण भागांत पाणीटंचाईचे संकट उग्र रूप धारण करीत असताना मानोरा तालुक्यातील तोरणाळा येथील मुख्य रस्त्यावर गेल्या ३ दिवसांपासून जीवन प्राधीकरणची जलवाहिनी फुटल्याने हजारो लीटर पाण्याचा अपव्यय होत आहे. रस्त्यावर पाण्याचा पाट वाहत असतानाही जीवन प्राधीकरणच्या अधिकाºयांचे मात्र दुर्लक्ष आहे.वाशिम जिल्ह्यातील ४०० पेक्षा अधिक गावांत सद्यस्थितीत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. घडाभर पाण्यासाठी रखरखत्या उन्हात ग्रामस्थांची पायपीट सुरू असल्याचे चित्र ग्रामीण भागांत सर्वत्र पाहायला मिळत आहे. या पाणीटंचाईवर उपाय म्हणून प्रशासनाने विहिरींचे अधीग्रहण केले, तर ५० पेक्षा अधिक गावांत टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. दुसरीकडे अडाण प्रकल्पामुळे मुबलक पाणी पुरवठा होत असलेल्या गावांत मात्र पाण्याचा अपव्यय होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मानोरा तालुक्यातील तोरणाळा येथे जिवन प्राधीकरणच्या पाणी पुरवठा योजनेची जलवाहिनी फुटल्याने हा प्रकार घडत असून, गेल्या तीन दिवसांपासून गावातील मुख्य रस्त्यावर पाण्याचा पाट वाहत असल्याने हजारो लीटर पाणी वाया जात आहे. तथापि, जलवाहिनीची दुरुस्ती करून पाण्याचा अपव्यय थांबविण्याचा प्रयत्न जिवन प्राधीकरणच्या अभियंत्यांकडून अद्यापही करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे सतत पाणी वाहत असल्याने रस्त्यावरही चिखल तयार झाला असून, ग्रामस्थांना या मार्गावरून येजा करण्यातही अडचणी येत आहेत.

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई