शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पाण्याचा अपव्यय; मजीप्राचे दुर्लक्ष 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 17:08 IST

जीवन प्राधीकरणची जलवाहिनी फुटल्याने हजारो लीटर पाण्याचा अपव्यय होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यातील ग्रामीण भागांत पाणीटंचाईचे संकट उग्र रूप धारण करीत असताना मानोरा तालुक्यातील तोरणाळा येथील मुख्य रस्त्यावर गेल्या ३ दिवसांपासून जीवन प्राधीकरणची जलवाहिनी फुटल्याने हजारो लीटर पाण्याचा अपव्यय होत आहे. रस्त्यावर पाण्याचा पाट वाहत असतानाही जीवन प्राधीकरणच्या अधिकाºयांचे मात्र दुर्लक्ष आहे.वाशिम जिल्ह्यातील ४०० पेक्षा अधिक गावांत सद्यस्थितीत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. घडाभर पाण्यासाठी रखरखत्या उन्हात ग्रामस्थांची पायपीट सुरू असल्याचे चित्र ग्रामीण भागांत सर्वत्र पाहायला मिळत आहे. या पाणीटंचाईवर उपाय म्हणून प्रशासनाने विहिरींचे अधीग्रहण केले, तर ५० पेक्षा अधिक गावांत टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. दुसरीकडे अडाण प्रकल्पामुळे मुबलक पाणी पुरवठा होत असलेल्या गावांत मात्र पाण्याचा अपव्यय होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मानोरा तालुक्यातील तोरणाळा येथे जिवन प्राधीकरणच्या पाणी पुरवठा योजनेची जलवाहिनी फुटल्याने हा प्रकार घडत असून, गेल्या तीन दिवसांपासून गावातील मुख्य रस्त्यावर पाण्याचा पाट वाहत असल्याने हजारो लीटर पाणी वाया जात आहे. तथापि, जलवाहिनीची दुरुस्ती करून पाण्याचा अपव्यय थांबविण्याचा प्रयत्न जिवन प्राधीकरणच्या अभियंत्यांकडून अद्यापही करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे सतत पाणी वाहत असल्याने रस्त्यावरही चिखल तयार झाला असून, ग्रामस्थांना या मार्गावरून येजा करण्यातही अडचणी येत आहेत.

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई