शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
6
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
7
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
8
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
9
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
10
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
11
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
12
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
13
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
14
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
15
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
16
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
17
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
18
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
19
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!

पाणीपुरवठा योजनांच्या प्रस्तावांना मंजुरीची प्रतीक्षा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 15:59 IST

पाणीटंचाई निवारणार्थ काही गावांसाठी पाणीपुरवठा योजनेचे प्रस्ताव सादर करण्यात आले. मात्र, या प्रस्तावाला अद्याप मंजूरी नसल्याने गावक-यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. 

वाशिम : पाणीटंचाई निवारणार्थ काही गावांसाठी पाणीपुरवठा योजनेचे प्रस्ताव सादर करण्यात आले. मात्र, या प्रस्तावाला अद्याप मंजूरी नसल्याने गावक-यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गतवर्षी पुरेशा प्रमाणात पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील ५०० पेक्षा अधिक गावांमध्ये पाणीटंचाई जाणवणार आहे. पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना प्रस्तावित केलेल्या आहेत. परंतू, विहिर अधिग्रहणाचा अपवाद वगळता उर्वरीत उपाययोजनेसाठी ग्रामपंचायत स्तरावरून पंचायत समिती तसेच जिल्हास्तरीय यंत्रणकडे प्रस्ताव येत नसल्याची माहिती समोर येत आहे तर काही ठिकाणी प्रस्ताव सादर करूनही मंजूरी मिळत नसल्याची माहिती आहे. पाणीटंचाई संदर्भात जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती तसेच सर्वसाधारण सभेतही सदस्य, पदाधिका-यांकडून प्रश्न उपस्थित केले जातात. काही प्रश्नांची सोडवणूक केली जाते तर काही प्रश्न प्रलंबितच राहतात. गोलवाडी व निंबी येथील मागासवर्गीय वस्ती, मथूरा तांडा येथे पाणीपुरवठा योजनेच्या प्रस्तावाला मंजूरी द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत केली होती. पुढील कार्यवाही करण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या. परंतू, अद्याप मंजूरी मिळाली नसल्याची माहिती आहे. गोलवाडी येथील मागासवर्गीय वस्तीत पाणीपुरवठ्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे तेथे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. निंबी येथील मागासवर्गीय वस्ती तसेच मथूरा तांडा येथेही पाणीपुरवठा योजना नसल्याने घोटभर पाण्यासाठी मैलभर पायपिट करावी लागत आहे.

टॅग्स :Waterपाणी