शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

पाणीपुरवठा योजनांच्या प्रस्तावांना मंजुरीची प्रतीक्षा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 15:59 IST

पाणीटंचाई निवारणार्थ काही गावांसाठी पाणीपुरवठा योजनेचे प्रस्ताव सादर करण्यात आले. मात्र, या प्रस्तावाला अद्याप मंजूरी नसल्याने गावक-यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. 

वाशिम : पाणीटंचाई निवारणार्थ काही गावांसाठी पाणीपुरवठा योजनेचे प्रस्ताव सादर करण्यात आले. मात्र, या प्रस्तावाला अद्याप मंजूरी नसल्याने गावक-यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गतवर्षी पुरेशा प्रमाणात पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील ५०० पेक्षा अधिक गावांमध्ये पाणीटंचाई जाणवणार आहे. पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना प्रस्तावित केलेल्या आहेत. परंतू, विहिर अधिग्रहणाचा अपवाद वगळता उर्वरीत उपाययोजनेसाठी ग्रामपंचायत स्तरावरून पंचायत समिती तसेच जिल्हास्तरीय यंत्रणकडे प्रस्ताव येत नसल्याची माहिती समोर येत आहे तर काही ठिकाणी प्रस्ताव सादर करूनही मंजूरी मिळत नसल्याची माहिती आहे. पाणीटंचाई संदर्भात जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती तसेच सर्वसाधारण सभेतही सदस्य, पदाधिका-यांकडून प्रश्न उपस्थित केले जातात. काही प्रश्नांची सोडवणूक केली जाते तर काही प्रश्न प्रलंबितच राहतात. गोलवाडी व निंबी येथील मागासवर्गीय वस्ती, मथूरा तांडा येथे पाणीपुरवठा योजनेच्या प्रस्तावाला मंजूरी द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत केली होती. पुढील कार्यवाही करण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या. परंतू, अद्याप मंजूरी मिळाली नसल्याची माहिती आहे. गोलवाडी येथील मागासवर्गीय वस्तीत पाणीपुरवठ्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे तेथे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. निंबी येथील मागासवर्गीय वस्ती तसेच मथूरा तांडा येथेही पाणीपुरवठा योजना नसल्याने घोटभर पाण्यासाठी मैलभर पायपिट करावी लागत आहे.

टॅग्स :Waterपाणी