शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

जऊळका रेल्वे येथील पाणीपुरवठा योजना ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 15:02 IST

जउळकारेल्वे : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत जऊळका रेल्वे येथे तीन गावे पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र, जऊळका रेल्वे येथील पाणीपुरवठा ठप्प असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कजउळकारेल्वे : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत जऊळका रेल्वे येथे तीन गावे पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र, जऊळका रेल्वे येथील पाणीपुरवठा ठप्प असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. महाराष्टÑ जीवन प्राधिकरणमार्फत साधारणत: १८ वर्षापुर्वी जउळका रेल्वे, उडी, वरदरी बु. या तीन गावांना पाणीपुरवठा व्हावा यासाठी जउळका रेल्वे येथे जलकुंभ, जलशुद्धीकरण केंद्र व अन्य कामांचा शुभारंभ केला होता. सदर योजनेंतर्गतचे काम अतिशय संथगतीने करण्यात आले. दोन वर्षांपासून अनियमित पाणीपुरवठा होत आहे. आता तर जऊळका रेल्वे येथे पाणीपुरवठाही होत नसल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. गावातील हातपंपावर पाणी भरण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. जउळका गावालगत काटेपुर्णा नदीवर चाकातिर्थ प्रकल्पाची निर्मिती झाली. हा प्रकल्प सद्यस्थितीत तुडूंब भरलेला आहे. गावालगतच प्रकल्प असल्यावरही जउळका रेल्वे येथील नागरिकांना मात्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.दरवर्षी लाखो रुपये खर्च करून थातूरमातूर पाणीपुरवठा केला जातो. पाणीटंचाईवर कायमस्वरुपी तोडगा नसल्याने या योजनेवर करण्यात आलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात गेल्याच्या संतप्त प्रतिक्रिया गावकºयांमधून उमटत आहेत. कायमस्वरुपी उपाययोजनेचा अभावपावसाळा संपत नाही; तेच जउळका रेल्वे येथे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्यावतीने तीन गावे पाणीपुरवठा योजना अंमलात आली. मात्र, योग्य नियोजनाअभावी सदर योजनाही जऊळकावासियांची तहान भागविण्यात यशस्वी होऊ शकली नसल्याचे वास्तव आहे. जऊळका रेल्वे येथील पाणीटंचाईवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी पाणीपुरवठा योजनेंतर्गत नियमित पाणीपुरवठा सुरू राहण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व अन्य यंत्रणेने नियोजन करणे गरजेचे आहे.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी