शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

पाणीपुरवठा, पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडीत केला जाणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 11:46 IST

Washim News वीज पुरवठा तोडण्याची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता आर. जी. तायडे यांनी दिली.    

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे विद्युत देयकांच्या थकबाकीचा एकूण आकडा ७२ कोटींपेक्षा अधिक झालेला आहे. यामुळे पाणीपुरवठा व पथदिव्यांचा वीज पुरवठा तोडण्याची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता आर. जी. तायडे यांनी दिली.    महावितरणकडून गेल्या काही दिवसांपासून थकबाकीदार वीज ग्राहकांवर धडक कारवाई करण्यात येत आहे. त्यात आता ग्रामपंचायतीही ‘रडार’वर आल्या आहेत. महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी १५ मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पत्र पाठवून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे पाणीपुरवठा व पथदिव्यांच्या विद्युत देयक थकबाकीसंबंधी अवगत केले आहे. वाशिम तालुक्यातील ग्रामपंचायतींकडे पाणीपुरवठ्याचा विद्युत देयकापोटी १.६८ कोटी; तर विद्युत पथदिव्यांच्या विद्युत देयक थकबाकीपोटी ९.८५ कोटी असे एकूण ११.५३ कोटी रुपये थकीत आहेत. याशिवाय कारंजा तालुक्यातील ग्रामपंचायतींकडे १२.५४, मालेगाव ११.८२, मंगरूळपीर १०.२१, मानोरा १३.९६ आणि रिसोड तालुक्यातील ग्रामपंचायतींकडे १२.२९ कोटी रुपयांची थकबाकी झालेली आहे. संबंधित ग्रामपंचायतींना वारंवार आवाहन करूनही काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली जाणार असल्याचे कार्यकारी अभियंता तायडे यांनी सांगितले.

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना वारंवार आवाहन करूनही विद्युत देयकांची थकबाकी अदा करण्यात आलेली नाही. त्यामुळे अखेर नाइलाजास्तव पाणीपुरवठा आणि विद्युत पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित करावा लागत आहे. १४ व्या वित्त आयोगातून इतर सर्व कामे सुरळीतपणे केली जात आहेत. मात्र, विद्युत देयक भरण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची बाब गंभीर आहे.- आर.जी. तायडेकार्यकारी अभियंता, महावितरण, वाशिम

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरण