शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पुनरूज्जीवीत पाणीपुरवठा योजनांतर्गत ६७ गावांना पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 15:25 IST

६७ गावांसाठी असलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांना मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेतून पुनरूज्जीवीत करण्यात आल्याने लाखो लोकांना पिण्याचे पाणी मिळत असल्याचे दिसून येत आहे. 

ठळक मुद्दे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या पुनरूज्जीवनासाठी ८ कोटी ८० लाख २६ हजार ३०० रुपयांचा निधी देण्यात आला. देखभाल-दुरूस्ती, संचलन व संनियंत्रणाची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने स्विकारून सर्व ठिकाणची कामे पूर्ण केली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील बंद पडलेल्या उंबर्डाबाजार ९ गावे, म्हसणी १६ गावे, दुबळवेल-३ गावे, जऊळका रेल्वे-३ गावे, वनोजा-४ गावे, चांडस-६ गावे, चिचांबाभर-४ गावे, भामदेवी-६ गावे यासह वार्ला ८ गावे आणि करडा ८ गावे, अशा ६७ गावांसाठी असलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांना मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेतून पुनरूज्जीवीत करण्यात आल्याने लाखो लोकांना पिण्याचे पाणी मिळत असल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत शासनाने ३१ डिसेंबर २०१६ च्या अध्यादेशानुसार जिल्ह्यातील करडा, उंबर्डाबाजार, म्हसणी आणि वारला या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या पुनरूज्जीवनास मंजूरात देवून ५ कोटी ३१ लाख ७१ हजार रुपये निधी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला दिला होता. यासह ९ फेब्रूवारी २०१७ च्या अध्यादेशानुसार, भामदेवी, चांडस, दुबळवेल, जऊळका रेल्वे, वनोजा आणि चिचांबाभर येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या पुनरूज्जीवनासाठी ८ कोटी ८० लाख २६ हजार ३०० रुपयांचा निधी देण्यात आला. त्यातून सदर योजनांचे पुनरूज्जीवन करण्यासोबतच पुढील देखभाल-दुरूस्ती, संचलन व संनियंत्रणाची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने स्विकारून सर्व ठिकाणची कामे पूर्ण केली आहेत. सद्या नळ पाणीपुरवठांकरिता आवश्यक असलेले पाणी देखील उपलब्ध असल्याने संबंधित सर्व गावांना पुरेसे पाणी पुरविले जात असल्याची माहिती मजिप्राचे कार्यकारी अभियंता के.के.जीवने यांनी दिली.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी