शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
3
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
4
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
5
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
6
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
7
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
8
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
9
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
10
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
11
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
12
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
13
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
14
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
15
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
16
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
17
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
18
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
19
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा

अनुदानासाठी जलसमाधीचा ईशारा

By admin | Updated: September 26, 2014 00:33 IST

शेतक-याचे तहसीलदारांना निवेदन.

तळप बु. : गारपीट व अतवृष्टीमुळे झालेल्या पिक नुकसानीला वर्ष उलटत आले तरी, तळप बु. परिसरातील शेतकर्‍यांना गारपीट व अतवृष्टीची मदत मिळाली नाही. शासनाकडून जाहीर झालेली मदत त्वरीत न मिळाल्यास तळप बु. येथील धरणात जलसमाधी घेण्याचा ईशारा परिसरातील शेतकर्‍यांनी तहसीलदारांकडे सादर केलेल्या निवेदनातून दिला आहे.रामतीर्थ, कार्ली, कारखेडा येथील काही शेतकर्‍यांना आजपर्यंत शासनाची मदत मिळाली नसल्याची तेथील शेतकर्‍यांची तक्रार आहे. मागील वर्षी झालेल्या गारपीट व अतवृष्टीने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. त्यातून सावरण्यासाठी शासनाने मदत जाहीर केली. परंतु बर्‍याच शेतकर्‍यांनी ही आर्थिक मदत मिळाली नाही. त्यांच्या बँक खात्यात अद्यापही रक्कम जमा झाली नाही. आपल्या खात्यात रक्कम जमा झाली किंवा नाही याची खातरजमा करण्यासाठी शेतकरी बँक , तहसील कार्यालय आणि तलाठी यांच्याकडे चकरा मारतोय. परंतु त्याचा उपयोग होत नाही. रामतीर्थ येथील शेतकरी सुधाकर मोतीराम गांवडे यांच्या नावावर २ हजार आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर १0 हजार आर्थिक मदत तहसील दफ्तरी नोंद आहे. पण त्यांच्या बँक खात्यात अद्यापही मदत जमा झाली नाही. त्वरित मदत न मिळाल्यास तळप बु. येथील धरणात जलसमाधी घेवू असा ईशारा सुधाकर मोतीराम गावंडे, माणिकराव भगवंत गावंडे, विठ्ठल देवराव गांवडे आणि ब्रह्म परशराम रत्ने यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.