शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळ्यातच तीव्र पाणीटंचाई; पाण्यासाठी महिलांची वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 16:10 IST

रिसोड: तालुक्यातील महत्त्वाची ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या वाकद येथे हिवाळ्याच्या सुरवातीलाच तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड: तालुक्यातील महत्त्वाची ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या वाकद येथे हिवाळ्याच्या सुरवातीलाच तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. पाणी पुरवठा योजना ठप्प असल्याने महिला किलोमीटर अंतरावरून पाणी आणत गरजा भागवित आहेत. गावात जलस्त्रोत नसल्याने गावालगत असलेल्या तलावरील विहिरीचे दुषित पाणी नागरिकांना प्यावे लागत आहे.वाकद येथे नळगंगा योजनेद्वारे ग्रामस्थांना पाणी पुरवठा करण्यात येत होता; परंतु ही योजना सहा महिन्यांपासून ठप्प झाल्याने पाणीटंचाईचा सामना ग्रामस्थ करीत आहेत. या ठिकाणी  नळ योजनेच्या पाणी पुरवठ्याशिवाय दुसरे कोणतेच जलस्त्रोत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. गावालगत असलेल्या  विहिरीवरून लोक पाणी आणून गरजा भागवित आहेत. त्यापैकी गावलगतच्या तलावाजवळ असलेल्या विहिरीचे पाणी दुषित झाले आहे; परंतु वार्ड क्रमांक १ मधील ग्रामस्थांना पर्याय नसल्याने हे दुषित पाणीच प्यावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. नळगंगा योजनेद्वारे गावातील विहिरीतून ग्रामस्थांना पाणी पुरवठा केला जातो; परंतु या योजनेची जलवाहिनी काही ठिकाणी अनेक दिवसांपासून फुटली आहे. ती दुरुस्त करण्याची तसदी ग्रामपंचायकडून घेण्यात येत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना ऐन हिवाळ्यातच तीव्र पाणीटंचाईच सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे वार्ड क्रमांक १ मधील ग्रामस्थ तलावावरील विहिरीचे दुषित पाणी पित असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात असतानाही ग्रामपंचायतकडून अद्याप पाणी पुरवठा सुरू करण्याचे प्रयत्न करण्यात येत नसल्याचे दिसत आहे. ग्रामपंचायतच्या दुर्लक्षीत कारभारामुळेच ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, दुषित पाण्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका असल्याचे मत गावातील संतोष बोडखे यांनी व्यक्त केले.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडWaterपाणी