शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

हिवाळ्यातच तीव्र पाणीटंचाई; पाण्यासाठी महिलांची वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 16:10 IST

रिसोड: तालुक्यातील महत्त्वाची ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या वाकद येथे हिवाळ्याच्या सुरवातीलाच तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड: तालुक्यातील महत्त्वाची ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या वाकद येथे हिवाळ्याच्या सुरवातीलाच तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. पाणी पुरवठा योजना ठप्प असल्याने महिला किलोमीटर अंतरावरून पाणी आणत गरजा भागवित आहेत. गावात जलस्त्रोत नसल्याने गावालगत असलेल्या तलावरील विहिरीचे दुषित पाणी नागरिकांना प्यावे लागत आहे.वाकद येथे नळगंगा योजनेद्वारे ग्रामस्थांना पाणी पुरवठा करण्यात येत होता; परंतु ही योजना सहा महिन्यांपासून ठप्प झाल्याने पाणीटंचाईचा सामना ग्रामस्थ करीत आहेत. या ठिकाणी  नळ योजनेच्या पाणी पुरवठ्याशिवाय दुसरे कोणतेच जलस्त्रोत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. गावालगत असलेल्या  विहिरीवरून लोक पाणी आणून गरजा भागवित आहेत. त्यापैकी गावलगतच्या तलावाजवळ असलेल्या विहिरीचे पाणी दुषित झाले आहे; परंतु वार्ड क्रमांक १ मधील ग्रामस्थांना पर्याय नसल्याने हे दुषित पाणीच प्यावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. नळगंगा योजनेद्वारे गावातील विहिरीतून ग्रामस्थांना पाणी पुरवठा केला जातो; परंतु या योजनेची जलवाहिनी काही ठिकाणी अनेक दिवसांपासून फुटली आहे. ती दुरुस्त करण्याची तसदी ग्रामपंचायकडून घेण्यात येत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना ऐन हिवाळ्यातच तीव्र पाणीटंचाईच सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे वार्ड क्रमांक १ मधील ग्रामस्थ तलावावरील विहिरीचे दुषित पाणी पित असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात असतानाही ग्रामपंचायतकडून अद्याप पाणी पुरवठा सुरू करण्याचे प्रयत्न करण्यात येत नसल्याचे दिसत आहे. ग्रामपंचायतच्या दुर्लक्षीत कारभारामुळेच ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, दुषित पाण्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका असल्याचे मत गावातील संतोष बोडखे यांनी व्यक्त केले.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडWaterपाणी