शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

हिवाळ्यातच तीव्र पाणीटंचाई; पाण्यासाठी महिलांची वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 16:10 IST

रिसोड: तालुक्यातील महत्त्वाची ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या वाकद येथे हिवाळ्याच्या सुरवातीलाच तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड: तालुक्यातील महत्त्वाची ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या वाकद येथे हिवाळ्याच्या सुरवातीलाच तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. पाणी पुरवठा योजना ठप्प असल्याने महिला किलोमीटर अंतरावरून पाणी आणत गरजा भागवित आहेत. गावात जलस्त्रोत नसल्याने गावालगत असलेल्या तलावरील विहिरीचे दुषित पाणी नागरिकांना प्यावे लागत आहे.वाकद येथे नळगंगा योजनेद्वारे ग्रामस्थांना पाणी पुरवठा करण्यात येत होता; परंतु ही योजना सहा महिन्यांपासून ठप्प झाल्याने पाणीटंचाईचा सामना ग्रामस्थ करीत आहेत. या ठिकाणी  नळ योजनेच्या पाणी पुरवठ्याशिवाय दुसरे कोणतेच जलस्त्रोत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. गावालगत असलेल्या  विहिरीवरून लोक पाणी आणून गरजा भागवित आहेत. त्यापैकी गावलगतच्या तलावाजवळ असलेल्या विहिरीचे पाणी दुषित झाले आहे; परंतु वार्ड क्रमांक १ मधील ग्रामस्थांना पर्याय नसल्याने हे दुषित पाणीच प्यावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. नळगंगा योजनेद्वारे गावातील विहिरीतून ग्रामस्थांना पाणी पुरवठा केला जातो; परंतु या योजनेची जलवाहिनी काही ठिकाणी अनेक दिवसांपासून फुटली आहे. ती दुरुस्त करण्याची तसदी ग्रामपंचायकडून घेण्यात येत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना ऐन हिवाळ्यातच तीव्र पाणीटंचाईच सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे वार्ड क्रमांक १ मधील ग्रामस्थ तलावावरील विहिरीचे दुषित पाणी पित असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात असतानाही ग्रामपंचायतकडून अद्याप पाणी पुरवठा सुरू करण्याचे प्रयत्न करण्यात येत नसल्याचे दिसत आहे. ग्रामपंचायतच्या दुर्लक्षीत कारभारामुळेच ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, दुषित पाण्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका असल्याचे मत गावातील संतोष बोडखे यांनी व्यक्त केले.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडWaterपाणी