शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

जलयुक्त कामांमुळे पाणीटंचाई दूर होईल - आमदार राजेंद्र पाटणी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 14:36 IST

या कामांमुळे सिंचनासोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघेल, असे मत आमदार राजेंद्र पाटणी यांनी व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड (वाशिम) : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत टंचाईग्रस्त गावे टंचाईमुक्त करण्याचे शासनाचे धोरण आहे. कारंजा-मानोरा मतदार संघातील टंचाईग्रस्त गावांचे पावसाळ्यापुर्वी आराखडे तयार करून मोठ्या प्रमाणात कामे करण्याचा प्रयत्न केला. या कामांमुळे सिंचनासोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघेल, असे मत आमदार राजेंद्र पाटणी यांनी व्यक्त केले. तालुक्यातील ग्राम मोखड (पिंप्री) येथील कामांची पाहणी करताना ते बोलत होते.कार्यक्रमाला भाजपा तालुकाध्यक्ष डॉ.राजीव काळे, सरपंच, उपसरपंच, जि.प.सदस्य मिना भोने व ग्रामस्थांची बहुसंख्येने उपस्थिती होती. जलयुक्त शिवार अभियानामुळे जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात होत आहेत असे सांगून पाटणी म्हणाले की पावसाळ्यापुर्वी कृती आराखडा तयार करून जलयुक्तची कामे मार्गी लावली आहेत. ग्रामीण भागातील नाल्याचे खोलीकरण, रूंदीकरणासोबतच पाझर तलाव, लघुसिंचन तलाव दुरूस्ती, नुतनीकरण व क्षमता पुनर्स्थापित करून ज्या गावात तीव्र पाणी टंचाई आहे अशा गावात ताळेबंदानुसार पाण्याची गरज लक्षात घेता कार्यक्रम राबविण्यात आले. भविष्यात टंचाईग्रस्त गावात पाणी पुरवठा योजना उपलब्ध करून देण्याचा आपला मानस असल्याचे मत पाटणी यांनी व्यक्त केले. यावेळी ६२ लाख रुपये किंमतीच्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गतच्या कामाला शुभारंभही करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन गणेश इसळ यांनी केले. यावेळी अनिल कानकिरड, दिगंबर गोडसे, ज्ञानेश्वर ठाकरे, विजय गोडसे, गणेश ईसळ, गणेश राऊत, ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे अधिकारी बोबडे व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

टॅग्स :washimवाशिमRajendra Patniराजेंद्र पाटणीKaranjaकारंजा