शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त कामांमुळे पाणीटंचाई दूर होईल - आमदार राजेंद्र पाटणी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 14:36 IST

या कामांमुळे सिंचनासोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघेल, असे मत आमदार राजेंद्र पाटणी यांनी व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड (वाशिम) : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत टंचाईग्रस्त गावे टंचाईमुक्त करण्याचे शासनाचे धोरण आहे. कारंजा-मानोरा मतदार संघातील टंचाईग्रस्त गावांचे पावसाळ्यापुर्वी आराखडे तयार करून मोठ्या प्रमाणात कामे करण्याचा प्रयत्न केला. या कामांमुळे सिंचनासोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघेल, असे मत आमदार राजेंद्र पाटणी यांनी व्यक्त केले. तालुक्यातील ग्राम मोखड (पिंप्री) येथील कामांची पाहणी करताना ते बोलत होते.कार्यक्रमाला भाजपा तालुकाध्यक्ष डॉ.राजीव काळे, सरपंच, उपसरपंच, जि.प.सदस्य मिना भोने व ग्रामस्थांची बहुसंख्येने उपस्थिती होती. जलयुक्त शिवार अभियानामुळे जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात होत आहेत असे सांगून पाटणी म्हणाले की पावसाळ्यापुर्वी कृती आराखडा तयार करून जलयुक्तची कामे मार्गी लावली आहेत. ग्रामीण भागातील नाल्याचे खोलीकरण, रूंदीकरणासोबतच पाझर तलाव, लघुसिंचन तलाव दुरूस्ती, नुतनीकरण व क्षमता पुनर्स्थापित करून ज्या गावात तीव्र पाणी टंचाई आहे अशा गावात ताळेबंदानुसार पाण्याची गरज लक्षात घेता कार्यक्रम राबविण्यात आले. भविष्यात टंचाईग्रस्त गावात पाणी पुरवठा योजना उपलब्ध करून देण्याचा आपला मानस असल्याचे मत पाटणी यांनी व्यक्त केले. यावेळी ६२ लाख रुपये किंमतीच्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गतच्या कामाला शुभारंभही करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन गणेश इसळ यांनी केले. यावेळी अनिल कानकिरड, दिगंबर गोडसे, ज्ञानेश्वर ठाकरे, विजय गोडसे, गणेश ईसळ, गणेश राऊत, ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे अधिकारी बोबडे व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

टॅग्स :washimवाशिमRajendra Patniराजेंद्र पाटणीKaranjaकारंजा