शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वाशिम जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र; उपाययोजनांची व्याप्तीही वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 17:16 IST

वाशिम : मे महिन्याच्या पंधरवड्यापासून जिल्ह्यात पाणीटंचाईची तिव्रता अधिकच वाढली असून, ही तिव्रता कमी करण्याचा प्रयत्न म्हणून जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील ४५ गावांत टँकर तर १८४ गावांत २५३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मे महिन्याच्या पंधरवड्यापासून जिल्ह्यात पाणीटंचाईची तिव्रता अधिकच वाढली असून, ही तिव्रता कमी करण्याचा प्रयत्न म्हणून जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील ४५ गावांत टँकर तर १८४ गावांत २५३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. येथे पिण्याच्या पाण्याचा अपवाद वगळता वापरण्यासाठी पाण्याची टंचाई जाणवत असून, अन्य काही गावातही पाण्यासाठी नागरिकांची पायपिट सुरूच आहे.गत तीन वर्षांत पावसाचे प्रमाणही कमी झाल्याने पाणीटंचाईची तिव्रता अधिकच वाढत आहे. गतवर्षी पावसाळ्यात पावसाने सरासरी गाठली नाही. परिणामी, आता पाणीटंचाईची दाहकता अधिकच वाढली आहे. उन्हाबरोबरच पाणीटंचाईच्या चटक्याने ग्रामीण भागातील जनता होरपळून जात आहे. पाणीटंचाई निवारण्यासाठी प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मानोरा तालुक्यात गलमगाव, पाळोदी, रिसोड तालुक्यात भर जहॉगीर परिसर, मालेगाव तालुक्यातील बोराळा, राजूरा यासह डोंगराळ भागातील नागरिक, वाशिम तालुक्यातील माळेगाव, भोयता परिसर, कारंजा तालुक्यातील गिर्डा, बांबर्डा परिसर आदी भागातील नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. नागरिकांची मागणी आणि पाणीटंचाईची दाहकता लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने आता उपाययोजनांची व्याप्ती वाढविल्याचे दिसून येते. सद्यस्थितीत ४५ गावांत टँकर मंजूर असून, १८४ गावांत २५३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. ४५ टँकरमध्ये वाशिम तालुक्यातील १६ गावे, मालेगाव तालुक्यात सात, रिसोड चार, मंगरूळपीर नऊ, मानोरा पाच आणि कारंजा तालुक्यातील पाच गावांचा समावेश आहे. याप्रमाणेच २५३ विहिर अधिग्रहणामध्ये वाशिम तालुक्यात ५९, मालेगाव ३१, रिसोड ५०, मंगरूळपीर ५४, मानोरा १८ आणि कारंजा तालुक्यात ३१ अशा ठिकाणचा समावेश आहे. या टंचाईग्रस्त गावांत टँकर किंवा विहिर अधिग्रहणामुळे नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होत असले तरी वापरण्यासाठीच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे. या टंचाईग्रस्त गावांव्यतिरिक्त रिसोड तालु्क्यातील भर जहॉगीर परिसरातील पाच गावे, लोणी परिसरात तीन गावे, कारंजा तालुक्यातील हिवरा, गंगापूर, आखतवाडा, मालेगाव तालुक्यातील शिरपूर परिसरातील तीन गावे आदी गावांमध्येही पाण्यासाठी नागरिकांना दूरवर पायपिट करावी लागत आहे. गावापासून दोन ते तीन किमी अंतरावर असले्ल्या शेतातील विहिरींवरून भर उन्हात पाणी आणण्याची कसरत महिलांना करावी लागत आहे.

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई