शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

मंगरुळपीर तालुक्यात पाणीटंचाई ; शेतशिवारातून बैलबंडीने आणले जातेय पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 14:29 IST

मंगरुळपीर: तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा अत्यंत तीव्र झाल्या आहेत. ग्रामीण भागामधील जनतेला पिण्यासाठी पाणी मिळेनासे झाले असून, विविध ठिकाणी शेतशिवारातील विहिरीवरून बैलबंडीने पाणी आणून लोक आपली तहान भागवित आहेत.

ठळक मुद्देरखरखत्या उन्हामुळे गावातील विहिरी, हातपंप कोरडे पडले असून, पिण्याच्या पाण्याचे इतरही पर्याय उपलब्ध नाहीत.तालुक्यातील बहुतांश खेड्यांमध्ये हे गंभीर चित्र पाहायला मिळत आहे. तहान भागेल आणि इतर काही आवश्यक गरजा पूर्ण होऊ शकतील, एवढेही पाणी दिवसाकाळी विहिरीतून उपसणे शक्य होत नसल्याचेही दिसत आहे. 

 मंगरुळपीर: तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा अत्यंत तीव्र झाल्या आहेत. ग्रामीण भागामधील जनतेला पिण्यासाठी पाणी मिळेनासे झाले असून, विविध ठिकाणी शेतशिवारातील विहिरीवरून बैलबंडीने पाणी आणून लोक आपली तहान भागवित आहेत. तालुक्यातील शेंदूरजना मोरे येथेही हे भीषण वास्तव पाहायला मिळत आहे.मंगरुळपीर तालुक्यात गतवर्षी वार्षिक सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झाला. परिणामी हिवाळ्यापासूनच जनतेला पाणीटंचाईचे चटके सोसावे लागत आहेत. आता या पाणीटंचाईच्या झळा अधिकच तीव्र झाल्या आहेत. रखरखत्या उन्हामुळे गावातील विहिरी, हातपंप कोरडे पडले असून, पिण्याच्या पाण्याचे इतरही पर्याय उपलब्ध नाहीत. त्यामुळे जनतेचे पाण्याविना प्रचंड हाल होत आहेत. तालुक्यातील बहुतांश खेड्यांमध्ये हे गंभीर चित्र पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्यांनी मोफत पाणी पुरवठा सुरू केल्याने संबंधित गावातील ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे; परंतु बºयांच गावात हा उपक्रम राबविण्यासाठी पुरेशे पाणीही उपलब्ध नाहीत. स्वत:च्या कुटुंबाची तहान भागविण्यासाठी काही ग्रामस्थ  शेतशिवारातील आटत चाललेल्या विहिरीतून पाणी बादल्यांनी उपसून ते बैलबंडीद्वारे आणत असल्याचे विदारक चित्र मंगरुळपीर तालुक्यातील शेंदूरजना शिवारात पाहायला मिळत आहे. दिवसभराची तहान भागेल आणि इतर काही आवश्यक गरजा पूर्ण होऊ शकतील, एवढेही पाणी दिवसाकाळी विहिरीतून उपसणे शक्य होत नसल्याचेही दिसत आहे.  ग्रामस्थांना चिंता पुढील महिन्याचीसध्या एप्रिल महिना संपला असताना विहिरी ठणठण झाल्या असून, अद्यापही पावसाळ्यासाठी जवळपास दिड महिन्याचा कालावधी उरला आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतरही पाण्याची समस्या तात्काळ मिटेलच अशी शाश्वती नाही. त्यामुळे आगामी दिवसांत पाणीटंचाईची समस्या उग्ररूप धारण करण्याची भिती निर्माण झाली असून, पुढील महिन्यांत पिण्यासाठीही पुरेशे पाणी मिळणार की नाही, ही चिंता ग्रामस्थांना पडल्याचे दिसत आहे. प्रशासनाने विहिरींचे अधिग्रहण करून शेती वा इतर कोणत्याही प्रयोजनासाठी होत असलेल्या पाणी वापरावर तात्काळ बंदी घालावी, अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात येत आहे.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीरWaterपाणी