शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
3
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
4
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
5
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
6
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
7
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
8
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
9
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
10
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
11
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
12
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
13
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
14
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
15
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
16
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
17
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
18
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
19
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
20
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं

मंगरुळपीर तालुक्यात पाणीटंचाई ; शेतशिवारातून बैलबंडीने आणले जातेय पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 14:29 IST

मंगरुळपीर: तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा अत्यंत तीव्र झाल्या आहेत. ग्रामीण भागामधील जनतेला पिण्यासाठी पाणी मिळेनासे झाले असून, विविध ठिकाणी शेतशिवारातील विहिरीवरून बैलबंडीने पाणी आणून लोक आपली तहान भागवित आहेत.

ठळक मुद्देरखरखत्या उन्हामुळे गावातील विहिरी, हातपंप कोरडे पडले असून, पिण्याच्या पाण्याचे इतरही पर्याय उपलब्ध नाहीत.तालुक्यातील बहुतांश खेड्यांमध्ये हे गंभीर चित्र पाहायला मिळत आहे. तहान भागेल आणि इतर काही आवश्यक गरजा पूर्ण होऊ शकतील, एवढेही पाणी दिवसाकाळी विहिरीतून उपसणे शक्य होत नसल्याचेही दिसत आहे. 

 मंगरुळपीर: तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा अत्यंत तीव्र झाल्या आहेत. ग्रामीण भागामधील जनतेला पिण्यासाठी पाणी मिळेनासे झाले असून, विविध ठिकाणी शेतशिवारातील विहिरीवरून बैलबंडीने पाणी आणून लोक आपली तहान भागवित आहेत. तालुक्यातील शेंदूरजना मोरे येथेही हे भीषण वास्तव पाहायला मिळत आहे.मंगरुळपीर तालुक्यात गतवर्षी वार्षिक सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झाला. परिणामी हिवाळ्यापासूनच जनतेला पाणीटंचाईचे चटके सोसावे लागत आहेत. आता या पाणीटंचाईच्या झळा अधिकच तीव्र झाल्या आहेत. रखरखत्या उन्हामुळे गावातील विहिरी, हातपंप कोरडे पडले असून, पिण्याच्या पाण्याचे इतरही पर्याय उपलब्ध नाहीत. त्यामुळे जनतेचे पाण्याविना प्रचंड हाल होत आहेत. तालुक्यातील बहुतांश खेड्यांमध्ये हे गंभीर चित्र पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्यांनी मोफत पाणी पुरवठा सुरू केल्याने संबंधित गावातील ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे; परंतु बºयांच गावात हा उपक्रम राबविण्यासाठी पुरेशे पाणीही उपलब्ध नाहीत. स्वत:च्या कुटुंबाची तहान भागविण्यासाठी काही ग्रामस्थ  शेतशिवारातील आटत चाललेल्या विहिरीतून पाणी बादल्यांनी उपसून ते बैलबंडीद्वारे आणत असल्याचे विदारक चित्र मंगरुळपीर तालुक्यातील शेंदूरजना शिवारात पाहायला मिळत आहे. दिवसभराची तहान भागेल आणि इतर काही आवश्यक गरजा पूर्ण होऊ शकतील, एवढेही पाणी दिवसाकाळी विहिरीतून उपसणे शक्य होत नसल्याचेही दिसत आहे.  ग्रामस्थांना चिंता पुढील महिन्याचीसध्या एप्रिल महिना संपला असताना विहिरी ठणठण झाल्या असून, अद्यापही पावसाळ्यासाठी जवळपास दिड महिन्याचा कालावधी उरला आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतरही पाण्याची समस्या तात्काळ मिटेलच अशी शाश्वती नाही. त्यामुळे आगामी दिवसांत पाणीटंचाईची समस्या उग्ररूप धारण करण्याची भिती निर्माण झाली असून, पुढील महिन्यांत पिण्यासाठीही पुरेशे पाणी मिळणार की नाही, ही चिंता ग्रामस्थांना पडल्याचे दिसत आहे. प्रशासनाने विहिरींचे अधिग्रहण करून शेती वा इतर कोणत्याही प्रयोजनासाठी होत असलेल्या पाणी वापरावर तात्काळ बंदी घालावी, अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात येत आहे.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीरWaterपाणी