शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मंगरुळपीर तालुक्यात पाणीटंचाई ; शेतशिवारातून बैलबंडीने आणले जातेय पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 14:29 IST

मंगरुळपीर: तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा अत्यंत तीव्र झाल्या आहेत. ग्रामीण भागामधील जनतेला पिण्यासाठी पाणी मिळेनासे झाले असून, विविध ठिकाणी शेतशिवारातील विहिरीवरून बैलबंडीने पाणी आणून लोक आपली तहान भागवित आहेत.

ठळक मुद्देरखरखत्या उन्हामुळे गावातील विहिरी, हातपंप कोरडे पडले असून, पिण्याच्या पाण्याचे इतरही पर्याय उपलब्ध नाहीत.तालुक्यातील बहुतांश खेड्यांमध्ये हे गंभीर चित्र पाहायला मिळत आहे. तहान भागेल आणि इतर काही आवश्यक गरजा पूर्ण होऊ शकतील, एवढेही पाणी दिवसाकाळी विहिरीतून उपसणे शक्य होत नसल्याचेही दिसत आहे. 

 मंगरुळपीर: तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा अत्यंत तीव्र झाल्या आहेत. ग्रामीण भागामधील जनतेला पिण्यासाठी पाणी मिळेनासे झाले असून, विविध ठिकाणी शेतशिवारातील विहिरीवरून बैलबंडीने पाणी आणून लोक आपली तहान भागवित आहेत. तालुक्यातील शेंदूरजना मोरे येथेही हे भीषण वास्तव पाहायला मिळत आहे.मंगरुळपीर तालुक्यात गतवर्षी वार्षिक सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झाला. परिणामी हिवाळ्यापासूनच जनतेला पाणीटंचाईचे चटके सोसावे लागत आहेत. आता या पाणीटंचाईच्या झळा अधिकच तीव्र झाल्या आहेत. रखरखत्या उन्हामुळे गावातील विहिरी, हातपंप कोरडे पडले असून, पिण्याच्या पाण्याचे इतरही पर्याय उपलब्ध नाहीत. त्यामुळे जनतेचे पाण्याविना प्रचंड हाल होत आहेत. तालुक्यातील बहुतांश खेड्यांमध्ये हे गंभीर चित्र पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्यांनी मोफत पाणी पुरवठा सुरू केल्याने संबंधित गावातील ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे; परंतु बºयांच गावात हा उपक्रम राबविण्यासाठी पुरेशे पाणीही उपलब्ध नाहीत. स्वत:च्या कुटुंबाची तहान भागविण्यासाठी काही ग्रामस्थ  शेतशिवारातील आटत चाललेल्या विहिरीतून पाणी बादल्यांनी उपसून ते बैलबंडीद्वारे आणत असल्याचे विदारक चित्र मंगरुळपीर तालुक्यातील शेंदूरजना शिवारात पाहायला मिळत आहे. दिवसभराची तहान भागेल आणि इतर काही आवश्यक गरजा पूर्ण होऊ शकतील, एवढेही पाणी दिवसाकाळी विहिरीतून उपसणे शक्य होत नसल्याचेही दिसत आहे.  ग्रामस्थांना चिंता पुढील महिन्याचीसध्या एप्रिल महिना संपला असताना विहिरी ठणठण झाल्या असून, अद्यापही पावसाळ्यासाठी जवळपास दिड महिन्याचा कालावधी उरला आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतरही पाण्याची समस्या तात्काळ मिटेलच अशी शाश्वती नाही. त्यामुळे आगामी दिवसांत पाणीटंचाईची समस्या उग्ररूप धारण करण्याची भिती निर्माण झाली असून, पुढील महिन्यांत पिण्यासाठीही पुरेशे पाणी मिळणार की नाही, ही चिंता ग्रामस्थांना पडल्याचे दिसत आहे. प्रशासनाने विहिरींचे अधिग्रहण करून शेती वा इतर कोणत्याही प्रयोजनासाठी होत असलेल्या पाणी वापरावर तात्काळ बंदी घालावी, अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात येत आहे.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीरWaterपाणी