शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

काजळेश्वर, केनवड परिसरात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 16:02 IST

नळ योजनेचा पाणीपुरवठा १० ते १५ दिवसाआड होत असल्याने गावकºयांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे.

केनवड/काजळेश्वर : रिसोड तालुक्यातील केनवड आणि कारंजा तालुक्यातील काजळे्श्वर येथे पाणीटंचाई निर्माण झाली असून, नळ योजनेचा पाणीपुरवठा १० ते १५ दिवसाआड होत असल्याने गावकºयांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे.केनवड : मेहकर ते मालेगाव मार्गावर वसलेल्या केनवड येथे ग्रामपंचायतच्या नळ योजनेद्वारा पाणीपुरवठा होतो. योग्य नियोजन नसल्यामुळे कधी १० व्या दिवशी तर कधी १७ व्या दिवशी नळ येतात. गावातील विहिरींनी तळ गाठल्याने ग्रामस्थांना एक ते दीड किमी अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. तीन, चार दिवसाआड पाणीपुरवठा होईल, एवढा जलसाठा विहिरीमध्ये आहे. परंतू, नियोजन नसल्यामुळे नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने गावकºयांना शेतातील विहिरींमधून पाणी आणावे लागत आहे. लहान मुलांसह महिला व आबालवृद्धांनादेखील दूरवरून पाणी आणावे लागत आहे. याकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक ठरत आहे.काजळेश्वर उपाध्ये : येथील विहीरीत पाणीसाठा असूनही गावकºयांना आठ-आठ दिवस पाणीपुरवठा होत नाही. वीज भारनियमनामुळे जलकुंभ भरण्यास विलंब लागतो. याचा फटका गावकºयांना बसत आहे. महावितरणने विद्युत खांबावर तारजोडणी केली नाही. त्यामुळे पाण्यासाठी गावकºयांना वैताग झाला आहे. कुपनलिकेचा आधार घेत गावकरी, महिला पुरुष मे महिन्याच्या उकाडयात सकाळ, दुपार, रात्री या वेळेत गर्दी नसेल तेव्हा पाणी भरत असल्याचे दिसून येते. तर गुरांकरीता पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था महेंद्रा पाटील उपाध्ये आणि दिलीप पा. उपाध्ये या बंधूंनी त्यांच्या हौदावर केली आहे. मे महिन्यात पाण्यासाठी गावकºयांची गैरसोय होत असल्याने याकडे संबंधितांनी लक्ष द्यावे, अशी मागणी महादेव टेलर जाधव यांनी १७ मे रोजी केली.

 काजळेश्वरला पाणी पुरवठा करणाºया विहिरीवर स्वतंत्र रोहित्र मंजूर आहे. मात्र विद्युत खांबावर लॉकडाउनमुळे तार जोडणी बाकी आहे. येत्या तीन दिवसात महावितरणाकडून तार मिळेल व तारजोडणी झाल्यानंतर तातडीने पाणीपुरवठा केला जाईल. नितीन पा. उपाध्येसदस्य ग्रामपंचायत काजळेश्वर.

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई