शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

अमरावती विभागातील पाणी टंचाईग्रस्त गावांना टँकरची प्रतीक्षा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 16:46 IST

वाशिम : अमरावती विभागातील पाचही जिल्हयातील पाणी टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू होणे अपेक्षीत आहे.

वाशिम : अमरावती विभागातील पाचही जिल्हयातील पाणी टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू होणे अपेक्षीत आहे. बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक १०८ तर अमरावती ३ आणि यवतमाळ जिल्ह्यातील एका टँकरचा अपवाद वगळता उर्वरीत वाशिम व अकोला जिल्हयातील टंचाईग्रस्त गावाला टँकरची प्रतिक्षा कायम आहे.गतवर्षी पावसाने सरासरी गाठली नसल्याने यावर्षी अमरावती विभागातील अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. विभागातील बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाईची तिव्रता असून तेथे टँकरने पाणीपुरवठा करण्याचे सर्वाधिक प्रस्ताव आहेत. आतापर्यंत जवळपास १०८ टँकरला मंजूरी मिळालेली आहे. अमरावती, यवतमाळ, वाशिम व अकोला जिल्ह्यातही पाणीटंचाई असून, टँकरने पाणीपुरवठा करावा, यासंदर्भात प्रशासनदरबारी प्रस्ताव पाठविण्यात आलेले आहेत. ३१ मार्चपर्यंत अमरावती जिल्ह्यात ३ आणि यवतमाळ जिल्ह्यात १ टँकर सुरू आहे. दुसरीकडे वाशिम व अकोला जिल्ह्यातील टँकरच्या प्रस्तावांना मंजूरी नसल्याने अद्याप टँकर सुरू होऊ शकले नाही. वाशिम जिल्ह्यातील जवळपास १४ गावांचे टँकरसंदर्भात प्रस्ताव आहेत. मात्र, अद्याप मंजूरी मिळालेली नसल्याने टंचाईग्रस्त गावातील नागरिकांना टँकरची प्रतीक्षा कायम आहे. टँकरने पाणीपुरवठा नसल्याने पिण्याच्या घोटभर पाण्यासाठी गावकऱ्यांना मैलभर पायपिट करावी लागत आहे. टँकरच्या प्रस्तावांना मंजूरी द्यावी, अशी मागणी टंचाईग्रस्त गावातील नागरिकांमधून होत आहे.

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई