शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

जलजन्य  आजार टाळण्यासाठी पाणी नमुने तपासणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 12:58 IST

वाशिम : जिल्ह्यातील नागरिकांना पिण्यायोग्य स्वच्छ पाणी मिळावे, जलजन्य आजार  टाळण्याच्या दृष्टिकोनातून पाणी पुरवठा विभागाच्यावतीने जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायती अंतर्गत असलेले जलस्त्रोत तपासले जात आहे.

ठळक मुद्देजलजन्य आजार टाळण्यासाठी पाणी  नमुने  तपासणी सुरू असून,  शुद्ध पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले. जलस्त्रोतात पुरेशा प्रमाणात ब्लिचिंग पावडर टाकण्याच्या सूचनाही जिल्हा परिषद प्रशासनाने दिलेल्या आहेत.

वाशिम : जिल्ह्यातील नागरिकांना पिण्यायोग्य स्वच्छ पाणी मिळावे, जलजन्य आजार  टाळण्याच्या दृष्टिकोनातून पाणी पुरवठा विभागाच्यावतीने जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायती अंतर्गत असलेले जलस्त्रोत तपासले जात असून, पाण्यात कोणत्या क्षारघटकांची कमतरता आहे याची माहिती घेतली जात आहे.पावसाळ्याच्या दिवसात जलजन्य आजार तसेच दूषित अन्न-पाण्याच्या प्रकारातून टायफॉईड, कावीळ, जुलाब व अन्य आजार उद्भवतात. जलजन्य आजार टाळण्यासाठी पाणी  नमुने  तपासणी सुरू असून,  शुद्ध पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले. ग्रामस्तरावर ग्रामपंचायतीसाठी  जलसुरक्षा रक्षक असून, पाणी तपासणी केल्यानंतरच नागरिकांना आपापल्या गावातील पाणी पिण्यायोग्य आहे की नाही हे लक्षात येणार आहे़.  दर महिन्याचा अहवाल हा साधारणत: महिना संपल्यानंतर पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तयार केला जाणार आहे. त्या अनुषंगाने दूषित पाणीपुरवठा होत  असलेल्या ठिकाणी योग्य ती खबरदारी घेतली जाणार आहे. जलस्त्रोतात पुरेशा प्रमाणात ब्लिचिंग पावडर टाकण्याच्या सूचनाही जिल्हा परिषद प्रशासनाने दिलेल्या आहेत.काही गावात हातपंप, विहिरीजवळच कपडे धुणे, नालीचे पाणी साचत असल्याने जलस्त्रोत दूषित होतात. यापूर्वी दूषित पाणी आढळून आलेल्या स्रोतांची व परिसराची स्वच्छता करण्याकडेही ग्रामपंचायतींकडून लक्ष दिले जात नसल्याचे दिसून येते. दूषित पाणीपुरवठा करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नका, अशा सूचना जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामपंचायत प्रशासनाला दिल्या आहेत.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद