शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

जलजन्य  आजार टाळण्यासाठी पाणी नमुने तपासणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 12:58 IST

वाशिम : जिल्ह्यातील नागरिकांना पिण्यायोग्य स्वच्छ पाणी मिळावे, जलजन्य आजार  टाळण्याच्या दृष्टिकोनातून पाणी पुरवठा विभागाच्यावतीने जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायती अंतर्गत असलेले जलस्त्रोत तपासले जात आहे.

ठळक मुद्देजलजन्य आजार टाळण्यासाठी पाणी  नमुने  तपासणी सुरू असून,  शुद्ध पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले. जलस्त्रोतात पुरेशा प्रमाणात ब्लिचिंग पावडर टाकण्याच्या सूचनाही जिल्हा परिषद प्रशासनाने दिलेल्या आहेत.

वाशिम : जिल्ह्यातील नागरिकांना पिण्यायोग्य स्वच्छ पाणी मिळावे, जलजन्य आजार  टाळण्याच्या दृष्टिकोनातून पाणी पुरवठा विभागाच्यावतीने जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायती अंतर्गत असलेले जलस्त्रोत तपासले जात असून, पाण्यात कोणत्या क्षारघटकांची कमतरता आहे याची माहिती घेतली जात आहे.पावसाळ्याच्या दिवसात जलजन्य आजार तसेच दूषित अन्न-पाण्याच्या प्रकारातून टायफॉईड, कावीळ, जुलाब व अन्य आजार उद्भवतात. जलजन्य आजार टाळण्यासाठी पाणी  नमुने  तपासणी सुरू असून,  शुद्ध पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले. ग्रामस्तरावर ग्रामपंचायतीसाठी  जलसुरक्षा रक्षक असून, पाणी तपासणी केल्यानंतरच नागरिकांना आपापल्या गावातील पाणी पिण्यायोग्य आहे की नाही हे लक्षात येणार आहे़.  दर महिन्याचा अहवाल हा साधारणत: महिना संपल्यानंतर पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तयार केला जाणार आहे. त्या अनुषंगाने दूषित पाणीपुरवठा होत  असलेल्या ठिकाणी योग्य ती खबरदारी घेतली जाणार आहे. जलस्त्रोतात पुरेशा प्रमाणात ब्लिचिंग पावडर टाकण्याच्या सूचनाही जिल्हा परिषद प्रशासनाने दिलेल्या आहेत.काही गावात हातपंप, विहिरीजवळच कपडे धुणे, नालीचे पाणी साचत असल्याने जलस्त्रोत दूषित होतात. यापूर्वी दूषित पाणी आढळून आलेल्या स्रोतांची व परिसराची स्वच्छता करण्याकडेही ग्रामपंचायतींकडून लक्ष दिले जात नसल्याचे दिसून येते. दूषित पाणीपुरवठा करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नका, अशा सूचना जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामपंचायत प्रशासनाला दिल्या आहेत.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद